नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली. एकमेकांवरची चिखलफेक, धुरळा थांबला. जीवघेणी सत्तेची लालसा व त्याचा होत असलेला दुरुपयोग, अतिशय खालच्या पातळीवर झालेली भाषणे, टीकाटिप्पणी ही काही बाबतीत तर खूपच क्लेशकारक होती आणि या वातावरणात एका निरागस, निरलस, निर्मळ मनाच्या नेत्याची प्रकर्षाने आठवण झाली, ते म्हणजे राजीव गांधी. त्यांचे आपण आज (२१ मे) पुण्यस्मरण करत आहोत. त्यानिमित्त...
- उल्हास पवार
ज्यांनी आपल्या सामाजिक, राजकीय जीवनात कोणाबद्दल कधीही अपशब्द न वापरता शांत वृत्तीने आपले मत मांडले, अशी राजीव गांधी यांची पंतप्रधानपदाची यशस्वी कारकीर्द सदैव स्मरणात राहील. इंदिराजींच्या दुदैवी हत्येनंतर भारतामध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि त्या संकटकाळात पंतप्रधानपदाची अवघड धुरा त्यांना स्वीकारावी लागली. एकविसाव्या शतकातील विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण व सामाजिक न्याय या बाबतीत जगाच्या नकाशावर भारत सदैव अग्रक्रमाने राहावा, म्हणून राजीव गांधी यांनी जीवाचे रान केले. अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ व विद्वानांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने संगणक, दळणवळण, मोबाइल व इंटरनेटची क्रांती घडवून आणली. त्यांच्या प्रसन्न मनाचे प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर सदैव सर्व भारतीयांना व जगाला पाहायला मिळाले. द्वेष, राग या शब्दांना त्यांच्याजवळ थारही नव्हता. इंदिराजींची हत्या झाली, त्यानंतर इंदिराजींच्या मृतदेहाजवळ त्यांचे सर्व कुटुंबीय होते. राहुलजी व प्रियांका त्या वेळी विद्यार्थी दशेत होते. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. त्या वेळी आपल्या आईच्या मृतदेहापासून दोन-तीन वेळा दूर जाऊन त्यांनी दंगली शमविण्याचा व लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, हे मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. इंदिराजींच्या अंत्यविधीनंतर एका आठवड्यातच शीख पंथाचे प्रमुख असलेले संत लोंगोवाल यांच्याशी शांततेचा व सामंजस्याचा करार त्यांनी केला. या देशातील सामाजिक संतुलन आणि ऐक्य बिघडता कामा नये, याची काळजी राजीव गांधी यांनी आपले सर्व दुःख बाजूला सारून वाहिली. या कराराच्या पाठीशी समस्त भारतीयांनी उभे राहावे व त्याचे समर्थन करावे, असे आवाहन थोर स्वातंत्र्य सेनानी अच्युतराव पटवर्धन, देशाचे समाजवादी नेते एस. एम. जोशी व इतर अनेक नेत्यांनी केले. एस. एम. जोशी यांनी तर असे म्हटले, की राजीव गांधी यांनी केलेल्या या अभूतपूर्व कराराच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे.
ज्या बोफोर्स तोफांच्या कराराबद्दल गेली अनेक वर्षे त्यांना बदनाम करण्यात येत होते, त्याच तोफा जगातील सर्वोत्तम तोफा आहेत, असे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले जसवंतसिंह यांनी म्हटले होते. या तोफांच्या प्रभावामुळेच कारगिलचे युद्ध जिंकणे सोपे झाले, असे मत त्यांनी व्यक्त केले. हायकोर्टातही राजीव गांधी यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. लोकसभेत नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने चौकशी करूनही ते दोषमुक्त झाले. कोणताही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला नाही. दिल्ली हायकोर्टात राजीव गांधी यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर कुणीही सुप्रीम कोर्टात गेले नाही. मात्र, कारण नसताना आजपर्यंत टीका चालू आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल 'फार मोठ्या मनाचा माणूस,' असे खुल्या दिलाने सांगितले आहे. एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल राजीव गांधी यांना समजले. तेव्हा ते लालकृष्ण अडवाणी यांना आदराने म्हणाले, की अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळात आपण अटलजींना पाठवू. अटलजींना लालकृष्ण अडवाणी यांच्यामार्फत सांगितले, की काळजी करू नका, तुमच्या प्रकृतीची तपासणी करून घ्या, आवश्यक ते उपचार करून घ्या व ऑपरेशन करावे लागले, तर तेही करा. याची सर्व काळजी भारत सरकार घेईल. तेव्हा राजीव गांधींच्या माणुसकीचे व आपुलकीचे दर्शन सर्व भारतीयांना झाले. तंत्रज्ञान, विज्ञान, संगणक, इंटरनेट, आंतरराष्ट्रीय संशोधन, दळणवळण, संरक्षण दलांचे आधुनिकीकरण, युवकांना शैक्षणिक व जगातील कुठल्याही तंत्रज्ञानापासून दूर न ठेवता योजना आखण्यासाठी घेतलेले परिश्रम, नवभारताच्या अखंडत्वाचा ध्यास, शेती व अर्थकारणामध्ये स्वयंपूर्णता व मानवी विकासाचा दर हा नेहमी अग्रक्रमाने पुढे जावा, यासाठी वाहिलेली काळजी आणि जगात भारतीयांनी कोठेही मागे राहता कामा नये, यासाठी अनेक विद्वानांच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल केलेले राजीव गांधी आज आपल्यात नाहीत, याची ठायीठायी आठवण आपल्याला होते.
सामाजिक ऐक्य कायम राहून देशाच्या अखंडत्वाचे अजिबात विघटन होता कामा नये, याच भावनेतून 'एलटीटीई'च्या उद्रेकावेळी श्रीलंकेमध्ये निर्माण झालेल्या तमिळ विरुद्ध सिंहली यांच्या संघर्षामध्ये असंख्य निष्पाप लोकांचे बळी जात असताना, त्याही ठिकाणी पुढाकार घेऊन तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विशेषतः निष्पाप तमिळ बांधवांचे बळी घेतले जाऊ नयेत, यासाठी सिंहली व तमिळ यांनी एकोप्याने राहावे, याची काळजी राजीव गांधी यांनी घेतली. पुढाकार घेऊन त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांबरोबर करार केला. तेथे शांतिसेना पाठवली. 'एलटीटीई'च्या दहशतवाद्यांपासून त्यांना धोका आहे, असा इशारा त्यांना दिला गेला होता; परंतु तरीही ते तेथे प्रचारासाठी गेले, याचे एक नाजूक व भावनिक कारण होते. मार्गथंम चंद्रशेखर हे पती-पत्नी काँग्रेसचे जुने नेते व गांधीजींचे अनुयायी व स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी; तसेच दक्षिणेकडील मागासवर्गीय समाजाचे थोर नेते होते. त्यांची मुलगी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने उभी राहिली होती. तिच्या प्रचाराला राजीव गांधी यांनी यावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे सर्व धोक्याची पार्श्वभूमी असतानादेखील आपले कर्तव्य बजावण्यासाठी प्रचाराकरिता राजीव गांधी तेथे गेले. तेथेच त्यांची हत्या झाली.
(लेखक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.)
- उल्हास पवार
ज्यांनी आपल्या सामाजिक, राजकीय जीवनात कोणाबद्दल कधीही अपशब्द न वापरता शांत वृत्तीने आपले मत मांडले, अशी राजीव गांधी यांची पंतप्रधानपदाची यशस्वी कारकीर्द सदैव स्मरणात राहील. इंदिराजींच्या दुदैवी हत्येनंतर भारतामध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि त्या संकटकाळात पंतप्रधानपदाची अवघड धुरा त्यांना स्वीकारावी लागली. एकविसाव्या शतकातील विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण व सामाजिक न्याय या बाबतीत जगाच्या नकाशावर भारत सदैव अग्रक्रमाने राहावा, म्हणून राजीव गांधी यांनी जीवाचे रान केले. अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ व विद्वानांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने संगणक, दळणवळण, मोबाइल व इंटरनेटची क्रांती घडवून आणली. त्यांच्या प्रसन्न मनाचे प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर सदैव सर्व भारतीयांना व जगाला पाहायला मिळाले. द्वेष, राग या शब्दांना त्यांच्याजवळ थारही नव्हता. इंदिराजींची हत्या झाली, त्यानंतर इंदिराजींच्या मृतदेहाजवळ त्यांचे सर्व कुटुंबीय होते. राहुलजी व प्रियांका त्या वेळी विद्यार्थी दशेत होते. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. त्या वेळी आपल्या आईच्या मृतदेहापासून दोन-तीन वेळा दूर जाऊन त्यांनी दंगली शमविण्याचा व लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, हे मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. इंदिराजींच्या अंत्यविधीनंतर एका आठवड्यातच शीख पंथाचे प्रमुख असलेले संत लोंगोवाल यांच्याशी शांततेचा व सामंजस्याचा करार त्यांनी केला. या देशातील सामाजिक संतुलन आणि ऐक्य बिघडता कामा नये, याची काळजी राजीव गांधी यांनी आपले सर्व दुःख बाजूला सारून वाहिली. या कराराच्या पाठीशी समस्त भारतीयांनी उभे राहावे व त्याचे समर्थन करावे, असे आवाहन थोर स्वातंत्र्य सेनानी अच्युतराव पटवर्धन, देशाचे समाजवादी नेते एस. एम. जोशी व इतर अनेक नेत्यांनी केले. एस. एम. जोशी यांनी तर असे म्हटले, की राजीव गांधी यांनी केलेल्या या अभूतपूर्व कराराच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे.
ज्या बोफोर्स तोफांच्या कराराबद्दल गेली अनेक वर्षे त्यांना बदनाम करण्यात येत होते, त्याच तोफा जगातील सर्वोत्तम तोफा आहेत, असे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले जसवंतसिंह यांनी म्हटले होते. या तोफांच्या प्रभावामुळेच कारगिलचे युद्ध जिंकणे सोपे झाले, असे मत त्यांनी व्यक्त केले. हायकोर्टातही राजीव गांधी यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. लोकसभेत नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने चौकशी करूनही ते दोषमुक्त झाले. कोणताही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला नाही. दिल्ली हायकोर्टात राजीव गांधी यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर कुणीही सुप्रीम कोर्टात गेले नाही. मात्र, कारण नसताना आजपर्यंत टीका चालू आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल 'फार मोठ्या मनाचा माणूस,' असे खुल्या दिलाने सांगितले आहे. एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल राजीव गांधी यांना समजले. तेव्हा ते लालकृष्ण अडवाणी यांना आदराने म्हणाले, की अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळात आपण अटलजींना पाठवू. अटलजींना लालकृष्ण अडवाणी यांच्यामार्फत सांगितले, की काळजी करू नका, तुमच्या प्रकृतीची तपासणी करून घ्या, आवश्यक ते उपचार करून घ्या व ऑपरेशन करावे लागले, तर तेही करा. याची सर्व काळजी भारत सरकार घेईल. तेव्हा राजीव गांधींच्या माणुसकीचे व आपुलकीचे दर्शन सर्व भारतीयांना झाले. तंत्रज्ञान, विज्ञान, संगणक, इंटरनेट, आंतरराष्ट्रीय संशोधन, दळणवळण, संरक्षण दलांचे आधुनिकीकरण, युवकांना शैक्षणिक व जगातील कुठल्याही तंत्रज्ञानापासून दूर न ठेवता योजना आखण्यासाठी घेतलेले परिश्रम, नवभारताच्या अखंडत्वाचा ध्यास, शेती व अर्थकारणामध्ये स्वयंपूर्णता व मानवी विकासाचा दर हा नेहमी अग्रक्रमाने पुढे जावा, यासाठी वाहिलेली काळजी आणि जगात भारतीयांनी कोठेही मागे राहता कामा नये, यासाठी अनेक विद्वानांच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल केलेले राजीव गांधी आज आपल्यात नाहीत, याची ठायीठायी आठवण आपल्याला होते.
सामाजिक ऐक्य कायम राहून देशाच्या अखंडत्वाचे अजिबात विघटन होता कामा नये, याच भावनेतून 'एलटीटीई'च्या उद्रेकावेळी श्रीलंकेमध्ये निर्माण झालेल्या तमिळ विरुद्ध सिंहली यांच्या संघर्षामध्ये असंख्य निष्पाप लोकांचे बळी जात असताना, त्याही ठिकाणी पुढाकार घेऊन तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विशेषतः निष्पाप तमिळ बांधवांचे बळी घेतले जाऊ नयेत, यासाठी सिंहली व तमिळ यांनी एकोप्याने राहावे, याची काळजी राजीव गांधी यांनी घेतली. पुढाकार घेऊन त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांबरोबर करार केला. तेथे शांतिसेना पाठवली. 'एलटीटीई'च्या दहशतवाद्यांपासून त्यांना धोका आहे, असा इशारा त्यांना दिला गेला होता; परंतु तरीही ते तेथे प्रचारासाठी गेले, याचे एक नाजूक व भावनिक कारण होते. मार्गथंम चंद्रशेखर हे पती-पत्नी काँग्रेसचे जुने नेते व गांधीजींचे अनुयायी व स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी; तसेच दक्षिणेकडील मागासवर्गीय समाजाचे थोर नेते होते. त्यांची मुलगी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने उभी राहिली होती. तिच्या प्रचाराला राजीव गांधी यांनी यावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे सर्व धोक्याची पार्श्वभूमी असतानादेखील आपले कर्तव्य बजावण्यासाठी प्रचाराकरिता राजीव गांधी तेथे गेले. तेथेच त्यांची हत्या झाली.
(लेखक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.)