अ‍ॅपशहर

बुद्धिवादी

टाइम्स ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र टाइम्स दैनिकाचे पहिले संपादक द्वा. भ. कर्णिक होते. ते व त्यांचे बंधू व. भ. कर्णिक यांच्यावर एम. एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यावेळी गोविंद तळवलकर ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सहाय्यक संपादक होते.

Maharashtra Times 23 Mar 2017, 12:24 am
हुसेन दलवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम senior journalist and eminent writer govind talwalkar passed away
बुद्धिवादी


vachak.vishesh@gmail.com

टाइम्स ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र टाइम्स दैनिकाचे पहिले संपादक द्वा. भ. कर्णिक होते. ते व त्यांचे बंधू व. भ. कर्णिक यांच्यावर एम. एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यावेळी गोविंद तळवलकर ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सहाय्यक संपादक होते. द्वा. भ. कर्णिक यांच्यानंतर गोविंदराव संपादक झाले. ते सलग २७ वर्षे संपादक होते आणि वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त झाले.

गोविंदरावांच्या बोलण्या-चालण्यातून किंवा दिसण्यावरून त्यांचे वय कधीच जाणवले नाही. भाषणे करण्याच्या भानगडीत ते फारसे पडलेच नाहीत. पण लेखणीतून ते अतिशय धारदार आणि तर्कशुद्धपणे बोलायचे. त्यांच्या काळात ‘महाराष्ट्र टाइम्स’चा प्रचंड दबदबा होता. त्यांचा अग्रलेख वाचला जायचाच! त्यांच्याशी मतभेद असणाऱ्यांना गोविंदराव काय म्हणतात ते पहावेच लागे. द्वा. भ. प्रमाणे तेही रॉईस्ट होते. पट्टीचे बुद्धिवादी आणि रॅशनलिस्ट! गोविंदरावांचे हमीदभाई (हमीद दलवाई), अ. भि. शहा, जी. डी. पारिख, मे. पु. रेगे, प्रभाकर पाध्ये, कविवर्य वि. वा. शिरवाडकर, डॉ. रफिक झकेरिया, अनंतराव भालेराव यांच्या सारख्यांशी मैत्रीचे संबंध होते. हमीदभाईंमुळे आणि युक्रांदमुळे मी अनेकवेळा त्यांना भेटलो होतो. त्यांच्या चर्चगेटमधील घरीही गेलो होतो. युक्रांदच्या काही भूमिका त्यांना पसंत नसायच्या. एकदा तर त्यांनी युक्रांदवर अग्रलेख लिहिला. ‘दाढी वाढवली व खांद्यावर पिशवी लटकवली म्हणजे क्रांतिकारक होत नाही!’ अशी त्यांनी कुमार सप्तर्षी, रंगा राचुरे आणि नगर जिल्ह्यातील राशीनमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून मार्मिक टीका केली. ‘राशीन म्हणजे युक्रांदी यांना येनान वाटले’ असा चिमटा त्यांनी काढला. मात्र, असे असले तरी पुरोगामी चळवळीबद्दल त्यांना आस्था होती.

यशवंतराव चव्हाण हे सुद्धा रॉईस्ट होते. त्यांनी द्वा. भ. आणि गोविंदरावांना ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये घ्यावे म्हणून शिफारस केल्याचे म्हटले जायचे. गोविंदरावांच्या निधनाची बातमी अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. निवृत्तीनंतर ते काही काळ नाशिक आणि बराच काळ आपल्या मुलींकडे अमेरिकेत राहिले. अधूनमधून त्यांचे लेख वाचायला मिळायचे. पंडित जवाहरलाल नेहरूंना विसरता येणार नाही, अशी ताकीदही त्यांनी अलीकडे दिली होती. क्षण न् क्षण त्यांनी वाचन व लेखनाच्या आनंदात घालविले! त्यांना अखेरचा सलाम!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज