रविवारी, १८ ऑगस्टच्या सकाळी साडेपाच वाजता उरी क्षेत्रातील १२ इंन्फन्ट्री ब्रिगेडच्या प्रशासकीय विभागावर पाकपुरस्कृत लश्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांनी हल्ला चढवला. त्यात आत्तापर्यन्त तरी १८ जवान शहीद झाले आहेत. चारही आतंकवादी मारले गेले आहेत व आता त्या भागाचा तपास व झडती पूर्ण झाली आहे. आता पुन्हा नेहेमीच्याच चावून चोथा झालेल्या प्रश्नावर आपण तेवढीच नपुंसक उत्तरे पुन्हा शोधणार आहोत.
ह्या हल्ल्यामुळे अनेक प्रश्न समोर येणार आहेत. पहिला प्रश्न आहे ‘आयबी’ने हल्ल्याची शक्यता वर्तवली होती व तशी सूचना उत्तरेतील सर्व हवाई दलाच्या आस्थापनांना व इतर तुकड्यांना कळवली होती. आता ही सूचना १२ ब्रिगेडच्या क्षेत्रात पाठवली होती का पहिला प्रश्न आहे. तो निरर्थक आहे, कारण ज्या ठिकाणी हे मुख्यालय आहे, तिथे रोजच आणीबाणी असते व असे हल्ले केव्हाही होतील, असे त्यांना नेहेमीच गृहीत धरावे लागते. चार-पाच आतंकवाद्यांशी लढण्याची तयारी ह्या ठिकाणच्या सर्वांनाच नेहेमी ठेवावी लागते. आपण एक लक्षात घेतले पाहिजे, की ह्या हल्ल्यात आतंकवाद्यांच्यामुळे केवळ दोघांना मरण आले आहे. इतर १५ जण ह्या गोळीबारामुळे लागलेल्या आगीमुळे शहीद झाले आहेत. आतंकवाद्यांच्या गोळ्यांनी ही आग लागलेली नाही, कारण बंदुकीच्या गोळ्यांनी माणसे मरतात, आगी लागत नाहीत. पण ह्या धावपळीत कंदील, बुखारी (रुम हीटर)वा इतर तत्सम ज्वालाग्रही पदार्थांचा वापर करणाऱ्या वस्तुंमुळे ही आग लागलेली आहे.
सैन्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेपाच वाजता गोळीबार सुरू झाल्यानंतर लगेचच, म्हणजे ५.३५ वाजता पहिली QRT हल्ल्याच्या ठिकाणी पोचली होती. ब्रिगेडच्या ह्या प्रशासकीय भागाला पक्के कुंपण नाही. एखाद्या हल्लेखोराला घुसायचे असेल, तर ते फार अवघड नाही, पण एखाद्या तुकडीचा सावधपणा त्यांच्या जबाबी कारवाईच्या रूपात दिसतो व ते तसे झालेच होते. अवघ्या दोन तासांत स्थानिक तुकड्यांनी पॅरा कमांडोंच्या सोबतीने ह्या हल्लेखोरांना मारले आहे.
आता प्रश्न येतो, की हा हल्ला कोणी केला आहे? हे नक्की कळण्यासाठी काही उजळणी गरजेची आहे. हा हल्ला सकाळी साडेपाच वाजता केला गेला. ही सर्वात नाजुक वेळ असते हे सर्व सैन्यदलाला ठावूक आहे, व म्हणूनच सर्व तुकड्यांनी ह्या वेळेला अधिक सावध राहणे गरजेचे असते. ह्याला Stand To असे संबोधले जाते. सूर्योदयाच्या आधी अर्धा तास व नंतरचा किमान अर्धा तास सर्वांना आपआपल्या नेमलेल्या जागी पहारा द्यायचा असतो. हा प्रकार प्रत्यक्ष युद्धरेषेवरील तुकड्या काटेकोरपणे पाळतात, पण मागच्या बाजूच्या प्रशासकीय भागात ह्यात बऱ्याच वेळा चालढकल होते, जी ह्या भागात होत होती.
टेहळणी करताना ह्या बाबींचे महत्व एका साध्या आतंकवाद्याला कळणे व उमजणे शक्य नाही. हे काम एका प्रशिक्षित सैनिकाचेच आहे. ह्या हल्ल्याच्या आराखड्यापासून ते कसे पार पाडायचे ह्याच्या अंमलबजावणीपर्यंतची आखणी पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांनीच केली आहे. आयएसआयने त्यांना हवी असलेली माणसे व भारतातील संपर्क देऊ केले असावेत.
उरीचा भाग तीन बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेने (एलओसी) वेढलेला आहे. ह्याच भागातून फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने इथे एका नव्या ब्रिगेडला पाठवले गेले होते. ह्या ब्रिगेडमुळे इथल्या घुसखोरीवर बऱ्यापैकी नियंत्रण बसले होते. ह्या कारणामुळेच ह्या ब्रिगेडची निवड झाली असावी. हल्ला झाल्यावर त्यांचे मनोधैर्य खचेल व वाटा बर्फामुळे बंद होण्याच्या आधी घुसखोरी पुन्हा जोमाने करता येणे शक्य होईल.
काश्मीरमधील एलओसीवर नुस्त्या चौक्या लावून बसणे फारसे फायद्याचे नाही, पण आपल्या सरकारच्या नीतीमुळे गेल्या काही वर्षापासून हे असे होत आहे. परिणाम सैन्यावरील वाढते हल्ले. काश्मीरसारख्या वातावरणात आपण जर आक्रमक पेट्रोलिंग केले नाही, तर आतंकवाद्यांना संपूर्ण रान मोकळे असते. हे पेट्रोलिंग फक्त एलओसीवर करून भागत नाही, तर ह्या आपल्या अंतर्गत भागातही त्यांच्या संभाव्य वाटांवर पेट्रोलिंग करत त्यांच्या हालचालींवर बंधने आणणे गरजेचे असते. एलओसीजवळच्या भागात रात्रीचा कर्फ्यु असताना जर कोणी बाहेर हिंडताना दिसले, तर त्याच्यावर संशयीत म्हणून कारवाई केली, तर लगेचच त्याला निरापराध काश्मिरींवर सुरक्षादलांनी केलेला अत्याचार असे लेबल लावून हाकाटी पिटली जाते. आपले सरकार ह्याला घाबरते, व म्हणूनच त्यांनी सैन्यावरच निर्बंध घालत त्यांना चौक्यात बांधून ठेवले आहे.
सध्याची परिस्थिती बघता सैन्याला नुसते एलओसीच्या आपल्या बाजूला पेट्रोलिंग न करता जर खास माहिती हाती असेल, तर म्यानमारप्रमाणे एलओसीच्या पलीकडे काही ठराविक सीमित अंतरापर्यंत आत घुसून कारवाई करायची मुभा द्यायला हवी. ह्याला राजकीय हिंमत लागते व निवडणुकांच्या पलीकडे जाऊन देशाच्या सुरक्षेचा विचार करायची ताकद लागते. सध्या ज्या प्रकारे हे सरकार सैन्यदलाची उघड उघड परवड करत आहे त्याचा काहीतरी परिणाम सैन्यावर होत आहेच. १२ ब्रिगेड मधील ढिसाळपणा ह्याची सुरुवात तर नाही ना? राजा, रात्र वैऱ्याची आहे व ह्या धोक्यातून देशाला केवळ सैन्यच वाचवू शकते, पोलिस नाही! आता जर ह्या सरकारने सैन्याला पोलिसांच्या पंगतीला बसवले आहे, तर मग सैन्याची ही कामे ही त्यांच्याकडून का करून घेत नाहीत डोव्हल, जेटली व इतर कंपू?
कर्नल श्री खासगीवाले.
ह्या हल्ल्यामुळे अनेक प्रश्न समोर येणार आहेत. पहिला प्रश्न आहे ‘आयबी’ने हल्ल्याची शक्यता वर्तवली होती व तशी सूचना उत्तरेतील सर्व हवाई दलाच्या आस्थापनांना व इतर तुकड्यांना कळवली होती. आता ही सूचना १२ ब्रिगेडच्या क्षेत्रात पाठवली होती का पहिला प्रश्न आहे. तो निरर्थक आहे, कारण ज्या ठिकाणी हे मुख्यालय आहे, तिथे रोजच आणीबाणी असते व असे हल्ले केव्हाही होतील, असे त्यांना नेहेमीच गृहीत धरावे लागते. चार-पाच आतंकवाद्यांशी लढण्याची तयारी ह्या ठिकाणच्या सर्वांनाच नेहेमी ठेवावी लागते. आपण एक लक्षात घेतले पाहिजे, की ह्या हल्ल्यात आतंकवाद्यांच्यामुळे केवळ दोघांना मरण आले आहे. इतर १५ जण ह्या गोळीबारामुळे लागलेल्या आगीमुळे शहीद झाले आहेत. आतंकवाद्यांच्या गोळ्यांनी ही आग लागलेली नाही, कारण बंदुकीच्या गोळ्यांनी माणसे मरतात, आगी लागत नाहीत. पण ह्या धावपळीत कंदील, बुखारी (रुम हीटर)वा इतर तत्सम ज्वालाग्रही पदार्थांचा वापर करणाऱ्या वस्तुंमुळे ही आग लागलेली आहे.
सैन्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेपाच वाजता गोळीबार सुरू झाल्यानंतर लगेचच, म्हणजे ५.३५ वाजता पहिली QRT हल्ल्याच्या ठिकाणी पोचली होती. ब्रिगेडच्या ह्या प्रशासकीय भागाला पक्के कुंपण नाही. एखाद्या हल्लेखोराला घुसायचे असेल, तर ते फार अवघड नाही, पण एखाद्या तुकडीचा सावधपणा त्यांच्या जबाबी कारवाईच्या रूपात दिसतो व ते तसे झालेच होते. अवघ्या दोन तासांत स्थानिक तुकड्यांनी पॅरा कमांडोंच्या सोबतीने ह्या हल्लेखोरांना मारले आहे.
आता प्रश्न येतो, की हा हल्ला कोणी केला आहे? हे नक्की कळण्यासाठी काही उजळणी गरजेची आहे. हा हल्ला सकाळी साडेपाच वाजता केला गेला. ही सर्वात नाजुक वेळ असते हे सर्व सैन्यदलाला ठावूक आहे, व म्हणूनच सर्व तुकड्यांनी ह्या वेळेला अधिक सावध राहणे गरजेचे असते. ह्याला Stand To असे संबोधले जाते. सूर्योदयाच्या आधी अर्धा तास व नंतरचा किमान अर्धा तास सर्वांना आपआपल्या नेमलेल्या जागी पहारा द्यायचा असतो. हा प्रकार प्रत्यक्ष युद्धरेषेवरील तुकड्या काटेकोरपणे पाळतात, पण मागच्या बाजूच्या प्रशासकीय भागात ह्यात बऱ्याच वेळा चालढकल होते, जी ह्या भागात होत होती.
टेहळणी करताना ह्या बाबींचे महत्व एका साध्या आतंकवाद्याला कळणे व उमजणे शक्य नाही. हे काम एका प्रशिक्षित सैनिकाचेच आहे. ह्या हल्ल्याच्या आराखड्यापासून ते कसे पार पाडायचे ह्याच्या अंमलबजावणीपर्यंतची आखणी पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांनीच केली आहे. आयएसआयने त्यांना हवी असलेली माणसे व भारतातील संपर्क देऊ केले असावेत.
उरीचा भाग तीन बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेने (एलओसी) वेढलेला आहे. ह्याच भागातून फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने इथे एका नव्या ब्रिगेडला पाठवले गेले होते. ह्या ब्रिगेडमुळे इथल्या घुसखोरीवर बऱ्यापैकी नियंत्रण बसले होते. ह्या कारणामुळेच ह्या ब्रिगेडची निवड झाली असावी. हल्ला झाल्यावर त्यांचे मनोधैर्य खचेल व वाटा बर्फामुळे बंद होण्याच्या आधी घुसखोरी पुन्हा जोमाने करता येणे शक्य होईल.
काश्मीरमधील एलओसीवर नुस्त्या चौक्या लावून बसणे फारसे फायद्याचे नाही, पण आपल्या सरकारच्या नीतीमुळे गेल्या काही वर्षापासून हे असे होत आहे. परिणाम सैन्यावरील वाढते हल्ले. काश्मीरसारख्या वातावरणात आपण जर आक्रमक पेट्रोलिंग केले नाही, तर आतंकवाद्यांना संपूर्ण रान मोकळे असते. हे पेट्रोलिंग फक्त एलओसीवर करून भागत नाही, तर ह्या आपल्या अंतर्गत भागातही त्यांच्या संभाव्य वाटांवर पेट्रोलिंग करत त्यांच्या हालचालींवर बंधने आणणे गरजेचे असते. एलओसीजवळच्या भागात रात्रीचा कर्फ्यु असताना जर कोणी बाहेर हिंडताना दिसले, तर त्याच्यावर संशयीत म्हणून कारवाई केली, तर लगेचच त्याला निरापराध काश्मिरींवर सुरक्षादलांनी केलेला अत्याचार असे लेबल लावून हाकाटी पिटली जाते. आपले सरकार ह्याला घाबरते, व म्हणूनच त्यांनी सैन्यावरच निर्बंध घालत त्यांना चौक्यात बांधून ठेवले आहे.
सध्याची परिस्थिती बघता सैन्याला नुसते एलओसीच्या आपल्या बाजूला पेट्रोलिंग न करता जर खास माहिती हाती असेल, तर म्यानमारप्रमाणे एलओसीच्या पलीकडे काही ठराविक सीमित अंतरापर्यंत आत घुसून कारवाई करायची मुभा द्यायला हवी. ह्याला राजकीय हिंमत लागते व निवडणुकांच्या पलीकडे जाऊन देशाच्या सुरक्षेचा विचार करायची ताकद लागते. सध्या ज्या प्रकारे हे सरकार सैन्यदलाची उघड उघड परवड करत आहे त्याचा काहीतरी परिणाम सैन्यावर होत आहेच. १२ ब्रिगेड मधील ढिसाळपणा ह्याची सुरुवात तर नाही ना? राजा, रात्र वैऱ्याची आहे व ह्या धोक्यातून देशाला केवळ सैन्यच वाचवू शकते, पोलिस नाही! आता जर ह्या सरकारने सैन्याला पोलिसांच्या पंगतीला बसवले आहे, तर मग सैन्याची ही कामे ही त्यांच्याकडून का करून घेत नाहीत डोव्हल, जेटली व इतर कंपू?
कर्नल श्री खासगीवाले.