अ‍ॅपशहर

मधुमेहाचा धोका

मधुमेह म्हणजे शांतपणे मारणारा मारेकरीच. पूर्वी मधुमेह, रक्तदाब हे श्रीमंतांचे आजार समजले जायचे. पण आता ७० कोटींच्या आसपास भारतातले लोक या रोगाने त्रस्त आहेत.

Maharashtra Times 25 Sep 2017, 3:25 am
डॉ. रजनी इंदूलकर, होमिओपथी तज्ज्ञ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम about diabetes
मधुमेहाचा धोका


मधुमेह म्हणजे शांतपणे मारणारा मारेकरीच. पूर्वी मधुमेह, रक्तदाब हे श्रीमंतांचे आजार समजले जायचे. पण आता ७० कोटींच्या आसपास भारतातले लोक या रोगाने त्रस्त आहेत.

मधुमेह म्हणजे शांतपणे मारणारा मारेकरीच. पूर्वी मधुमेह, रक्तदाब हे श्रीमंतांचे आजार समजले जायचे. पण आता ७० कोटींच्या आसपास भारतातले लोक या रोगाने त्रस्त आहेत. या आजारात आपली पचनक्रीया, साखर आणि कार्बोहायड्रेट्स यांचं विघटन करून आपल्या पेशींना लागणाऱ्या ग्लुकोजसारख्या पदार्थांमध्ये रुपांतर होतं. तरीही ही साखर वापरून स्वतःचं पोषण करण्यासाठी पेशींना इन्सुलीन या हार्मोनची गरज भासते. मधुमेह होण्याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर आपलं शरीर पुरेसं इन्सुलिन बनवू शकत नाही किंवा इन्सुलिनचा वापर करण्यासाठीची यंत्रणा असमर्थ ठरते. अशा परिस्थितीत ही पचनानंतर तयार झालेली साखर रक्तात फिरताना दिसू लागते. याचा परिणाम रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, हृदय, डोळे, मज्जी संस्था यावर सतत होऊ लागतो.

मधुमेहाची लक्षणं

वारंवार लघवीला जावं लागणं, सारखी तहान लागणं, घाम येणं, संध्याकाळी दमल्यासारखं वाटणं अशी किरकोळ लक्षणं असतात. त्यामुळे या रोगाचं निदान लवकर होत नाही. ताप, थंडी, अंग दुखणं अशा प्रकारच्या काहीही गंभीर शारीरिक त्रास यात होत नाही. म्हणून सातत्याने जे लोक जागरूक राहून रक्त, लघवी वगैरे तपासून घेतात त्यांनाच या आजाराचं पटकन निदान होतं. त्यामुळेच शांतपणे मधुमेह आपल्या शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांना खिळखिळं करून सोडतो.

होमिओपॅथिक औषधांची निवड

मधुमेहावर होमिओपॅथिक औषधांची निवड करताना, फक्त रोगाकडे पाहून रोग्याची फारशी चौकशी न करता पटकन चालू करता येते, ते म्हणजे ‘सिझिजीयम जांभूळ मदर ठिंक्चर’. जांभाळापासून बनवलेलं हे औषध पाण्यातून दिल्यास साखरेचं रक्तातलं प्रमाण आटोक्यात यायला मदत होते. पण हा सहजासहजी बरा होणारा रोग नसल्यामुळे रोग्याची बालपणापासून आत्तापर्यंतची सगळी शारीरिक आणि मानसिक माहिती होमिओपॅथिक डॉक्टरला विचारावी लागते. अनुवांशिकतेचा खूप मोठा प्रभाव या रोगावर असल्याने ती ही माहिती विचारात घ्यावी लागते. तरीही प्रामुख्याने ‘लायकोपोडिअम अर्जेंटम नायट्रिकम’ ‘युरेनियम नायट्रेट’, ‘फॉस्फॉरिक असिड’, ‘फ्लोरिझीन’ अशा औषधांचा वापर केला जातो. आजारी व्यक्तीचं अभ्यासपूर्ण कॉन्स्टिट्यूशनल औषध निवडावच लागतं. हे औषध अचूक निवडलं गेलं तरच उत्तम परिणाम रक्त आणि लघवीच्या रिपोर्टसमध्ये ताबडतोब दिसून येतो.

‘अर्सेनिकम अल्बम’, ‘नैट्रम मूर’, ‘कॅलकेरिया कार्ब’ अशी दूरगामी परिणाम करणारी कॉन्स्टिट्यूशनल औषधं अतिशय गुणकारी असतात. रुग्ण खूप संवेदनशील असेल आणि पटकन डोळ्यात पाणी उभं राहात असेल, एकटं राहायला आवडत नसेल, पायावर सूज, पेशींमध्ये पाणी साठण्याची सवय, गॅसेसमुळे हैराण अशावेळी ‘लायकोपोडिअम’ची निवड केली जाते. विसरभोळा स्वभाव, सतत घाई करण्याची सवय, भित्रेपणा आणि सतत टेन्शन घेण्याची वृत्ती दिसत असेल तर अशावेळी ‘अर्जेंटम नायट्रिकम’ची गरज भासते. मूत्रपिंड, हृदय, यकृत, रक्तवाहिन्या, मज्जा संस्था या सगळ्यावर गंभीर परिणाम होऊन रोगाटी पॅथॉलॉजी पुढे सरकते. अशावेळी ‘फॉस्फॉरिक असिड’, ‘युरेनिअम नायट्रेट’ अशा औषधांचा उपयोग होतो. ‘फ्लोरिझीनचा’ही वापर ‘सिझिजियम’ सारखा मोठ्या प्रमाणात केला जातो. अशाप्रकारे अतिशय काळजीपूर्वक औषधांची निवड करणाऱ्या होमिओपॅथिक शास्त्राचा नक्की वापर करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज