अ‍ॅपशहर

जंक फूडमुळे हृदयविकाराचा धोका

तरुणांमध्ये हृदयविकार ब‍ळावत असल्याची सतत चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसात तरुण कलाकारांचा हृदयविकाराने दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका यावर माहिती घेण्याचा प्रयत्न करुया. सध्या घराच्या किंमती वाढल्यामुळे अनेक लोक शहरापासून लांब राहायला गेलेत. घर ते ऑफिस यांच्यातील अंतर वाढत आहे.

Maharashtra Times 25 Oct 2016, 6:04 am
>> डॉ. अनुप टाकसांडे, हृदयविकार तज्ज्ञ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arogya mantra
जंक फूडमुळे हृदयविकाराचा धोका


तरुणांमध्ये हृदयविकार ब‍ळावत असल्याची सतत चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसात तरुण कलाकारांचा हृदयविकाराने दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका यावर माहिती घेण्याचा प्रयत्न करुया. सध्या घराच्या किंमती वाढल्यामुळे अनेक लोक शहरापासून लांब राहायला गेलेत. घर ते ऑफिस यांच्यातील अंतर वाढत आहे. त्यामुळे नोकरीला जाताना खूप लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे जेवण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलल्या आहेत. घराबाहेर जास्ती वेळ राहिल्याने अनेकदा हॉटेलमध्ये जेवावं लागतं. हॉटेलमधील जेवण हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र त्यामुळे हृदयविकाराला नकळतपणे सामोरं जावं लागतं. ऑफिसमध्ये जास्त वेळ काम, बदलती आर्थिक समीकरणं, कुटुंबातील‌ विसंवाद, ऑफिसमधील स्पर्धा आणि इतरांची तुलना यामुळे सतत अनेकजण तणावाखाली असतात. त्यातच चुकीच्या सवयी आणि निकृष्ट अन्नाची जोड मिळते. त्यामुळे शहरी भागात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मध्यंतरी एका रुग्णालयाने पाहाणी केली होती. त्यात अनेक तरुण-तरुणी सकाळच्या न्याहारीत मैद्याच्या पदार्थांचं सेवन करीत असल्याचं आढळून आलं होतं.

भारतात हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेहच्या रुग्णात वाढ होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलं आहे. त्यामागे इतर कारणांबरोबर खाण्याच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचं पुढे आलं आहे. भारतातील तरुण पिढी सोयीस्कर आणि पटकन मिळणाऱ्या जंक फूडच्या आहारी गेल्याचं दिसून येतंय. जागतिकीकरणामुळे आंतराष्ट्रीय हॉटेल आणि फास्ट फूड सेंटर्स भारतात आली आहेत. भारतातील तरुण पिढी हा त्यांचा मुख्य ग्राहक आहे. तरुण पिढीमध्ये जंक फूडचं वेड वाढत आहे. आधुनिकीकरणामुळे सायकल चालवणं किंवा व्यायामाचा तरुण पिढीत अभाव आहे. त्यामुळे वयाच्या तिशीतच तरुण पिढीमध्ये हृदयविकारीची लक्षणं दिसून येत आहे. पण यावर मात करण्यासाठी जीवनशैली आणि राहाणीमानात तातडीने बदलण्याची गरज आहे. तरच तरुण पिढीचे हृदय निरोगी राहिल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज