डॉ. अभय विसपुते, फिजिशिअन
'डिहायड्रेशन' म्हणजे काय ?
प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा डिहायड्रेशन असे संबोधण्यात येते. लघवी, मल, घाम तसेच उच्छ्वासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे. परंतु, जर हे प्रमाण वाढले तर डिहायड्रेशनचा त्रास होतो.
'डिहायड्रेशन'ची लक्षणे
घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोके किंवा अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, त्वचा कोरडी पडणे, मलावरोध होणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशक्तपणा ही काही डिहायड्रेशनची लक्षणे आहेत.
मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे ही डिहायड्रेशनची आणखी काही लक्षणे आहेत.
ताप, उलटी, जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होऊनही डिहायड्रेशन होऊ शकते.
उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो.
डिहायड्रेशनमुळे शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइड यांच्या पातळीमध्ये असमतोल किंवा कमतरता होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
डिहायड्रेशनची कारणे
डिहायड्रेशनचे प्रमुख कारण घामच्या रूपात शरीरातून पाण्याची पातळी अति प्रमाणात कमी होणे होय. उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहणे, पाणी कमी प्रमाणात पिणे, सतत उन्हात खेळणे इत्यादी डिहायड्रेशनची प्रमुख कारणे आहेत.
डिहायड्रेशनपासून वाचण्याचे उपाय
१. जास्त वेळ उन्हात न फिरणे.
२. पाणी जास्त प्रमाणात पिणे.
३. उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा काही तरी छत्र घेऊन जाणे.
नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनची शक्यता अधिक असते आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते घातक ठरू शकते. लहान मुले लघवी कमी करत असतील किंवा रडताना त्यांच्या डोळ्यातून कमी पाणी येत असेल, प्रमाणापेक्षा जास्त झोप या लक्षणांवर लक्ष ठेवावे. मोठ्या व्यक्तींमध्ये इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक असेल, तर डिहायड्रेशन होऊ शकते.
'डिहायड्रेशन' म्हणजे काय ?
प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा डिहायड्रेशन असे संबोधण्यात येते. लघवी, मल, घाम तसेच उच्छ्वासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे. परंतु, जर हे प्रमाण वाढले तर डिहायड्रेशनचा त्रास होतो.
'डिहायड्रेशन'ची लक्षणे
घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोके किंवा अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, त्वचा कोरडी पडणे, मलावरोध होणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशक्तपणा ही काही डिहायड्रेशनची लक्षणे आहेत.
मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे ही डिहायड्रेशनची आणखी काही लक्षणे आहेत.
ताप, उलटी, जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होऊनही डिहायड्रेशन होऊ शकते.
उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो.
डिहायड्रेशनमुळे शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइड यांच्या पातळीमध्ये असमतोल किंवा कमतरता होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
डिहायड्रेशनची कारणे
डिहायड्रेशनचे प्रमुख कारण घामच्या रूपात शरीरातून पाण्याची पातळी अति प्रमाणात कमी होणे होय. उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहणे, पाणी कमी प्रमाणात पिणे, सतत उन्हात खेळणे इत्यादी डिहायड्रेशनची प्रमुख कारणे आहेत.
डिहायड्रेशनपासून वाचण्याचे उपाय
१. जास्त वेळ उन्हात न फिरणे.
२. पाणी जास्त प्रमाणात पिणे.
३. उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा काही तरी छत्र घेऊन जाणे.
नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनची शक्यता अधिक असते आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते घातक ठरू शकते. लहान मुले लघवी कमी करत असतील किंवा रडताना त्यांच्या डोळ्यातून कमी पाणी येत असेल, प्रमाणापेक्षा जास्त झोप या लक्षणांवर लक्ष ठेवावे. मोठ्या व्यक्तींमध्ये इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक असेल, तर डिहायड्रेशन होऊ शकते.