डॉ. अभय सिंग वालिया, हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हृदयशस्त्रक्रियेला सामोरं जाताना अनेक प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसमोर असतात. अशा वेळी हृदयशस्त्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती असल्यास मनातील भीती कमी होते. हृदय शस्त्रक्रियेची सुरुवात पूर्वीच्या काळात फक्त हृदयाच्या भागांना दुरुस्त करण्यासाठी केली जात होती. पण आता आपण हृदय बदलूही शकतो. हृदयावर पहिली शस्त्रक्रिया १९५२ साली अमेरिकेत हृदयाचं छिद्र बंद करण्यापासून सुरुवात झाली. जगातील पहिली बायपास सर्जरी १९६४ मध्ये अमेरीकेत यशस्वीरीत्या पार पडली. तर १९९० सालापासून हृदय चालू अवस्थेत शस्त्रक्रिया करण्याची सुरुवात झाली. हृदय शस्त्रक्रिया म्हणजे काय अन् हृदयविकाराबाबत जाणून घेऊया :
हृदय शस्त्रक्रिया म्हणजे
१. बायपास सर्जरी
२. हृदयाचे डफिेक्टसवर शस्त्रक्रिया
३. हृदयाच्या झडपांचे आजार
४.कमकुवत काम करणाऱ्या हृदयावर शस्त्रक्रिया
बायपास सर्जरी : बायपास सर्जरी गेल्या ४० वर्षापासून केली जाते. भारतामध्ये १९७० साली याची सुरुवात झाली. तेव्हापासून बायपास सर्जरी विकसति झाली आहे. नवीन पध्दतीने हृदयावर बायपाससाठी लागणारे शुध्द रक्त धमण्यांचा वापर वाढला आहे. कारण या शुध्द रक्त वाहन्यिा हृदयाच्या झटक्यापासून रुग्णाचा बचाव करते. या धमण्या जे छातीच्या दोन्ही बाजूंना असतात. त्यामुळे रुग्ण अॅथरोस्व्लिशेसीस या आजाराला बळी पडत नाही. धमण्यांमध्ये ब्लॉक लवकर तयार होत नाही. या धमण्यांमध्ये विशष्टि प्रकारचं द्रव्य (Nitric Oxide) असतं. ज्यामुळे या धमण्या निरोगी राहतात. भारत हा जगातील पहिला देश आहे जिथं बिटींग हार्ट (Beting Heart) सर्जरी किंवा हृदय चालू अवस्थेत ठेऊन शस्त्रक्रिया करण्यात आघाडीवर आहे. जागेपणी बायपास सर्जरी हे छोट्या इन्सेशन (Insetion) मधून Minimum Invisive या पध्दतीने पण करता येते. रोबॉटच्या साहाय्याने बायपास सर्जरी छोट्या टाक्याद्वारे दुर्बिणीद्वारे करता येऊ शकते. फक्त या दोन्ही पध्दती आर्थिकदृष्टीने महाग आहेत.
बायपास सर्जरी केल्यानंतर रुग्णाला औषधोपचार नेहमी चालू ठेवावा लागतो. कारण Atherosclerosis या आजारामुळे परत ब्लॉक येऊ शकतात. बायपास सर्जरीनंतर जर दुसऱ्यांदा परत बायपासची गरज पडली तर ती पण यशस्वीरित्या पार पाडता येते. बायपास सर्जरी झाल्यानंतर जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये रुग्णांनी मानसकि आणि शारीरिक संतुलन सांभाळणं महत्त्वाचं ठरतं. शारीरिक दृष्टिकोनातून दररोज ३ किमी चालणं किंवा सायकलिंग, योगासनं करणं उत्तम आहे. या बरोबर आहारावर नियंत्रण आणि आजारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. व्यसनमुक्ती अनिवार्य आहे. बायपास सर्जरी ही ४० वर्षांपूर्वी घातक आणि धोकादायक समजली जात होती. पण विज्ञानाच्या अविष्काराने आज ती अतिशय सोयी आणि सुरक्षित झाली आहे. तर जागेपणी हार्ट सर्जरी (Awake Heart Surgery) ज्यामध्ये रुग्ण शस्त्रक्रियेच्या वेळेस जागा असतो. पण त्याला कोणतीही दुखापत होत नाही. ही पध्दत फक्त ठराविक रुग्णांसाठी वापरली जाते. ही पद्धतही आता वापरली जाते.
हृदय शस्त्रक्रिया हा हृदयविकार झाल्यानंतरची प्रक्रिया आहे. मात्र हृदयविकार होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करु शकतो. हृदयविकार झालाच तर यशस्वीपणे अन् सुरक्षित शस्त्रक्रियाचे प्रमाणही आधुनिक पद्धतीमुळे वाढलेलं आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेला घाबरण्यापेक्षा ती जाणून घेत त्याला सामोरं जाणं अधिक चांगलं.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हृदयशस्त्रक्रियेला सामोरं जाताना अनेक प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसमोर असतात. अशा वेळी हृदयशस्त्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती असल्यास मनातील भीती कमी होते. हृदय शस्त्रक्रियेची सुरुवात पूर्वीच्या काळात फक्त हृदयाच्या भागांना दुरुस्त करण्यासाठी केली जात होती. पण आता आपण हृदय बदलूही शकतो. हृदयावर पहिली शस्त्रक्रिया १९५२ साली अमेरिकेत हृदयाचं छिद्र बंद करण्यापासून सुरुवात झाली. जगातील पहिली बायपास सर्जरी १९६४ मध्ये अमेरीकेत यशस्वीरीत्या पार पडली. तर १९९० सालापासून हृदय चालू अवस्थेत शस्त्रक्रिया करण्याची सुरुवात झाली. हृदय शस्त्रक्रिया म्हणजे काय अन् हृदयविकाराबाबत जाणून घेऊया :
हृदय शस्त्रक्रिया म्हणजे
१. बायपास सर्जरी
२. हृदयाचे डफिेक्टसवर शस्त्रक्रिया
३. हृदयाच्या झडपांचे आजार
४.कमकुवत काम करणाऱ्या हृदयावर शस्त्रक्रिया
बायपास सर्जरी : बायपास सर्जरी गेल्या ४० वर्षापासून केली जाते. भारतामध्ये १९७० साली याची सुरुवात झाली. तेव्हापासून बायपास सर्जरी विकसति झाली आहे. नवीन पध्दतीने हृदयावर बायपाससाठी लागणारे शुध्द रक्त धमण्यांचा वापर वाढला आहे. कारण या शुध्द रक्त वाहन्यिा हृदयाच्या झटक्यापासून रुग्णाचा बचाव करते. या धमण्या जे छातीच्या दोन्ही बाजूंना असतात. त्यामुळे रुग्ण अॅथरोस्व्लिशेसीस या आजाराला बळी पडत नाही. धमण्यांमध्ये ब्लॉक लवकर तयार होत नाही. या धमण्यांमध्ये विशष्टि प्रकारचं द्रव्य (Nitric Oxide) असतं. ज्यामुळे या धमण्या निरोगी राहतात. भारत हा जगातील पहिला देश आहे जिथं बिटींग हार्ट (Beting Heart) सर्जरी किंवा हृदय चालू अवस्थेत ठेऊन शस्त्रक्रिया करण्यात आघाडीवर आहे. जागेपणी बायपास सर्जरी हे छोट्या इन्सेशन (Insetion) मधून Minimum Invisive या पध्दतीने पण करता येते. रोबॉटच्या साहाय्याने बायपास सर्जरी छोट्या टाक्याद्वारे दुर्बिणीद्वारे करता येऊ शकते. फक्त या दोन्ही पध्दती आर्थिकदृष्टीने महाग आहेत.
बायपास सर्जरी केल्यानंतर रुग्णाला औषधोपचार नेहमी चालू ठेवावा लागतो. कारण Atherosclerosis या आजारामुळे परत ब्लॉक येऊ शकतात. बायपास सर्जरीनंतर जर दुसऱ्यांदा परत बायपासची गरज पडली तर ती पण यशस्वीरित्या पार पाडता येते. बायपास सर्जरी झाल्यानंतर जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये रुग्णांनी मानसकि आणि शारीरिक संतुलन सांभाळणं महत्त्वाचं ठरतं. शारीरिक दृष्टिकोनातून दररोज ३ किमी चालणं किंवा सायकलिंग, योगासनं करणं उत्तम आहे. या बरोबर आहारावर नियंत्रण आणि आजारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. व्यसनमुक्ती अनिवार्य आहे. बायपास सर्जरी ही ४० वर्षांपूर्वी घातक आणि धोकादायक समजली जात होती. पण विज्ञानाच्या अविष्काराने आज ती अतिशय सोयी आणि सुरक्षित झाली आहे. तर जागेपणी हार्ट सर्जरी (Awake Heart Surgery) ज्यामध्ये रुग्ण शस्त्रक्रियेच्या वेळेस जागा असतो. पण त्याला कोणतीही दुखापत होत नाही. ही पध्दत फक्त ठराविक रुग्णांसाठी वापरली जाते. ही पद्धतही आता वापरली जाते.
हृदय शस्त्रक्रिया हा हृदयविकार झाल्यानंतरची प्रक्रिया आहे. मात्र हृदयविकार होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करु शकतो. हृदयविकार झालाच तर यशस्वीपणे अन् सुरक्षित शस्त्रक्रियाचे प्रमाणही आधुनिक पद्धतीमुळे वाढलेलं आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेला घाबरण्यापेक्षा ती जाणून घेत त्याला सामोरं जाणं अधिक चांगलं.