डॉ. संदीप पाटील, इंटेंसिविस्ट आणि फिजिशियन
जवळपास वर्षभर होणारी अंगाची काहीली आणि घाम काढणाऱ्या आर्द्रतेपासून काही काळ सुटका करणारा हिवाळा हा ऋतू भारतीयांना फारच प्रिय आहे. हा ऋतू सुंदर असला तरी तो आपल्यासोबत काही त्रास घेऊन येतोच. हिवाळ्यात तापमानात घट होते. त्यामुळे शरीरातील उष्णताही कमी होते. त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरीराचा प्रयत्न सुरू असतो. परिणामी, या बदलांतून अनेक प्रकारचे आजार होतात. मात्र, थोडी काळजी घेतल्यास या आजारांना दूर ठेवता येते.
हिवाळ्यात होणारे काही आजार:
सर्दी आणि फ्लू - फ्लूचा ताप हा आजार अशक्त आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ व्यक्ती, मधुमेह आणि मुत्राशयाचे आजार यासारखे दीर्घकालीन आजार असलेल्या माणसांना याचा अधिक धोका असतो. फ्लूपासून वाचण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे फ्लूची लस टोचून घेणं किंवा २ ते १८ वयोगटातल्या मुलांना नाकाद्वारे फ्लू स्प्रे देणं. फ्लूच्या लसीमुळे सुरक्षा मिळते आणि त्याचा परिणाम वर्षभर टिकतो.
घसा बसणं - घसा बसणं हा त्रास बऱ्याचदा जंतूसंसर्गामुळे होतो. उबदार खोलीतून अचानक बाहेरच्या थंड वातावरणात जाणं यासारख्या घटनांमुळे तापमानात अचानक बदल होतो. यामुळे घशावर परिणाम होतो. यासाठी पुदिन्याचा चहा, मध आणि गरम पाणी असे अगदी साधे घरगुती उपाय परिणामकारक ठरतात. त्याचप्रमाणे संत्री, लिंबू, पेरु, ब्रोकोली आणि स्ट्रॉबेरीज यासारख्या ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. तेलकट, चमचमीत पदार्थांपासून दूर रहा.
दमा आणि सीओपीडीमध्ये (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह प्युल्मोनरी डिसिज) वाढ - थंड हवेमुळे दम्याच्या रुग्णांना घरघर लागणं, श्वास न पुरणं अशा समस्या बळावतात. दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यायला हवी. प्रदूषण आणि धुक्यामुळे त्यांचा त्रास तीव्र होऊ शकतो. विशेषत: अधिक थंडीच्या आणि वारा असणाऱ्या दिवसांमध्ये. बाहेर जाताना नाक आणि तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळा. नेहमीची औषधं न चुकता घ्या आणि तुमच्या मदतीला धावून येणारा इन्हेलर नेहमी जवळ आणि उबदार जागेवर ठेवा.
अंग, सांधे दुखणं आणि संधीवात - संधीवाताचा त्रास असलेल्या अनेकांना हिवाळ्यात हे दुखणं अधिक तीव्रतेनं जाणवतं. खरं तर, वातावरणातल्या बदलाने सांध्यांना काही त्रास होतो असं सिद्ध झालेलं नाही. पण, बऱ्याचदा हिवाळ्यात माणसांना निराश वाटतं आणि यातूनच वेदना अधिक जाणवतात. व्यायामाने मानवी मनाला उभारी देण्यासाठी हा सर्वोत्कृष्ट काळ आहे आणि त्यामुळे वेदनेलाही दूर ठेवता येईल. शरीरासाठी आवश्यक असलेल्या ‘ड’ जीवनसत्त्वासाठी पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल, याकडे लक्ष द्या.
हृदयविकाराचा झटका - हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात हे हिवाळ्यात अधिक प्रमाणात घडतात. थंड हवामानामुळे रक्तदाबही वाढतो आणि त्यामुळे हृदयावर अधिक ताण येतो. थंडीच्या दिवसांत शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी हृदयाला अधिक कष्ट करावे लागतात. तापमान आणि हृदयवाहिनीच्या आजारांमधील संबंध दाखवणारी प्रक्रिया अनिश्चितच आहे. मात्र, याच काळात हृदयवाहिनीचे विकार बळावतात. हृदयासंबंधीच्या कोणत्याही आजारापासून दूर राहण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे या काळात उबदार कपडे घालणं. कमी चरबीयुक्त पोषक आहार घ्या आणि ‘ड’ जीवनसत्त्वासाठी गोळ्यांचा वापर करा. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डॉक्टरी सल्ल्यानेच औषधे घ्या.
रुक्ष त्वचा - वातावरणातील आर्द्रता कमी झाली की रुक्ष त्वचेची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. मॉइश्चरायझर लावण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे आंघोळीनंतर लगेच- त्यावेळी त्वचा काहीशी ओलसर असते आणि रात्री झोपताना. कोमट पाण्यानेच आंघोळ करा. फार गरम पाणी टाळा. अति गरम पाण्याने त्वचा अधिक कोरडी पडते आणि खाज येते. गरम पाण्यामुळे केसही निस्तेज आणि रुक्ष दिसतात.
जवळपास वर्षभर होणारी अंगाची काहीली आणि घाम काढणाऱ्या आर्द्रतेपासून काही काळ सुटका करणारा हिवाळा हा ऋतू भारतीयांना फारच प्रिय आहे. हा ऋतू सुंदर असला तरी तो आपल्यासोबत काही त्रास घेऊन येतोच. हिवाळ्यात तापमानात घट होते. त्यामुळे शरीरातील उष्णताही कमी होते. त्याचवेळी या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा शरीराचा प्रयत्न सुरू असतो. परिणामी, या बदलांतून अनेक प्रकारचे आजार होतात. मात्र, थोडी काळजी घेतल्यास या आजारांना दूर ठेवता येते.
हिवाळ्यात होणारे काही आजार:
सर्दी आणि फ्लू - फ्लूचा ताप हा आजार अशक्त आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ व्यक्ती, मधुमेह आणि मुत्राशयाचे आजार यासारखे दीर्घकालीन आजार असलेल्या माणसांना याचा अधिक धोका असतो. फ्लूपासून वाचण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे फ्लूची लस टोचून घेणं किंवा २ ते १८ वयोगटातल्या मुलांना नाकाद्वारे फ्लू स्प्रे देणं. फ्लूच्या लसीमुळे सुरक्षा मिळते आणि त्याचा परिणाम वर्षभर टिकतो.
घसा बसणं - घसा बसणं हा त्रास बऱ्याचदा जंतूसंसर्गामुळे होतो. उबदार खोलीतून अचानक बाहेरच्या थंड वातावरणात जाणं यासारख्या घटनांमुळे तापमानात अचानक बदल होतो. यामुळे घशावर परिणाम होतो. यासाठी पुदिन्याचा चहा, मध आणि गरम पाणी असे अगदी साधे घरगुती उपाय परिणामकारक ठरतात. त्याचप्रमाणे संत्री, लिंबू, पेरु, ब्रोकोली आणि स्ट्रॉबेरीज यासारख्या ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. तेलकट, चमचमीत पदार्थांपासून दूर रहा.
दमा आणि सीओपीडीमध्ये (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह प्युल्मोनरी डिसिज) वाढ - थंड हवेमुळे दम्याच्या रुग्णांना घरघर लागणं, श्वास न पुरणं अशा समस्या बळावतात. दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यायला हवी. प्रदूषण आणि धुक्यामुळे त्यांचा त्रास तीव्र होऊ शकतो. विशेषत: अधिक थंडीच्या आणि वारा असणाऱ्या दिवसांमध्ये. बाहेर जाताना नाक आणि तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळा. नेहमीची औषधं न चुकता घ्या आणि तुमच्या मदतीला धावून येणारा इन्हेलर नेहमी जवळ आणि उबदार जागेवर ठेवा.
अंग, सांधे दुखणं आणि संधीवात - संधीवाताचा त्रास असलेल्या अनेकांना हिवाळ्यात हे दुखणं अधिक तीव्रतेनं जाणवतं. खरं तर, वातावरणातल्या बदलाने सांध्यांना काही त्रास होतो असं सिद्ध झालेलं नाही. पण, बऱ्याचदा हिवाळ्यात माणसांना निराश वाटतं आणि यातूनच वेदना अधिक जाणवतात. व्यायामाने मानवी मनाला उभारी देण्यासाठी हा सर्वोत्कृष्ट काळ आहे आणि त्यामुळे वेदनेलाही दूर ठेवता येईल. शरीरासाठी आवश्यक असलेल्या ‘ड’ जीवनसत्त्वासाठी पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल, याकडे लक्ष द्या.
हृदयविकाराचा झटका - हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात हे हिवाळ्यात अधिक प्रमाणात घडतात. थंड हवामानामुळे रक्तदाबही वाढतो आणि त्यामुळे हृदयावर अधिक ताण येतो. थंडीच्या दिवसांत शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी हृदयाला अधिक कष्ट करावे लागतात. तापमान आणि हृदयवाहिनीच्या आजारांमधील संबंध दाखवणारी प्रक्रिया अनिश्चितच आहे. मात्र, याच काळात हृदयवाहिनीचे विकार बळावतात. हृदयासंबंधीच्या कोणत्याही आजारापासून दूर राहण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे या काळात उबदार कपडे घालणं. कमी चरबीयुक्त पोषक आहार घ्या आणि ‘ड’ जीवनसत्त्वासाठी गोळ्यांचा वापर करा. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डॉक्टरी सल्ल्यानेच औषधे घ्या.
रुक्ष त्वचा - वातावरणातील आर्द्रता कमी झाली की रुक्ष त्वचेची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. मॉइश्चरायझर लावण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे आंघोळीनंतर लगेच- त्यावेळी त्वचा काहीशी ओलसर असते आणि रात्री झोपताना. कोमट पाण्यानेच आंघोळ करा. फार गरम पाणी टाळा. अति गरम पाण्याने त्वचा अधिक कोरडी पडते आणि खाज येते. गरम पाण्यामुळे केसही निस्तेज आणि रुक्ष दिसतात.