डॉ.अतुल जोशी, फिजिशिअन
तीव्र उन्हाळ्याच्या झळा संपल्या की पावसाचे आगमन होते. वरुणराजाची हजेरी लावली की धर्ती कशी शांत होते. पण दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने होणाऱ्या आजारांपासून वाचण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे उभे राहते. ते आव्हान पेलणं हेच मोठं संकट सध्या आरोग्य सेवेपुढे आहे. वातावरणातील बदलामुळे आर्द्रता वाढते. त्याशिवाय विविध प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. कारण विविध आजारांचे विषाणू, जीवाणूंच्या वाढीस पोषक हवामान मिळाल्याने त्यामध्ये वाढ होऊन आजारांचा उद्रेक होतो हे सर्वश्रूत आहे. हवेतील विषाणूमुळे अथवा पाण्यातील जीवाणूंमुळे हा आजार पसरत असतो.
अशा संमिश्र वातावरणातील बदलामधील आजारांमुळे एखादा व्यक्ती, रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. त्यावेळी त्यामागील कारण हे साधारण फ्लू अथवा इन्फ्लूएन्झा हेच असतं. अनेक प्रकारचे विषाणू नाकाद्वारे शरीरात जात असल्याने त्याचा संसर्ग होणारा फ्लूचा आजार आहे. हे विषाणू साधारण प्रकारचे असतात. इन्फ्लूएंझाची लक्षणं ही साधारण सर्दी, ताप, खोकल्याप्रमाणेच असतात. ही लक्षणं अचानकपणे सुरु होतात आणि नंतर त्याची तीव्रता वाढत जाते.
सर्दीच्या लक्षणाशिवाय अंगदुखी, स्नायूदुखी, खोकला, डोकेदुखी, छातीची जाळी होणं आणि घसादुखी यासारखी लक्षणंसुद्धा इन्फ्लूएन्झामध्ये आढळून येतात. काही वेळा रुग्णांना साधारण ताप देखील येतो. इन्फ्लूएन्झाची लक्षणं ही साधारण सर्दी, कोरडा खोकला, टॉन्सिलपासून सुरु होतात. त्यामुळे संपूर्ण शरीर दुखू लागते. साधारण फ्लू हा दोन आठवड्यापर्यंत राहतो. तर रात्रीच्या वेळी खोकला अधिक वाढतो.
फ्लूपासून वाचवण्यासाठी काही उपाय आहेत का? तर काही उपाय निश्चित अंमलात आणल्यास फ्लूच्या आजारापासून संरक्षण निश्चित मिळू शकतं.
संपर्क टाळा
फ्लूचा आजार झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात जाणं टाळायला हवं. इन्फ्लूएंझा झालेल्या व्यक्तींनी देखील सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळले पाहिजे. त्यांच्या संसर्गामुळे इतरांना आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. इन्फ्लूएंझा हा हवेतून पसरणारा आजार असल्याने त्याचा प्रसार तातडीने होतो. त्यामुळे आजार झालेल्या व्यक्तींसह इतरांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
हात स्वच्छ करा
शौचाला गेल्यानंतर अथवा बाहेरून आल्यानंतर तुमचे हात साबणाने अथवा स्वच्छ पाण्याने धुणं आवश्यक आहे. कारण बहुतांश वेळा आपल्या हातांना न दिसणारे जंतू अनेकदा चिकटलेले असतात. त्यामुळे हाताद्वारे अन्न अथवा खाद्यपदार्थाद्वारे जंतू पोटात जाण्याची शक्यता अधिक असते.
डोळे, नाक अथवा तोंडाला स्पर्श नको
जंतूचा वावर सर्वत्र असतो. जिथं आपण जाणते अजाणतपेणाने हात लावतो. त्या वस्तूंवर जंतूंचं अस्तित्व असतं. त्यामुळे त्या वस्तूंवर हात लावताच ते जंतू आपल्या हातांना चिकटण्याची शक्यता असते. परिणामी, जंतू चिकटलेले हात पुन्हा डोळ्यासह नाक, तोंडाला देखील लावल्यास त्यामुळे नाकासह तोंडावाटे ते जंतू पोटात प्रवेश करून शरीराला धोका पोहोचवू शकतात.
आरोग्यदायी जीवनशैली हवी
विविध आजारांपासून वाचण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी. त्याकरता नियमित व्यायाम, नियमित पुरेशी झोप, ताणतणावाचे व्यवस्थापन, पाण्याचे भरपूर सेवन आणि सकस आहार यासारखे काही नियम पाळायला हवेत. यामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी, आजारपण ही जवळ येत नाही.
साधारणपणे, इन्फ्लूएन्झाचा आजार हा स्वतःहून बरा होतो. परंतु काहीवेळा इन्फ्लूएन्झा हा गुंतागुंतीचा आणि घातकही ठरू शकतो. फ्लूची गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता काही व्यक्तींमध्ये अधिक असते. त्यामध्ये पाच वर्षाखालील मुले, ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरीक, आरोग्य सेवेत काम करणाऱ्या परिचारिकांसह कर्मचारी अथवा डॉक्टरसुद्धा. गर्भवती महिला, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, अस्थमा, हृदयविकार, मूत्रपिंड आणि मधुमेहासारखे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये अशाप्रकारचा इन्फ्लूएन्झा बळावण्याची शक्यता अधिक असते. याबाबत काळजी घेणं हाच उपाय आहे.
एकदा का फ्लूचा आजार जडला तर त्या रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी. त्याशिवाय गरम पेय घ्यावं. सर्दी, ताप, खोकला, छातीत जळजळणं अशी लक्षणं दिसतात. केमिस्टकडून रुग्णाने थेट औषधे घ्यावीत.
वारंवार येणाऱ्या खोकल्याकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये. तीन आठवड्यापेक्षा खोकला येत असले तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावं. त्यांच्याकडून तपासणी करून घ्यावी. तसेच योग्य ते उपचार घेणं यातच फ्लू असो की इन्फ्लूएन्झावरील उपचार फायदेशीर
ठरतात.
तीव्र उन्हाळ्याच्या झळा संपल्या की पावसाचे आगमन होते. वरुणराजाची हजेरी लावली की धर्ती कशी शांत होते. पण दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने होणाऱ्या आजारांपासून वाचण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे उभे राहते. ते आव्हान पेलणं हेच मोठं संकट सध्या आरोग्य सेवेपुढे आहे. वातावरणातील बदलामुळे आर्द्रता वाढते. त्याशिवाय विविध प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. कारण विविध आजारांचे विषाणू, जीवाणूंच्या वाढीस पोषक हवामान मिळाल्याने त्यामध्ये वाढ होऊन आजारांचा उद्रेक होतो हे सर्वश्रूत आहे. हवेतील विषाणूमुळे अथवा पाण्यातील जीवाणूंमुळे हा आजार पसरत असतो.
अशा संमिश्र वातावरणातील बदलामधील आजारांमुळे एखादा व्यक्ती, रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. त्यावेळी त्यामागील कारण हे साधारण फ्लू अथवा इन्फ्लूएन्झा हेच असतं. अनेक प्रकारचे विषाणू नाकाद्वारे शरीरात जात असल्याने त्याचा संसर्ग होणारा फ्लूचा आजार आहे. हे विषाणू साधारण प्रकारचे असतात. इन्फ्लूएंझाची लक्षणं ही साधारण सर्दी, ताप, खोकल्याप्रमाणेच असतात. ही लक्षणं अचानकपणे सुरु होतात आणि नंतर त्याची तीव्रता वाढत जाते.
सर्दीच्या लक्षणाशिवाय अंगदुखी, स्नायूदुखी, खोकला, डोकेदुखी, छातीची जाळी होणं आणि घसादुखी यासारखी लक्षणंसुद्धा इन्फ्लूएन्झामध्ये आढळून येतात. काही वेळा रुग्णांना साधारण ताप देखील येतो. इन्फ्लूएन्झाची लक्षणं ही साधारण सर्दी, कोरडा खोकला, टॉन्सिलपासून सुरु होतात. त्यामुळे संपूर्ण शरीर दुखू लागते. साधारण फ्लू हा दोन आठवड्यापर्यंत राहतो. तर रात्रीच्या वेळी खोकला अधिक वाढतो.
फ्लूपासून वाचवण्यासाठी काही उपाय आहेत का? तर काही उपाय निश्चित अंमलात आणल्यास फ्लूच्या आजारापासून संरक्षण निश्चित मिळू शकतं.
संपर्क टाळा
फ्लूचा आजार झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात जाणं टाळायला हवं. इन्फ्लूएंझा झालेल्या व्यक्तींनी देखील सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळले पाहिजे. त्यांच्या संसर्गामुळे इतरांना आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. इन्फ्लूएंझा हा हवेतून पसरणारा आजार असल्याने त्याचा प्रसार तातडीने होतो. त्यामुळे आजार झालेल्या व्यक्तींसह इतरांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
हात स्वच्छ करा
शौचाला गेल्यानंतर अथवा बाहेरून आल्यानंतर तुमचे हात साबणाने अथवा स्वच्छ पाण्याने धुणं आवश्यक आहे. कारण बहुतांश वेळा आपल्या हातांना न दिसणारे जंतू अनेकदा चिकटलेले असतात. त्यामुळे हाताद्वारे अन्न अथवा खाद्यपदार्थाद्वारे जंतू पोटात जाण्याची शक्यता अधिक असते.
डोळे, नाक अथवा तोंडाला स्पर्श नको
जंतूचा वावर सर्वत्र असतो. जिथं आपण जाणते अजाणतपेणाने हात लावतो. त्या वस्तूंवर जंतूंचं अस्तित्व असतं. त्यामुळे त्या वस्तूंवर हात लावताच ते जंतू आपल्या हातांना चिकटण्याची शक्यता असते. परिणामी, जंतू चिकटलेले हात पुन्हा डोळ्यासह नाक, तोंडाला देखील लावल्यास त्यामुळे नाकासह तोंडावाटे ते जंतू पोटात प्रवेश करून शरीराला धोका पोहोचवू शकतात.
आरोग्यदायी जीवनशैली हवी
विविध आजारांपासून वाचण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी. त्याकरता नियमित व्यायाम, नियमित पुरेशी झोप, ताणतणावाचे व्यवस्थापन, पाण्याचे भरपूर सेवन आणि सकस आहार यासारखे काही नियम पाळायला हवेत. यामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी, आजारपण ही जवळ येत नाही.
साधारणपणे, इन्फ्लूएन्झाचा आजार हा स्वतःहून बरा होतो. परंतु काहीवेळा इन्फ्लूएन्झा हा गुंतागुंतीचा आणि घातकही ठरू शकतो. फ्लूची गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता काही व्यक्तींमध्ये अधिक असते. त्यामध्ये पाच वर्षाखालील मुले, ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरीक, आरोग्य सेवेत काम करणाऱ्या परिचारिकांसह कर्मचारी अथवा डॉक्टरसुद्धा. गर्भवती महिला, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, अस्थमा, हृदयविकार, मूत्रपिंड आणि मधुमेहासारखे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये अशाप्रकारचा इन्फ्लूएन्झा बळावण्याची शक्यता अधिक असते. याबाबत काळजी घेणं हाच उपाय आहे.
एकदा का फ्लूचा आजार जडला तर त्या रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी. त्याशिवाय गरम पेय घ्यावं. सर्दी, ताप, खोकला, छातीत जळजळणं अशी लक्षणं दिसतात. केमिस्टकडून रुग्णाने थेट औषधे घ्यावीत.
वारंवार येणाऱ्या खोकल्याकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये. तीन आठवड्यापेक्षा खोकला येत असले तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावं. त्यांच्याकडून तपासणी करून घ्यावी. तसेच योग्य ते उपचार घेणं यातच फ्लू असो की इन्फ्लूएन्झावरील उपचार फायदेशीर
ठरतात.