डॉ. प्रदीप गाडगे, मधुमेहरोग तज्ज्ञ
उन्हाळ्याच्या दिवसात मधुमेहींना कसा त्रास होतो, हे आपण मागील लेखात पाहिलं. आजच्या लेखात उन्हाळ्याच्या दिवसात गरोदर महिलांनी कशी काळजी घ्यावी याची माहिती घेऊयात. तसंच वाढत्या तापमानाचा इन्सुलिनवर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयी आपण माहिती मिळवूयात.
गरोदर महिलांनी घ्यावयाची काळजी
गरोदर महिलांमध्ये तात्पुरता का होईना, पण मधुमेह वाढण्याचं प्रमाण आजकाल अधिक दिसून येतं. रोजच्या जीवनशैलीत गरोदरपणामुळे काही बदल करणं अपेक्षित असतं. पण तसं न केल्यास शरीरातलं साखरेचं प्रमाण वाढतं आणि मधुमेहाचा धोका संभवतो. परिणामी, प्रसुतीकाळात अडचणी निर्माण होण्याची भीती असते. गोड पदार्थ कमी खाणं, जास्तीत जास्त पाणी पिणं ही प्राथमिक काळजी या दिवसात गरोदर महिलांनी घ्यायला हवी.
इन्सुलिनबाबत थोडंसं...
मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी इन्सुलिन या संप्रेरकाचे डोस दिले जातात. त्या-त्या रुग्णांच्या शारीरिक कुवतीवर आणि मधुमेहाच्या प्रमाणावर हे डोस अवलंबून असतात. इन्सुलिनचे इंजेक्शन बऱ्याचदा रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक घरच्या घरीच घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात मात्र हे इन्सुलिन साठवून ठेवण्याच्या बाबतीत रुग्ण बऱ्याचदा निष्काळजीपणा करताना दिसतात. एका ठराविक थंड वातावरणात इन्सुलिनची इंजेक्शन्स साठवून ठेवावी लागतात, उन्हाळ्यात हे तापमान संतुलित राखणं जिकीरीचं जातं.
विशेषतः बाहेर फिरायला किंवा कामाच्या ठिकाणी गेल्यावर रुग्ण गाडीत असलेल्या बॅगेत ही इंजेक्शन्स ठेवून देतात, गाडी लॉक करून बाहेर पडतात. बंद गाडी प्रचंड तापते आणि काही तासात हे इन्सुलिन निकामी होऊन जाते. अशा रुग्णांच्या मधुमेह वाढल्याच्या तक्रारी या दिवसात जास्त येतात.
इन्सुलिनची इंजेक्शन्स किंवा अम्प्युल्स ड्रायआईसच्या पॅकमध्ये स्टोअर करता येते. ही पॅक्स बाजारात सहज उपलब्ध होतात. ८ ते १० तासांसाठी या पॅकमध्ये इन्सुलिन व्यवस्थित राहू शकते. विशेषतः बाहेर फिरायला गेल्यावर या गोष्टीचे भान प्रत्येक मधुमेही रुग्णाने ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत मधुमेहींसाठी खास उपचार
मधुमेह असलेल्या आणि मुत्रपिंडाचेही विकार असलेल्या रुग्णांच्या उपचारांत या दिवसांत विशेष बदल केले जातात. शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी करणाऱ्या डाययुरेटिक औषधांचा डोस या दिवसात कमी केला जातो. जेणेकरून शरीरात पाणी संतुलित प्रमाणात रहावं आणि रुग्णाला डिहायड्रेशनचा धोका संभवू नये.
रुग्णांनी घेण्याची काळजी
वर्षभर आपण आपल्या प्रत्येक आजाराबाबत जितके जागरुक असतो, त्यापेक्षा दुप्पट जागरुकता उन्हाळ्याच्या दिवसात राखणं अत्यावश्यक असतं. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण, रक्तदाब आणि लघवी यांची वारंवार तपासणी करून त्यात काही वर-खाली असेल तर त्यावर वेळीच उपचार घेणं गरजेचं असत. एखादी जखम झाल्यास, त्यावर डॉक्टरी इलाज करावा, ती चिघळू देऊ नये.
उन्हाळ्याच्या दिवसात मधुमेहींना कसा त्रास होतो, हे आपण मागील लेखात पाहिलं. आजच्या लेखात उन्हाळ्याच्या दिवसात गरोदर महिलांनी कशी काळजी घ्यावी याची माहिती घेऊयात. तसंच वाढत्या तापमानाचा इन्सुलिनवर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयी आपण माहिती मिळवूयात.
गरोदर महिलांनी घ्यावयाची काळजी
गरोदर महिलांमध्ये तात्पुरता का होईना, पण मधुमेह वाढण्याचं प्रमाण आजकाल अधिक दिसून येतं. रोजच्या जीवनशैलीत गरोदरपणामुळे काही बदल करणं अपेक्षित असतं. पण तसं न केल्यास शरीरातलं साखरेचं प्रमाण वाढतं आणि मधुमेहाचा धोका संभवतो. परिणामी, प्रसुतीकाळात अडचणी निर्माण होण्याची भीती असते. गोड पदार्थ कमी खाणं, जास्तीत जास्त पाणी पिणं ही प्राथमिक काळजी या दिवसात गरोदर महिलांनी घ्यायला हवी.
इन्सुलिनबाबत थोडंसं...
मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी इन्सुलिन या संप्रेरकाचे डोस दिले जातात. त्या-त्या रुग्णांच्या शारीरिक कुवतीवर आणि मधुमेहाच्या प्रमाणावर हे डोस अवलंबून असतात. इन्सुलिनचे इंजेक्शन बऱ्याचदा रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक घरच्या घरीच घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात मात्र हे इन्सुलिन साठवून ठेवण्याच्या बाबतीत रुग्ण बऱ्याचदा निष्काळजीपणा करताना दिसतात. एका ठराविक थंड वातावरणात इन्सुलिनची इंजेक्शन्स साठवून ठेवावी लागतात, उन्हाळ्यात हे तापमान संतुलित राखणं जिकीरीचं जातं.
विशेषतः बाहेर फिरायला किंवा कामाच्या ठिकाणी गेल्यावर रुग्ण गाडीत असलेल्या बॅगेत ही इंजेक्शन्स ठेवून देतात, गाडी लॉक करून बाहेर पडतात. बंद गाडी प्रचंड तापते आणि काही तासात हे इन्सुलिन निकामी होऊन जाते. अशा रुग्णांच्या मधुमेह वाढल्याच्या तक्रारी या दिवसात जास्त येतात.
इन्सुलिनची इंजेक्शन्स किंवा अम्प्युल्स ड्रायआईसच्या पॅकमध्ये स्टोअर करता येते. ही पॅक्स बाजारात सहज उपलब्ध होतात. ८ ते १० तासांसाठी या पॅकमध्ये इन्सुलिन व्यवस्थित राहू शकते. विशेषतः बाहेर फिरायला गेल्यावर या गोष्टीचे भान प्रत्येक मधुमेही रुग्णाने ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत मधुमेहींसाठी खास उपचार
मधुमेह असलेल्या आणि मुत्रपिंडाचेही विकार असलेल्या रुग्णांच्या उपचारांत या दिवसांत विशेष बदल केले जातात. शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी करणाऱ्या डाययुरेटिक औषधांचा डोस या दिवसात कमी केला जातो. जेणेकरून शरीरात पाणी संतुलित प्रमाणात रहावं आणि रुग्णाला डिहायड्रेशनचा धोका संभवू नये.
रुग्णांनी घेण्याची काळजी
वर्षभर आपण आपल्या प्रत्येक आजाराबाबत जितके जागरुक असतो, त्यापेक्षा दुप्पट जागरुकता उन्हाळ्याच्या दिवसात राखणं अत्यावश्यक असतं. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण, रक्तदाब आणि लघवी यांची वारंवार तपासणी करून त्यात काही वर-खाली असेल तर त्यावर वेळीच उपचार घेणं गरजेचं असत. एखादी जखम झाल्यास, त्यावर डॉक्टरी इलाज करावा, ती चिघळू देऊ नये.