डॉ. अविनाश भोंडवे
उच्च रक्तदाबाचा त्रास होण्यास भारतीयांची जनुकीय परिस्थिती कारणीभूत आहे, ही शास्त्रीय मीमांसा प्रसिद्धच आहे. त्याबाबत आपण काहीच करू शकत नाही. मात्र, आधुनिक जीवनशैलीतून उद्भवणारे दोष टाळणं किंवा नियंत्रित ठेवणं आपल्याला सहज शक्य आहे.
उच्च रक्तदाब म्हणजे आजच्या जीवनशैलीचा परिपाक. वेगवेगळ्या सर्वेक्षणातून आणि संशोधनातून भारतीय नागरिकांमध्ये याचं प्रमाण सतत वाढतंय हे दिसून आलंय. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, तर फेब्रुवारी २०१८मध्ये ‘पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स’ (पीएलओएस वन) तर्फे संशोधनपूर्ण अहवाल प्रकाशित झाला. यानुसार महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये घरोघर जाऊन सॅम्पल सर्व्हे केला गेला. यात सर्व वयोगट; विवाहित, अविवाहित, विभक्त, घटस्फोटित, विधवा असे स्त्रीपुरुष; सर्व धर्म, पंथ, जाती; सुशिक्षित-अशिक्षित, अर्ध शिक्षित; व्यायाम करणारे, न करणारे; निर्व्यसनी, व्यसनाधीन, व्यसनमुक्त; निरोगी आणि काही आजार असणारे तसंच साऱ्या आर्थिक स्तरांमधील व्यक्तींचा समावेश होता. या अहवालामध्ये काही लाख व्यक्तींच्या तपासणीनंतर महाराष्ट्रातील रक्तदाबाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी नजरेसमोर आणण्यात आल्या आहेत.
वयाची पंचविशी पार केलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींपैकी २५ टक्के व्यक्ती उच्च रक्तदाबानं पीडित आहेत. हे प्रमाण मुंबई, पुणे, नाशिक आणि अमरावती या शहरांमध्ये ३० टक्क्यांच्या आसपास आहे, तर थोड्या मागासलेल्या धुळे, गडचिरोली या जिल्ह्यात तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. म्हणजेच अधिक प्रगत विभागात याचं प्रमाण अधिक आहे.
मात्र, जिल्ह्यांपेक्षा आणि विभागांपेक्षा, प्रत्येक समाजातील खाद्यपद्धतीतील आणि जीवनशैलीतील दोष यावर रक्तदाबानं पीडित व्यक्तींचं प्रमाण अधिक अवलंबून असतं. •महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये ४० टक्के व्यक्ती उच्च रक्तदाबानं त्रस्त आहेत.
अविवाहित व्यक्तींमध्ये १५.९ टक्के, विवाहितांमध्ये २५.५ तर अविवाहित/विभक्त आणि विधवा/विधुरांमध्ये ३७ टक्के प्रमाण आढळलं. यात तिशीच्या आतील घटस्फोटित/विभक्त व्यक्तींमध्ये फक्त १६ टक्के असलेलं प्रमाण त्यानंतरच्या वयोगटात ४३ टक्क्यांपर्यंत गेलेलं आढळलं. वंचित समाजांमध्ये, अल्पसंख्यांक जमातींमध्ये, आणि वैवाहिक जीवनात असफल व्यक्तींमध्ये याचं प्रमाण अधिक आहे.
•एकूणातील मराठी स्त्री-पुरुषांमध्ये पुरुषांना रक्तदाबाचा त्रास असण्याचं प्रमाण अधिक आहे. मात्र, पन्नाशी उलटल्यानंतरच्या वयोगटांत स्त्रियांचं प्रमाण ४२ टक्के, तर त्याच वयोगटांत पुरुषांचं प्रमाण ३९.४ टक्के आहे. एकुणात २८ टक्के पुरुष या विकारानं पीडित आहेत. धुम्रपान करणाऱ्यात ३१ टक्के, मद्यपानाचं व्यसन असणाऱ्यात ३० टक्के, तर स्थूल व्यक्तीत ३८ टक्के व्यक्ती रक्तदाबानं पीडित असल्याचं आढळलं. या सर्वेक्षणामध्ये रक्तदाबाबाबत काही मूलभूत मुद्दे स्पष्ट झाले आहेत; पण आजच्या जीवनशैलीमधून निर्माण होणाऱ्या काही अपरिहार्य गोष्टीही या विकाराला कारणीभूत ठरताहेत. उच्च रक्तदाबाचा विकार वयानुसार वाढतो आणि लिंगभेदानुसार बदलतो; पण हे सर्वच आजारात आढळते आणि त्या काही कुणाच्या हातातातील गोष्टी नाहीत.
आजच्या जीवनशैलीत मुलामुलींमध्ये लग्नाचं वय वाढतंय. तिशीमध्ये लग्नं होत आहेत. त्यानंतरच्या या विवाहित वयोगटात घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. लग्न होऊन वेगळ्या राहणाऱ्या आणि अविवाहित राहणाऱ्या व्यक्तीत उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात आढळतो, हे आजच्या जीवनशैलीचं अपरिहार्य फलित आहे. आजच्या जीवनात अतिरिक्त मांसाहार आणि व्यसनं ही काही सामाजिक गटांमध्ये, नवश्रीमंतांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जातात. त्याचा परिणाम या सर्वेक्षणात दिसून आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील आर्थिकदृष्ट्या प्रगत, कार्यप्रवण, सुशिक्षित नवयुवकांमध्ये फास्टफूड आणि जंकफूडचं प्रमाण अधिक आहे. शारीरिक श्रम आणि व्यायामाचं वळण कमी आहे, त्यामुळे रक्तदाबाचं प्रमाणही जास्त आढळतं. या सर्वेक्षणात एकाच पद्धतीच्या दोन गटात जीवनशैलीतील अशा कारणांमुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता १४ टक्क्यांनी वाढते असं नमूद करण्यात आलं आहे.
औषधं टाळणं
महाराष्ट्र राज्याच्या ‘डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस’च्या कार्यालयानं २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षातील रक्तदाब तपासणीबाबत प्रसिद्ध केलेल्या एका आकडेवारीमधून आणखी एक वेगळी गोष्ट नजरेसमोर आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यखात्यानं सुमारे ६० लाख व्यक्तींची तपासणी केली. यामध्ये ज्यांना रक्तदाबाचा विकार आढळला, त्यातील ५६ हजाराहून अधिक म्हणजे तब्बल २२ टक्के रुग्ण, पुन्हा तपासणीला येत नाहीत आणि औषधंही घेत नाहीत असं दिसून आलं आहे. एकदा हा त्रास सुरू झाला, की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील, या विचारानं घाबरून आणि दबून जाणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. उपचाराबाबतच्या या टाळाटाळीची कारणं म्हणजे आरोग्यदृष्ट्या असलेलं अज्ञान, आरोग्याबाबत जागरूकतेचा अभाव आणि उच्च रक्तदाबाबाबतचे गैरसमज हीच असतात.
रक्तदाबाचं निदान झाल्यावर तो नियंत्रित न ठेवल्यानं हृदयविकार, मेंदूत रक्तस्त्राव होऊन अर्धांगवायूचा झटका येणं, मूत्रपिंडं निकामी होणं, दृष्टिपटलावर रक्तस्त्राव होऊन अंधत्व येणं असे अनेक गंभीर परिणाम घडून येतात. भारतातील मूत्युविषयक कारणांमध्ये हे सर्व आजार आघाडीवर आहेत. उच्च रक्तदाबाच्या विकाराचं निदान झाल्यावर त्यासाठी असलेले शास्त्रीय उपचार, अर्धवट ज्ञान आणि मनातील सर्व शंका दूर ठेवून, नियमितपणे आणि कायमस्वरूपी घेणं ही गोष्ट नक्कीच आपल्या हातात आहे.
उच्च रक्तदाबाचा त्रास होण्यास भारतीयांची जनुकीय परिस्थिती कारणीभूत आहे, ही शास्त्रीय मीमांसा प्रसिद्धच आहे. त्याबाबत आपण काहीच करू शकत नाही. मात्र, आधुनिक जीवनशैलीतून उद्भवणारे दोष टाळणं किंवा नियंत्रित ठेवणं आपल्याला सहज शक्य आहे.
उच्च रक्तदाब म्हणजे आजच्या जीवनशैलीचा परिपाक. वेगवेगळ्या सर्वेक्षणातून आणि संशोधनातून भारतीय नागरिकांमध्ये याचं प्रमाण सतत वाढतंय हे दिसून आलंय. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, तर फेब्रुवारी २०१८मध्ये ‘पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स’ (पीएलओएस वन) तर्फे संशोधनपूर्ण अहवाल प्रकाशित झाला. यानुसार महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये घरोघर जाऊन सॅम्पल सर्व्हे केला गेला. यात सर्व वयोगट; विवाहित, अविवाहित, विभक्त, घटस्फोटित, विधवा असे स्त्रीपुरुष; सर्व धर्म, पंथ, जाती; सुशिक्षित-अशिक्षित, अर्ध शिक्षित; व्यायाम करणारे, न करणारे; निर्व्यसनी, व्यसनाधीन, व्यसनमुक्त; निरोगी आणि काही आजार असणारे तसंच साऱ्या आर्थिक स्तरांमधील व्यक्तींचा समावेश होता. या अहवालामध्ये काही लाख व्यक्तींच्या तपासणीनंतर महाराष्ट्रातील रक्तदाबाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी नजरेसमोर आणण्यात आल्या आहेत.
वयाची पंचविशी पार केलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींपैकी २५ टक्के व्यक्ती उच्च रक्तदाबानं पीडित आहेत. हे प्रमाण मुंबई, पुणे, नाशिक आणि अमरावती या शहरांमध्ये ३० टक्क्यांच्या आसपास आहे, तर थोड्या मागासलेल्या धुळे, गडचिरोली या जिल्ह्यात तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. म्हणजेच अधिक प्रगत विभागात याचं प्रमाण अधिक आहे.
मात्र, जिल्ह्यांपेक्षा आणि विभागांपेक्षा, प्रत्येक समाजातील खाद्यपद्धतीतील आणि जीवनशैलीतील दोष यावर रक्तदाबानं पीडित व्यक्तींचं प्रमाण अधिक अवलंबून असतं. •महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये ४० टक्के व्यक्ती उच्च रक्तदाबानं त्रस्त आहेत.
अविवाहित व्यक्तींमध्ये १५.९ टक्के, विवाहितांमध्ये २५.५ तर अविवाहित/विभक्त आणि विधवा/विधुरांमध्ये ३७ टक्के प्रमाण आढळलं. यात तिशीच्या आतील घटस्फोटित/विभक्त व्यक्तींमध्ये फक्त १६ टक्के असलेलं प्रमाण त्यानंतरच्या वयोगटात ४३ टक्क्यांपर्यंत गेलेलं आढळलं. वंचित समाजांमध्ये, अल्पसंख्यांक जमातींमध्ये, आणि वैवाहिक जीवनात असफल व्यक्तींमध्ये याचं प्रमाण अधिक आहे.
•एकूणातील मराठी स्त्री-पुरुषांमध्ये पुरुषांना रक्तदाबाचा त्रास असण्याचं प्रमाण अधिक आहे. मात्र, पन्नाशी उलटल्यानंतरच्या वयोगटांत स्त्रियांचं प्रमाण ४२ टक्के, तर त्याच वयोगटांत पुरुषांचं प्रमाण ३९.४ टक्के आहे. एकुणात २८ टक्के पुरुष या विकारानं पीडित आहेत. धुम्रपान करणाऱ्यात ३१ टक्के, मद्यपानाचं व्यसन असणाऱ्यात ३० टक्के, तर स्थूल व्यक्तीत ३८ टक्के व्यक्ती रक्तदाबानं पीडित असल्याचं आढळलं. या सर्वेक्षणामध्ये रक्तदाबाबाबत काही मूलभूत मुद्दे स्पष्ट झाले आहेत; पण आजच्या जीवनशैलीमधून निर्माण होणाऱ्या काही अपरिहार्य गोष्टीही या विकाराला कारणीभूत ठरताहेत. उच्च रक्तदाबाचा विकार वयानुसार वाढतो आणि लिंगभेदानुसार बदलतो; पण हे सर्वच आजारात आढळते आणि त्या काही कुणाच्या हातातातील गोष्टी नाहीत.
आजच्या जीवनशैलीत मुलामुलींमध्ये लग्नाचं वय वाढतंय. तिशीमध्ये लग्नं होत आहेत. त्यानंतरच्या या विवाहित वयोगटात घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. लग्न होऊन वेगळ्या राहणाऱ्या आणि अविवाहित राहणाऱ्या व्यक्तीत उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात आढळतो, हे आजच्या जीवनशैलीचं अपरिहार्य फलित आहे. आजच्या जीवनात अतिरिक्त मांसाहार आणि व्यसनं ही काही सामाजिक गटांमध्ये, नवश्रीमंतांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जातात. त्याचा परिणाम या सर्वेक्षणात दिसून आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील आर्थिकदृष्ट्या प्रगत, कार्यप्रवण, सुशिक्षित नवयुवकांमध्ये फास्टफूड आणि जंकफूडचं प्रमाण अधिक आहे. शारीरिक श्रम आणि व्यायामाचं वळण कमी आहे, त्यामुळे रक्तदाबाचं प्रमाणही जास्त आढळतं. या सर्वेक्षणात एकाच पद्धतीच्या दोन गटात जीवनशैलीतील अशा कारणांमुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता १४ टक्क्यांनी वाढते असं नमूद करण्यात आलं आहे.
औषधं टाळणं
महाराष्ट्र राज्याच्या ‘डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस’च्या कार्यालयानं २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षातील रक्तदाब तपासणीबाबत प्रसिद्ध केलेल्या एका आकडेवारीमधून आणखी एक वेगळी गोष्ट नजरेसमोर आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यखात्यानं सुमारे ६० लाख व्यक्तींची तपासणी केली. यामध्ये ज्यांना रक्तदाबाचा विकार आढळला, त्यातील ५६ हजाराहून अधिक म्हणजे तब्बल २२ टक्के रुग्ण, पुन्हा तपासणीला येत नाहीत आणि औषधंही घेत नाहीत असं दिसून आलं आहे. एकदा हा त्रास सुरू झाला, की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील, या विचारानं घाबरून आणि दबून जाणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. उपचाराबाबतच्या या टाळाटाळीची कारणं म्हणजे आरोग्यदृष्ट्या असलेलं अज्ञान, आरोग्याबाबत जागरूकतेचा अभाव आणि उच्च रक्तदाबाबाबतचे गैरसमज हीच असतात.
रक्तदाबाचं निदान झाल्यावर तो नियंत्रित न ठेवल्यानं हृदयविकार, मेंदूत रक्तस्त्राव होऊन अर्धांगवायूचा झटका येणं, मूत्रपिंडं निकामी होणं, दृष्टिपटलावर रक्तस्त्राव होऊन अंधत्व येणं असे अनेक गंभीर परिणाम घडून येतात. भारतातील मूत्युविषयक कारणांमध्ये हे सर्व आजार आघाडीवर आहेत. उच्च रक्तदाबाच्या विकाराचं निदान झाल्यावर त्यासाठी असलेले शास्त्रीय उपचार, अर्धवट ज्ञान आणि मनातील सर्व शंका दूर ठेवून, नियमितपणे आणि कायमस्वरूपी घेणं ही गोष्ट नक्कीच आपल्या हातात आहे.