डॉ. अशोक ताम्हणकर, राष्ट्रीय समन्वयक, प्रतीजैविक प्रतिरोध व्यवस्थापन समिती
जागतिक आरोग्य संघटनेने असं अनुमान केलं आहे की, जर प्रतिजैविकांच्या (antibiotics) अयोग्य वापरावर वेळीच निर्बंध घातले नाहीत तर पुढील काही वर्षात जिवाणूंच्या (Bacteria) संसर्गाने झालेल्या रोगांनी मरणाऱ्या लोकांची संख्या लक्षावधीच्या घरात जाईल.
जागतिक आरोग्य संघटनेने असं अनुमान केलं आहे की, जर प्रतिजैविकांच्या (antibiotics) अयोग्य वापरावर वेळीच निर्बंध घातले नाहीत तर पुढील काही वर्षात जिवाणूंच्या (Bacteria) संसर्गाने झालेल्या रोगांनी मरणाऱ्या लोकांची संख्या लक्षावधीच्या घरात जाईल. कारण जीवाणू प्रतिजैविकांना दाद देईनासे झाले आहेत. असा वारंवार अनुभव येऊ लागला आहे की आपला जिवलग नातेवाईक वा मित्र संसर्गाच्या रोगाने आजारी पडतो. एका प्रतिजैविकाला त्याचा आजार दाद देत नाही. मग दुसरे प्रतिजैविक वापरुन पाहिले जाते, ते पण लागू पडत नाही. आजार बळावतो.
स्पेशल कक्षात ठेवायची पाळी येते. आपण काळजीत पडतो. काही वेळा नशिबाने तिसरे प्रतिजैविक लागू पडते. पण तोपर्यंत आपण देव, नशीब सगळे घाऊक रीत्या वापरुन पाहिलेले असते. काकुळतीला आलेले असतो. परंतु कुठलेच प्रतिजैविक जर उपयोगी आले नाही तर मग मात्र कठीण प्रसंग येतो. आपण सगळे जर वेळीच जागरूक झालो नाही, तर असे अनुभव यापुढे वारंवार येऊ लागतील.
अलेक्झांडर फ्लेमिंगने १९२८ मध्ये पहिल्या प्रतिजैविकाचा म्हणजेच पेनिसिलीनचा शोध लावला. १९३२मध्ये जर्मनीत सल्फाचा प्रतिजैविक गुणधर्म लक्षात आला व जादू झाल्यासारखे जिवाणूंमुळे होणारे रोग आपल्या आवाक्यात आले. कारण फ्लेमिंगच्या पहिल्या संशोधनाने अनेक शास्त्रज्ञांना नवनवीन प्रतिजैविकांचा शोध घेण्यास प्रवृत्त केले. या अनेक प्रतिजैविकांच्या उपलब्धतेमुळे सगळ्या प्रकारचे संसर्गजन्य रोग सहज बरे होऊ लागले. जीवघेण्या जखमा सहज बऱ्या होऊ लागल्या. अपघातात जखमी झालेले लोक, युद्धात जायबंदी झालेले जवान, त्यांच्या जखमा सहज बऱ्या झाल्यामुळे परत काम करू लागले. शस्त्रक्रियांमध्ये पूर्वी जीवाणू संसर्गामुळे हमखास मृत्यू व्हायचे, प्रतिजैविकांच्या वापरामुळे ते जवळपास नाहीसे झाले.
याचा एक परिणाम असाही झाला की प्रतिजैविकांचा अनिर्बंध वापर सुरु झाला. थोडंसं जरी बरं नसलं तरी डॉक्टरांनी सर्रास प्रतिजैविके देण्यास सुरुवात केली. डॉक्टर देत नसतील तर आपण ती त्यांना द्यायला लावली. औषधाच्या दुकानात जाऊन आपण ती स्वत:च मागू लागलो. कुठलेही प्रशिक्षण नसताना औषधांचे दुकानदार अशी प्रतिजैविके आपणास देऊही लागले. प्रतिजैविकांच्या वापराचे सगळे विश्वच अनियंत्रित झाले.
ही पाळी आपल्यावर का आली हे समजून घेण्यासाठी प्रतिजैविके कशी काम करतात, जिवाणूंवर त्यांचा काय परिणाम होतो, जिवाणूंमध्ये प्रतिजैविक-प्रतिरोध कसा निर्माण होतो, आपण प्रतिजैविके निकामी न होता आपल्याला नेहमीच उपयोगी यावीत यासाठी काय करू शकतो हे समजून घेणं आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने असं अनुमान केलं आहे की, जर प्रतिजैविकांच्या (antibiotics) अयोग्य वापरावर वेळीच निर्बंध घातले नाहीत तर पुढील काही वर्षात जिवाणूंच्या (Bacteria) संसर्गाने झालेल्या रोगांनी मरणाऱ्या लोकांची संख्या लक्षावधीच्या घरात जाईल.
जागतिक आरोग्य संघटनेने असं अनुमान केलं आहे की, जर प्रतिजैविकांच्या (antibiotics) अयोग्य वापरावर वेळीच निर्बंध घातले नाहीत तर पुढील काही वर्षात जिवाणूंच्या (Bacteria) संसर्गाने झालेल्या रोगांनी मरणाऱ्या लोकांची संख्या लक्षावधीच्या घरात जाईल. कारण जीवाणू प्रतिजैविकांना दाद देईनासे झाले आहेत. असा वारंवार अनुभव येऊ लागला आहे की आपला जिवलग नातेवाईक वा मित्र संसर्गाच्या रोगाने आजारी पडतो. एका प्रतिजैविकाला त्याचा आजार दाद देत नाही. मग दुसरे प्रतिजैविक वापरुन पाहिले जाते, ते पण लागू पडत नाही. आजार बळावतो.
स्पेशल कक्षात ठेवायची पाळी येते. आपण काळजीत पडतो. काही वेळा नशिबाने तिसरे प्रतिजैविक लागू पडते. पण तोपर्यंत आपण देव, नशीब सगळे घाऊक रीत्या वापरुन पाहिलेले असते. काकुळतीला आलेले असतो. परंतु कुठलेच प्रतिजैविक जर उपयोगी आले नाही तर मग मात्र कठीण प्रसंग येतो. आपण सगळे जर वेळीच जागरूक झालो नाही, तर असे अनुभव यापुढे वारंवार येऊ लागतील.
अलेक्झांडर फ्लेमिंगने १९२८ मध्ये पहिल्या प्रतिजैविकाचा म्हणजेच पेनिसिलीनचा शोध लावला. १९३२मध्ये जर्मनीत सल्फाचा प्रतिजैविक गुणधर्म लक्षात आला व जादू झाल्यासारखे जिवाणूंमुळे होणारे रोग आपल्या आवाक्यात आले. कारण फ्लेमिंगच्या पहिल्या संशोधनाने अनेक शास्त्रज्ञांना नवनवीन प्रतिजैविकांचा शोध घेण्यास प्रवृत्त केले. या अनेक प्रतिजैविकांच्या उपलब्धतेमुळे सगळ्या प्रकारचे संसर्गजन्य रोग सहज बरे होऊ लागले. जीवघेण्या जखमा सहज बऱ्या होऊ लागल्या. अपघातात जखमी झालेले लोक, युद्धात जायबंदी झालेले जवान, त्यांच्या जखमा सहज बऱ्या झाल्यामुळे परत काम करू लागले. शस्त्रक्रियांमध्ये पूर्वी जीवाणू संसर्गामुळे हमखास मृत्यू व्हायचे, प्रतिजैविकांच्या वापरामुळे ते जवळपास नाहीसे झाले.
याचा एक परिणाम असाही झाला की प्रतिजैविकांचा अनिर्बंध वापर सुरु झाला. थोडंसं जरी बरं नसलं तरी डॉक्टरांनी सर्रास प्रतिजैविके देण्यास सुरुवात केली. डॉक्टर देत नसतील तर आपण ती त्यांना द्यायला लावली. औषधाच्या दुकानात जाऊन आपण ती स्वत:च मागू लागलो. कुठलेही प्रशिक्षण नसताना औषधांचे दुकानदार अशी प्रतिजैविके आपणास देऊही लागले. प्रतिजैविकांच्या वापराचे सगळे विश्वच अनियंत्रित झाले.
ही पाळी आपल्यावर का आली हे समजून घेण्यासाठी प्रतिजैविके कशी काम करतात, जिवाणूंवर त्यांचा काय परिणाम होतो, जिवाणूंमध्ये प्रतिजैविक-प्रतिरोध कसा निर्माण होतो, आपण प्रतिजैविके निकामी न होता आपल्याला नेहमीच उपयोगी यावीत यासाठी काय करू शकतो हे समजून घेणं आवश्यक आहे.