- डॉ प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी
फ्लू हा खऱ्या अर्थाने 'आंतरराष्ट्रीय' आजार आहे. तो जगातल्या सर्व देशांत आढळतो. फ्लू इतक्या वेगाने का पसरू शकतो, याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.
फ्लूचा अधिशयन कालावधी एक ते सात दिवस एवढा कमी आहे. हा आजार हवेवाटे, रुग्णाच्या शिंकण्यातून आणि खोकल्यातून उडणाऱ्या थेंबांतून पसरतो. एका साध्या वाटणाऱ्या शिंकेत सुमारे चाळीस हजार थेंब असतात, हे लक्षात घेतले, तर हा प्रसार किती वेगात होतो, हे ध्यानात येईल. त्यात थंड हवामानात वाऱ्याचा वेग कमी असल्याने हे थेंब हवेत अधिक काळ तरंगतात. त्यामुळे प्रसाराचा वेग अजून वाढतो. फ्लू झाल्यामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती ही अत्यंत अल्पजीवी असते. ती केवळ सहा-आठ महिने टिकते. त्यामुळे एका मोसमात आपल्याला फ्लू झाला, तरी पुढल्या मोसमासाठी इम्युनिटी मिळत नाही. शिवाय ही इम्युनिटी त्या त्या विषाणूपुरती असते. म्हणजे एच१एन१ची इम्युनिटी एच३एन२साठी उपयोगी पडत नाही. लक्षणे आढळणारे फ्लू रुग्ण जेवढे आढळतात, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोक हे फ्लू विषाणू शरीरात जाऊनही लक्षणविरहित असतात. अशा अनेक कारणांमुळे फ्लू खूप वेगाने पसरतो. त्यात भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या देशात त्याचा प्रसाराचा वेग अधिकच वाढतो. ग्रामीण भागापेक्षा तो शहरी भागात अधिक सापडतो, त्याचे कारणही तेच आहे. प्रौढांमध्ये त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण ५-१०%, तर मुलांमध्ये २०-३०% एवढे आहे. आजही दरवर्षी जगभरात सुमारे साडेसहा लाख लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लू विषाणूमुळे मृत्युमुखी पडतात, असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. अमेरिकेत फ्लू हे मृत्यूचे सहाव्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे.
भारतातील इन्फ्लूएन्झाचा नेमका मोसम कोणता, या प्रश्नाचे उत्तर भारताच्या भूगोलाइतकेच गुंतागुंतीचे आहे. शीत कटिबंधात नेमका फ्लूचा मोसम सांगता येतो. तो म्हणजे तेथील हिवाळा…! थंड कोरडे असे या हवामानाचे वर्णन केले जाते. या कालावधीतील कमी तापमान आणि त्यासोबतच कमी आर्द्रता, वाऱ्याचा कमी वेग यामुळे फ्लूच्या प्रसारास मदत होते. या काळात थंडीमुळे अधिक काळ घरातच राहणारे लोक, त्यामुळे वाढणारा जनसंपर्क, घरातील दाटीवाटी या कारणांमुळे फ्लू प्रसारास हातभार लागतो. हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे अनेकांमध्ये निर्माण होणारी ड जीवनसत्त्वाची कमतरतादेखील फ्लू प्रसारास हातभार लावते, असे अनेकांचे मत! उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात मात्र फ्लूचा नेमका मोसम सांगणे महाकठीण…! त्यात भारताचे हवामान गुंतागुंतीचे. म्हणजे कच्छचे रण ते मिझोराम यातून कर्कवृत्त जाते. भारतातील या रेघेखालील भाग उष्ण कटिबंधात, तर वरील भाग समशीतोष्ण कटिबंधात मोडतो. या प्रकारच्या हवामानात फ्लूचा नेमका मोसम निश्चित करणे कठीण असते. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूत जरी फ्लूच्या केसेस अधिक आढळत असल्या, तरी हवामानातील विषमता आणि भारतासारख्या देशात लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर होणारे तात्पुरते तसेच कायमस्वरुपी स्थलांतर यामुळे जवळपास वर्षभर फ्लू रुग्ण कमी-जास्त प्रमाणात आढळत राहतात. मात्र समुद्राकाठच्या प्रदेशातील किमान आणि कमाल तापमानातील असलेले अत्यंत कमी अंतर या प्रदेशाला तुलनात्मकदृष्ट्या फ्लूपासून दूर ठेवते.
फ्लू हा खऱ्या अर्थाने 'आंतरराष्ट्रीय' आजार आहे. तो जगातल्या सर्व देशांत आढळतो. फ्लू इतक्या वेगाने का पसरू शकतो, याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.
फ्लूचा अधिशयन कालावधी एक ते सात दिवस एवढा कमी आहे. हा आजार हवेवाटे, रुग्णाच्या शिंकण्यातून आणि खोकल्यातून उडणाऱ्या थेंबांतून पसरतो. एका साध्या वाटणाऱ्या शिंकेत सुमारे चाळीस हजार थेंब असतात, हे लक्षात घेतले, तर हा प्रसार किती वेगात होतो, हे ध्यानात येईल. त्यात थंड हवामानात वाऱ्याचा वेग कमी असल्याने हे थेंब हवेत अधिक काळ तरंगतात. त्यामुळे प्रसाराचा वेग अजून वाढतो. फ्लू झाल्यामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती ही अत्यंत अल्पजीवी असते. ती केवळ सहा-आठ महिने टिकते. त्यामुळे एका मोसमात आपल्याला फ्लू झाला, तरी पुढल्या मोसमासाठी इम्युनिटी मिळत नाही. शिवाय ही इम्युनिटी त्या त्या विषाणूपुरती असते. म्हणजे एच१एन१ची इम्युनिटी एच३एन२साठी उपयोगी पडत नाही. लक्षणे आढळणारे फ्लू रुग्ण जेवढे आढळतात, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोक हे फ्लू विषाणू शरीरात जाऊनही लक्षणविरहित असतात. अशा अनेक कारणांमुळे फ्लू खूप वेगाने पसरतो. त्यात भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या देशात त्याचा प्रसाराचा वेग अधिकच वाढतो. ग्रामीण भागापेक्षा तो शहरी भागात अधिक सापडतो, त्याचे कारणही तेच आहे. प्रौढांमध्ये त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण ५-१०%, तर मुलांमध्ये २०-३०% एवढे आहे. आजही दरवर्षी जगभरात सुमारे साडेसहा लाख लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लू विषाणूमुळे मृत्युमुखी पडतात, असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. अमेरिकेत फ्लू हे मृत्यूचे सहाव्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे.
भारतातील इन्फ्लूएन्झाचा नेमका मोसम कोणता, या प्रश्नाचे उत्तर भारताच्या भूगोलाइतकेच गुंतागुंतीचे आहे. शीत कटिबंधात नेमका फ्लूचा मोसम सांगता येतो. तो म्हणजे तेथील हिवाळा…! थंड कोरडे असे या हवामानाचे वर्णन केले जाते. या कालावधीतील कमी तापमान आणि त्यासोबतच कमी आर्द्रता, वाऱ्याचा कमी वेग यामुळे फ्लूच्या प्रसारास मदत होते. या काळात थंडीमुळे अधिक काळ घरातच राहणारे लोक, त्यामुळे वाढणारा जनसंपर्क, घरातील दाटीवाटी या कारणांमुळे फ्लू प्रसारास हातभार लागतो. हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे अनेकांमध्ये निर्माण होणारी ड जीवनसत्त्वाची कमतरतादेखील फ्लू प्रसारास हातभार लावते, असे अनेकांचे मत! उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात मात्र फ्लूचा नेमका मोसम सांगणे महाकठीण…! त्यात भारताचे हवामान गुंतागुंतीचे. म्हणजे कच्छचे रण ते मिझोराम यातून कर्कवृत्त जाते. भारतातील या रेघेखालील भाग उष्ण कटिबंधात, तर वरील भाग समशीतोष्ण कटिबंधात मोडतो. या प्रकारच्या हवामानात फ्लूचा नेमका मोसम निश्चित करणे कठीण असते. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूत जरी फ्लूच्या केसेस अधिक आढळत असल्या, तरी हवामानातील विषमता आणि भारतासारख्या देशात लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर होणारे तात्पुरते तसेच कायमस्वरुपी स्थलांतर यामुळे जवळपास वर्षभर फ्लू रुग्ण कमी-जास्त प्रमाणात आढळत राहतात. मात्र समुद्राकाठच्या प्रदेशातील किमान आणि कमाल तापमानातील असलेले अत्यंत कमी अंतर या प्रदेशाला तुलनात्मकदृष्ट्या फ्लूपासून दूर ठेवते.