डॉ. स्वाती वाघमारे, बालरोग तज्ज्ञ तथा चाइल्ड सायकॉलिस्ट, नागपूर
किशोरवय म्हणजे १० ते १९ वयोगट. भारतातील जनसंख्येच्या २२ टक्के या वयोगटात येतात. या वयोगटातील विशेषता म्हणजे कळी उमलून फूल बनणे. लहान मुलातून जबाबदार स्त्री, पुरुष बनणे. बोटावर मोजण्याइतक्या मुलांमध्ये काहीच समस्या येत नाहीत. अन्यथा जास्तीतजास्त जणांसाठी हा प्रवास फारच खडतर असतो.
या काळात शारीरिक, भावनिक, मानसिक, लैंगिक बदल फार झपाट्याने होतात. त्यामुळे मुले-मुली भांबावून जातात. त्याच्यात भर म्हणजे मुलांचे मुलींप्रती व मुलींचे मुलांप्रती आकर्षण. शरीरातील हार्मोन्स गोंधळ घालायला लागतात. यात त्या मुला-मुलींची चूक नसते. पण त्यांना समजून घेणे गरजेचे असते. त्यासाठी किशोरवयीन मुलांना त्यांच्यात होणाऱ्या बदलांबद्दल नीट माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी शाळांमधून मुलांना प्रबोधन आवश्यक आहे. डॉक्टर्स यात सर्वांत उत्तम प्रबोधन करू शकतात. किशोरवयीन मुलांमध्ये 'रिस्क टेकिंग बिहेव्हिअर' खूप जास्त असते. म्हणजे नवनवीन प्रयोग करण्याचे ते धाडस करतात. त्यांना बरीच माहिती मित्र-मैत्रिणी किंवा सोशल मीडिया गुगलवरून मिळवायची. ती बरोबर आहे की नाही त्यांना कळत नाही. पूर्वी मुलंमुली १४-१५ वर्षांमध्ये वयात यायचे. आता दहाव्या वर्षापासूनच शरीरात बदल दिसायला लागत आहेत. त्यामुळे सहावी, सातवीमध्येच 'रिलेशनशिप'ची समस्या तोंड वर काढू लागली आहे. याच वयात प्रेम वैगरे दिसायला लागत आहे. सोशल मीडिया, टीव्ही मालिका, सिनेमा इतकेच काय तर कार्टुन्समध्येही प्रेमसंबंध दाखविले जाऊ लागले आहेत. त्यामुळे मुलांच्या कोवळ्या मनावर भरपूर परिणाम होतो.
आजकाल विभक्त कुटुंब जास्त दिवसात. त्यातही दोन्ही पालक काम करणारे असतात. त्यामुळे मुले घरी बराच काळ एकटेच असतात. अशा वेळेस आजूबाजूचे लोक, ऑटोवाले, बस ड्रायव्हर किंवा घरातील इतर माणसं मुलांचा गैरफायदा घेऊ शकतात. परिणामी बरेचदा यातून किशोरवयीन मुलींना गर्भधारणा होते. अजुनही काही गावांमध्ये १८ वर्षांच्या आधीच मुलींचे लग्न होतात. या मुलींमध्ये आत्मविश्वासाची कमी असते. गर्भधारणा होऊ नये म्हणून काय उपाय करावे याबद्दलचे ज्ञान मुलामुलींना नसते. त्याबाबत बोलायची हिम्मतही नसते. २१ वयापर्यंत मुलींचे शरीर गर्भधारणेसाठी परिपक्व झाले नसते. त्यामुळे या वयात झालेली गर्भधारणा गर्भ आणि मुलगी दोघांना हानी पोहोचवू शकते. जे मुलं-मुली उच्चशिक्षित असतात, ते ३० वर्षांपर्यंत लग्नास तयार नसतात. अशात हॉर्मोन्स आपले काम करीत असतात. त्यामुळे लग्नापूर्वीच लैंगिक संबंध निर्माण करावे लागतात. ती शरीराची गरज असते. यात काळजी घेतली नाही तर गर्भधारणा व लैंगिक आजार एचआयव्ही, एड्सची शक्यता वाढते. परिणामी भावनिक, मानसिक समस्या येतात. आत्मविश्वास खचतो. हे सगळे टाळण्यासाठी वयाच्या १० वर्षांपासूनच मुलांना त्यांच्यातील बदलांबाबत व कसा बचाव करायचा याची माहिती देणे आता काळची गरज बनली आहे.
मुलांच्या वाढत्या वयात पालकांचीच भूमिका मोलाची असते. पालक हेच मुलांचे पहिले मित्र, मैत्रिण असायला हवे. त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधावा. त्यांचे मित्र मैत्रिणींबद्दल माहिती ठेवावी. मुलांना समुपदेश करावे. लैंगिक बाबतीत काही प्रश्न असतील तर ते निसंकोच हाताळावे. मुलांच्या हाती कमी वयात मोबाइल आला तर 'पॉर्न साइट'चा धोका हमखास असतो. त्यामुळे पालकांनीच काळजी घ्यावी. मुलांशी सुसंवाद हाच या समस्येचा मुख्य उपाय आहे. नवजात मुलांना कसे सांभाळायचे याबाबत बरेच पालक कार्यशाळांना जातात. पुस्तके वाचतात. पण वयात येणाऱ्या मुलांना कसे हाताळावे, याबाबत कोणीही कार्यशाळा घेत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेत नाही. या गोष्टींकडे आता विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
किशोरवय म्हणजे १० ते १९ वयोगट. भारतातील जनसंख्येच्या २२ टक्के या वयोगटात येतात. या वयोगटातील विशेषता म्हणजे कळी उमलून फूल बनणे. लहान मुलातून जबाबदार स्त्री, पुरुष बनणे. बोटावर मोजण्याइतक्या मुलांमध्ये काहीच समस्या येत नाहीत. अन्यथा जास्तीतजास्त जणांसाठी हा प्रवास फारच खडतर असतो.
या काळात शारीरिक, भावनिक, मानसिक, लैंगिक बदल फार झपाट्याने होतात. त्यामुळे मुले-मुली भांबावून जातात. त्याच्यात भर म्हणजे मुलांचे मुलींप्रती व मुलींचे मुलांप्रती आकर्षण. शरीरातील हार्मोन्स गोंधळ घालायला लागतात. यात त्या मुला-मुलींची चूक नसते. पण त्यांना समजून घेणे गरजेचे असते. त्यासाठी किशोरवयीन मुलांना त्यांच्यात होणाऱ्या बदलांबद्दल नीट माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी शाळांमधून मुलांना प्रबोधन आवश्यक आहे. डॉक्टर्स यात सर्वांत उत्तम प्रबोधन करू शकतात. किशोरवयीन मुलांमध्ये 'रिस्क टेकिंग बिहेव्हिअर' खूप जास्त असते. म्हणजे नवनवीन प्रयोग करण्याचे ते धाडस करतात. त्यांना बरीच माहिती मित्र-मैत्रिणी किंवा सोशल मीडिया गुगलवरून मिळवायची. ती बरोबर आहे की नाही त्यांना कळत नाही. पूर्वी मुलंमुली १४-१५ वर्षांमध्ये वयात यायचे. आता दहाव्या वर्षापासूनच शरीरात बदल दिसायला लागत आहेत. त्यामुळे सहावी, सातवीमध्येच 'रिलेशनशिप'ची समस्या तोंड वर काढू लागली आहे. याच वयात प्रेम वैगरे दिसायला लागत आहे. सोशल मीडिया, टीव्ही मालिका, सिनेमा इतकेच काय तर कार्टुन्समध्येही प्रेमसंबंध दाखविले जाऊ लागले आहेत. त्यामुळे मुलांच्या कोवळ्या मनावर भरपूर परिणाम होतो.
आजकाल विभक्त कुटुंब जास्त दिवसात. त्यातही दोन्ही पालक काम करणारे असतात. त्यामुळे मुले घरी बराच काळ एकटेच असतात. अशा वेळेस आजूबाजूचे लोक, ऑटोवाले, बस ड्रायव्हर किंवा घरातील इतर माणसं मुलांचा गैरफायदा घेऊ शकतात. परिणामी बरेचदा यातून किशोरवयीन मुलींना गर्भधारणा होते. अजुनही काही गावांमध्ये १८ वर्षांच्या आधीच मुलींचे लग्न होतात. या मुलींमध्ये आत्मविश्वासाची कमी असते. गर्भधारणा होऊ नये म्हणून काय उपाय करावे याबद्दलचे ज्ञान मुलामुलींना नसते. त्याबाबत बोलायची हिम्मतही नसते. २१ वयापर्यंत मुलींचे शरीर गर्भधारणेसाठी परिपक्व झाले नसते. त्यामुळे या वयात झालेली गर्भधारणा गर्भ आणि मुलगी दोघांना हानी पोहोचवू शकते. जे मुलं-मुली उच्चशिक्षित असतात, ते ३० वर्षांपर्यंत लग्नास तयार नसतात. अशात हॉर्मोन्स आपले काम करीत असतात. त्यामुळे लग्नापूर्वीच लैंगिक संबंध निर्माण करावे लागतात. ती शरीराची गरज असते. यात काळजी घेतली नाही तर गर्भधारणा व लैंगिक आजार एचआयव्ही, एड्सची शक्यता वाढते. परिणामी भावनिक, मानसिक समस्या येतात. आत्मविश्वास खचतो. हे सगळे टाळण्यासाठी वयाच्या १० वर्षांपासूनच मुलांना त्यांच्यातील बदलांबाबत व कसा बचाव करायचा याची माहिती देणे आता काळची गरज बनली आहे.
मुलांच्या वाढत्या वयात पालकांचीच भूमिका मोलाची असते. पालक हेच मुलांचे पहिले मित्र, मैत्रिण असायला हवे. त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधावा. त्यांचे मित्र मैत्रिणींबद्दल माहिती ठेवावी. मुलांना समुपदेश करावे. लैंगिक बाबतीत काही प्रश्न असतील तर ते निसंकोच हाताळावे. मुलांच्या हाती कमी वयात मोबाइल आला तर 'पॉर्न साइट'चा धोका हमखास असतो. त्यामुळे पालकांनीच काळजी घ्यावी. मुलांशी सुसंवाद हाच या समस्येचा मुख्य उपाय आहे. नवजात मुलांना कसे सांभाळायचे याबाबत बरेच पालक कार्यशाळांना जातात. पुस्तके वाचतात. पण वयात येणाऱ्या मुलांना कसे हाताळावे, याबाबत कोणीही कार्यशाळा घेत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेत नाही. या गोष्टींकडे आता विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.