ऋजुता देशमुख, अभिनेत्री
काही दिवसांपूर्वीचीच मी एक बालनाट्य पाहायला गेले होते. काही अंतरावर एक जोडपे त्यांच्या लहान मुलाला घेऊन बसले होते. तो मुलगा नाटक न बघता खुर्चीवरच चुळबूळ करत होता. शेवटी त्याच्या आईने त्याला हातात मोबाइल दिला आणि मग तो त्यावर खेळू लागला. हे असे चित्र अनेकदा आपल्याला आजूबाजूला दिसते. पण, इतक्या लहान वयात मुलांना मोबाइलची सवय लावणे अत्यंत चुकीचे आहे. मलाही एक मुलगी आहे; तिचं नाव साजिरी जोशी. आज ती पंधरा वर्षांची आहे. पण, चौथ्या-पाचव्या वर्षांपासून मी तिला गोष्टींची पुस्तक वाचून दाखवायला सुरुवात केली. ती लहान असताना मी नेमके काय वाचून दाखवत आहे; हे तिला समजत नव्हतं. पण, हे 'कागदाचं काहीतरी' आहे आणि त्यात बघून बडबड करायची असते; हे तिला समजत होते. त्यामुळे मी पुस्तकात बघून काहीतरी वाचायचे तशी ती पुस्तक हातात घेऊन काहीबाही बडबडायची. शाळेत जायला लागल्यानंतर हळूहळू तिला अक्षरे समजायला लागली. त्या दरम्यान मी शूटिंगसाठी बाहेर असायचे. अशा वेळी सासू-सासरे, नवरा तिला पुस्तक वाचून दाखवायचे. कदाचित आज तिच्यात वाचनाची जी गोडी निर्माण झाली आहे ती लहानपणीच्या पुस्तक हाताळण्याच्या सवयीमुळेच. आज ती एक उत्तम वाचक आहे. मग कोणतेही पुस्तक असतो. वाचन हा तिच्या दिवसाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळेच निवांत बसलेली असताना साजिरीच्या हातात मोबाइलऐवजी पुस्तक असते.
पालकांनी स्वतः मोबाइलवापर कमी केला की, मुलं त्यासाठी हट्ट करत नाहीत. तिच्यासाठी आणलेल्या बोर्ड गेम्समध्ये ती रमून जायची. त्यामुळे तिनेही फार कधी टीव्ही लावण्याचा हट्ट केला नाही. आम्ही माय-लेकी सापशिडी, लुडो, कॅरम अगदी पत्ते खेळायचो. मी आयोजित करत असलेल्या बालनाट्य शिबिराच्या पहिल्या बॅचमध्ये साजिरी सहभागी झाली होती. पण, ती माझी मुलगी आहे हे तिथे अनेकांना माहितही नव्हतं. कारण ती मला इतर विद्यार्थ्यांप्रमाणे 'ताई' म्हणूनच हाक मारायची. शिबिराच्या शेवटच्या दिवशी आम्ही मायलेकी आहोत हे समजले. शिबिराच्या दिवसांमध्ये तिच्यावर शब्दोच्चाराचे, वाचिक अभिनयाचे, एकाग्रतेचे संस्कार झाले. त्यामुळे नाट्य, क्रीडा, साहित्य आदींच्या शिबिरांमध्ये मुलांना सहभागी करणे महत्त्वाचे आहे. आता साजिरी मोठी झाली आहे. येत्या वर्षात ती कॉलेजलाही जाईल. त्यामुळे आता तिला मोबाइल दिला आहे खरा; पण घरी असताना, एकत्र जेवताना, फिरायला गेल्यावर मोबाइल बाजूला ठेवावा; असा माझा नेहमी आग्रह असतो. हॉटेलमध्ये गेल्यावर खाद्यपदार्थाचा फोटो काढणे हा सध्याचा ट्रेंड झाला आहे. पण, दरवेळी 'क्लिक क्लिक' करत राहणे योग्य नाही. हे एकदा समजूतदारपणे मुलांना सांगितले की, ते ऐकतात. आपण आपल्या पाल्याशी किती संवाद साधतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. 'संवाद' उत्तम आणि दीर्घकाळ असेल तर मुलांचा गॅजेटवापर ही समस्या होणार नाही.
(शब्दांकन : कल्पेशराज कुबल)
काही दिवसांपूर्वीचीच मी एक बालनाट्य पाहायला गेले होते. काही अंतरावर एक जोडपे त्यांच्या लहान मुलाला घेऊन बसले होते. तो मुलगा नाटक न बघता खुर्चीवरच चुळबूळ करत होता. शेवटी त्याच्या आईने त्याला हातात मोबाइल दिला आणि मग तो त्यावर खेळू लागला. हे असे चित्र अनेकदा आपल्याला आजूबाजूला दिसते. पण, इतक्या लहान वयात मुलांना मोबाइलची सवय लावणे अत्यंत चुकीचे आहे. मलाही एक मुलगी आहे; तिचं नाव साजिरी जोशी. आज ती पंधरा वर्षांची आहे. पण, चौथ्या-पाचव्या वर्षांपासून मी तिला गोष्टींची पुस्तक वाचून दाखवायला सुरुवात केली. ती लहान असताना मी नेमके काय वाचून दाखवत आहे; हे तिला समजत नव्हतं. पण, हे 'कागदाचं काहीतरी' आहे आणि त्यात बघून बडबड करायची असते; हे तिला समजत होते. त्यामुळे मी पुस्तकात बघून काहीतरी वाचायचे तशी ती पुस्तक हातात घेऊन काहीबाही बडबडायची. शाळेत जायला लागल्यानंतर हळूहळू तिला अक्षरे समजायला लागली. त्या दरम्यान मी शूटिंगसाठी बाहेर असायचे. अशा वेळी सासू-सासरे, नवरा तिला पुस्तक वाचून दाखवायचे. कदाचित आज तिच्यात वाचनाची जी गोडी निर्माण झाली आहे ती लहानपणीच्या पुस्तक हाताळण्याच्या सवयीमुळेच. आज ती एक उत्तम वाचक आहे. मग कोणतेही पुस्तक असतो. वाचन हा तिच्या दिवसाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळेच निवांत बसलेली असताना साजिरीच्या हातात मोबाइलऐवजी पुस्तक असते.
पालकांनी स्वतः मोबाइलवापर कमी केला की, मुलं त्यासाठी हट्ट करत नाहीत. तिच्यासाठी आणलेल्या बोर्ड गेम्समध्ये ती रमून जायची. त्यामुळे तिनेही फार कधी टीव्ही लावण्याचा हट्ट केला नाही. आम्ही माय-लेकी सापशिडी, लुडो, कॅरम अगदी पत्ते खेळायचो. मी आयोजित करत असलेल्या बालनाट्य शिबिराच्या पहिल्या बॅचमध्ये साजिरी सहभागी झाली होती. पण, ती माझी मुलगी आहे हे तिथे अनेकांना माहितही नव्हतं. कारण ती मला इतर विद्यार्थ्यांप्रमाणे 'ताई' म्हणूनच हाक मारायची. शिबिराच्या शेवटच्या दिवशी आम्ही मायलेकी आहोत हे समजले. शिबिराच्या दिवसांमध्ये तिच्यावर शब्दोच्चाराचे, वाचिक अभिनयाचे, एकाग्रतेचे संस्कार झाले. त्यामुळे नाट्य, क्रीडा, साहित्य आदींच्या शिबिरांमध्ये मुलांना सहभागी करणे महत्त्वाचे आहे. आता साजिरी मोठी झाली आहे. येत्या वर्षात ती कॉलेजलाही जाईल. त्यामुळे आता तिला मोबाइल दिला आहे खरा; पण घरी असताना, एकत्र जेवताना, फिरायला गेल्यावर मोबाइल बाजूला ठेवावा; असा माझा नेहमी आग्रह असतो. हॉटेलमध्ये गेल्यावर खाद्यपदार्थाचा फोटो काढणे हा सध्याचा ट्रेंड झाला आहे. पण, दरवेळी 'क्लिक क्लिक' करत राहणे योग्य नाही. हे एकदा समजूतदारपणे मुलांना सांगितले की, ते ऐकतात. आपण आपल्या पाल्याशी किती संवाद साधतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. 'संवाद' उत्तम आणि दीर्घकाळ असेल तर मुलांचा गॅजेटवापर ही समस्या होणार नाही.
(शब्दांकन : कल्पेशराज कुबल)