चांगदेव काळे
भेटणारा प्रत्येक माणूस देवदूत असेल असे नाही, परंतु आपल्या समोर आलेला माणूस देवदूतापेक्षा कमी नसतो. याचा अनुभव आला तो प्रकाश गीध या तरुणामुळे. एकदा ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पोस्ट ऑफिसजवळ रांगेत उभा होतो. खिडकीच्या फळीवर एक तरुण पत्रावर पत्ता लिहीत होता. तो लिहीत असलेल्या पत्रावर साहित्य असा एक शब्द दिसत होता म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. मुळात साहित्य हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे ठाण्यात अशी साहित्य चळवळ आहे का आणि असेल तर कुठे आहे, याचा मी शोध घेतच होतो. परंतु हवी तशी माहिती मिळत नव्हती. अशा वळणावर साहित्य शब्द आणि प्रकाशची भेट झाली. ‘साहित्य रसिक मंडळ’ ही एक संस्था ठाण्यात आहे आणि मी तिचा सचिव आहे, अशी प्रकाशने माहिती दिली. आम्ही दर महिन्यातून एका रविवारी भेटतो. मो. ह. विद्यालय हे भेटण्याचे ठिकाण. वेळ सायंकाळी ४ वाजता. या रविवारी या, इच्छा असेल तर..., असे तो म्हणाला आणि निघून गेला.
चंद्रावर पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँगला काय वाटले असेल? भर बागेत सुंदर फुललेले फुल पाहून फुलपाखराला काय वाटत असेल? याचे एकच उत्तर... आनंद, गगनात न मावणारा, अवर्णनीय. तो अनुभव घेण्याची संधी मिळाली ती प्रकाशमुळे. मृदू बोलणं, अदमास घेणारे डोळे आणि आपल्या तब्येतीत जगणारा प्रकाश वेगळाच प्रकाश दाखवून गेला. ‘स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा’, या गीताने प्रत्येक स्वप्नाळू मनात स्थान मिळवलेले कवी म. पा. भावे हे या मंडळात प्रथम
भेटले. केवढा आनंद झाला. ज्यांचे साहित्य वाचतो, गाणे, कविता ऐकतो, त्या साहित्यिक कवीविषयी नेहमीच कुतूहल वाटत आलेले आणि आजसमक्ष त्यांना पाहता येत होते, ऐकता येत होते, एक वेगळीच धुंदी या दिवशी अनुभवायला मिळाली. या मंडळातील इतर मंडळीही तशीच मात्तबर आणि साहित्याची रसिक होती.
ज्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकशित झाल्या आहेत, अशा नयना आचार्य, मंदाकिनी भारद्वाज या लेखिकांशी परिचय झाला. स. पा. जोशी, नरेन्द्र बल्लाळ, यशवंत साने, डॉ. र. म. शेजवलकर अशी अनेक मंडळी आणि त्यांच्यात सामील होणारा मी नवखाच होतो. इथे साहित्यावर चर्चा व्हायची, स्वतः केलेल्या लिखाणावर चर्चा व्हायची. व्याख्याते, साहित्यिक यांना आमंत्रित करून त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळायची, कुणाच्या पुस्तकाचे प्रकाशन होई, या सगळ्या गोष्टी साहित्यिक वातावरणात भारून टाकणाऱ्या होत्या. सगळी मंडळी किती खेळीमेळीने चर्चा करीत, सूचना करीत. इथे मिळणारा आनंद पाहता, इथे पुन्हा भेटण्याचा दिवस कधी उजाडतो, असे वाटायचे. या मंडळात सहली आयोजित होत, परंतु तेही लघु साहित्य संमेलन असायचे. एकदा ठाण्यात येऊर येथे डॉ. पंडित यांच्या बंगल्यावर सहल आयोजित केली होती. छान घनदाट निसर्ग आणि भोवती, दिग्गज मंडळी. त्यावेळी कुमार केतकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते, त्यावेळेला केतकरांनी केलेले भाषण हा भाषणाचा माझ्यासाठी उत्कृष्ट नमुना होता. खणखणीत नाणे वाजावे, तसे अजूनही त्यांचे भाषण कानात गुंजत आहे. या मंडळामुळे साहित्याची ओळख व्हायची, नवीन काय साहित्य आहे, त्याची माहिती मिळायची. साहित्याचा आस्वाद रसिकतेने कसा घ्यावा, ते कळायचे आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या लेखनाला सूचना मिळायची.
साहित्य रसिक मंडळात अनेक मान्यवर येत असत. त्यात एक होते प्राचार्य म. वि. फाटक. त्यांचा पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. ते हल्लीच ठाण्यात वास्तव्याला आले होते, परंतु अस्सल हिरा कुठे जरी असला तरी आपले तेज दाखवतो, तसेच झाले. त्यांनी ठाण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. फाटक सरांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त. घारे पाणीदार डोळे, सरळ नाक, गोरापान वर्ण, बोलण्यात दमदारपणा, समोरची व्यक्ती सहजपणे प्रभावित होऊन जायची. बरे, सरांचा या क्षेत्रातला दराराही होता. सहजपणे माणसं गोळा होत गेली. पुढाकार त्यांचाच. मराठी ग्रंथ संग्रहालयात पहिली सभा झाली. शाखेच्या स्वरूप, रचना, कार्य कसे असेल, ही माहिती त्यांनीच दिली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे शाखेची स्थापना झाली. सर्व साहित्यिक मंडळी यात सहभागी झाली आणि वर्गणी भरून सभासदही झाली. ते साल होते १९७९. अध्यक्षपद फाटक सरांकडे देण्यात आले. अनेक मंडळी कार्यकर्ते झाले, एक नवाच उत्साह या शाखेने दिला. भाषणे, व्याख्याने, हे इतर होतंच, परंतु शाखा मेळावा, विभागीय संमेलन, असे उपक्रमदेखील सुरू झाले. अनेक मान्यवर साहित्यिक ठाण्यात आले, यात साहित्य परिषदेचा मोठा वाटा असायचा. पहिले विभागीय साहित्य संमेलन गडकरी रंगायतनमध्ये भरले होते, तर १९९६मध्ये ६१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ठाण्यात भरवण्याचा मानदेखील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेला मिळाला होता. यात पी. सावळाराम, चि. रा. जोशी, पद्माकर शिरवाडकर, वसंतरावर डावखरे यांचा पुढाकार महत्त्वाचा होता. प्रा. वसंत कानेटकर यांची शहरातून ६१ बैलगाड्यांतून काढलेली मिरवणूक अजूनही स्मरणात आहे.
भेटणारा प्रत्येक माणूस देवदूत असेल असे नाही, परंतु आपल्या समोर आलेला माणूस देवदूतापेक्षा कमी नसतो. याचा अनुभव आला तो प्रकाश गीध या तरुणामुळे. एकदा ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पोस्ट ऑफिसजवळ रांगेत उभा होतो. खिडकीच्या फळीवर एक तरुण पत्रावर पत्ता लिहीत होता. तो लिहीत असलेल्या पत्रावर साहित्य असा एक शब्द दिसत होता म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. मुळात साहित्य हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे ठाण्यात अशी साहित्य चळवळ आहे का आणि असेल तर कुठे आहे, याचा मी शोध घेतच होतो. परंतु हवी तशी माहिती मिळत नव्हती. अशा वळणावर साहित्य शब्द आणि प्रकाशची भेट झाली. ‘साहित्य रसिक मंडळ’ ही एक संस्था ठाण्यात आहे आणि मी तिचा सचिव आहे, अशी प्रकाशने माहिती दिली. आम्ही दर महिन्यातून एका रविवारी भेटतो. मो. ह. विद्यालय हे भेटण्याचे ठिकाण. वेळ सायंकाळी ४ वाजता. या रविवारी या, इच्छा असेल तर..., असे तो म्हणाला आणि निघून गेला.
चंद्रावर पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँगला काय वाटले असेल? भर बागेत सुंदर फुललेले फुल पाहून फुलपाखराला काय वाटत असेल? याचे एकच उत्तर... आनंद, गगनात न मावणारा, अवर्णनीय. तो अनुभव घेण्याची संधी मिळाली ती प्रकाशमुळे. मृदू बोलणं, अदमास घेणारे डोळे आणि आपल्या तब्येतीत जगणारा प्रकाश वेगळाच प्रकाश दाखवून गेला. ‘स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा’, या गीताने प्रत्येक स्वप्नाळू मनात स्थान मिळवलेले कवी म. पा. भावे हे या मंडळात प्रथम
भेटले. केवढा आनंद झाला. ज्यांचे साहित्य वाचतो, गाणे, कविता ऐकतो, त्या साहित्यिक कवीविषयी नेहमीच कुतूहल वाटत आलेले आणि आजसमक्ष त्यांना पाहता येत होते, ऐकता येत होते, एक वेगळीच धुंदी या दिवशी अनुभवायला मिळाली. या मंडळातील इतर मंडळीही तशीच मात्तबर आणि साहित्याची रसिक होती.
ज्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकशित झाल्या आहेत, अशा नयना आचार्य, मंदाकिनी भारद्वाज या लेखिकांशी परिचय झाला. स. पा. जोशी, नरेन्द्र बल्लाळ, यशवंत साने, डॉ. र. म. शेजवलकर अशी अनेक मंडळी आणि त्यांच्यात सामील होणारा मी नवखाच होतो. इथे साहित्यावर चर्चा व्हायची, स्वतः केलेल्या लिखाणावर चर्चा व्हायची. व्याख्याते, साहित्यिक यांना आमंत्रित करून त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळायची, कुणाच्या पुस्तकाचे प्रकाशन होई, या सगळ्या गोष्टी साहित्यिक वातावरणात भारून टाकणाऱ्या होत्या. सगळी मंडळी किती खेळीमेळीने चर्चा करीत, सूचना करीत. इथे मिळणारा आनंद पाहता, इथे पुन्हा भेटण्याचा दिवस कधी उजाडतो, असे वाटायचे. या मंडळात सहली आयोजित होत, परंतु तेही लघु साहित्य संमेलन असायचे. एकदा ठाण्यात येऊर येथे डॉ. पंडित यांच्या बंगल्यावर सहल आयोजित केली होती. छान घनदाट निसर्ग आणि भोवती, दिग्गज मंडळी. त्यावेळी कुमार केतकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते, त्यावेळेला केतकरांनी केलेले भाषण हा भाषणाचा माझ्यासाठी उत्कृष्ट नमुना होता. खणखणीत नाणे वाजावे, तसे अजूनही त्यांचे भाषण कानात गुंजत आहे. या मंडळामुळे साहित्याची ओळख व्हायची, नवीन काय साहित्य आहे, त्याची माहिती मिळायची. साहित्याचा आस्वाद रसिकतेने कसा घ्यावा, ते कळायचे आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या लेखनाला सूचना मिळायची.
साहित्य रसिक मंडळात अनेक मान्यवर येत असत. त्यात एक होते प्राचार्य म. वि. फाटक. त्यांचा पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. ते हल्लीच ठाण्यात वास्तव्याला आले होते, परंतु अस्सल हिरा कुठे जरी असला तरी आपले तेज दाखवतो, तसेच झाले. त्यांनी ठाण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. फाटक सरांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त. घारे पाणीदार डोळे, सरळ नाक, गोरापान वर्ण, बोलण्यात दमदारपणा, समोरची व्यक्ती सहजपणे प्रभावित होऊन जायची. बरे, सरांचा या क्षेत्रातला दराराही होता. सहजपणे माणसं गोळा होत गेली. पुढाकार त्यांचाच. मराठी ग्रंथ संग्रहालयात पहिली सभा झाली. शाखेच्या स्वरूप, रचना, कार्य कसे असेल, ही माहिती त्यांनीच दिली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे शाखेची स्थापना झाली. सर्व साहित्यिक मंडळी यात सहभागी झाली आणि वर्गणी भरून सभासदही झाली. ते साल होते १९७९. अध्यक्षपद फाटक सरांकडे देण्यात आले. अनेक मंडळी कार्यकर्ते झाले, एक नवाच उत्साह या शाखेने दिला. भाषणे, व्याख्याने, हे इतर होतंच, परंतु शाखा मेळावा, विभागीय संमेलन, असे उपक्रमदेखील सुरू झाले. अनेक मान्यवर साहित्यिक ठाण्यात आले, यात साहित्य परिषदेचा मोठा वाटा असायचा. पहिले विभागीय साहित्य संमेलन गडकरी रंगायतनमध्ये भरले होते, तर १९९६मध्ये ६१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ठाण्यात भरवण्याचा मानदेखील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेला मिळाला होता. यात पी. सावळाराम, चि. रा. जोशी, पद्माकर शिरवाडकर, वसंतरावर डावखरे यांचा पुढाकार महत्त्वाचा होता. प्रा. वसंत कानेटकर यांची शहरातून ६१ बैलगाड्यांतून काढलेली मिरवणूक अजूनही स्मरणात आहे.