दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या 'एअर इंडिया'च्या विमानात एका चिनी प्रवाशाला उलटी झाल्याने तिथे झालेला गोंधळ, विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाची पुण्यातील नायडू रुग्णालयात केलेली रवानगी, अन्य प्रवाशांची वैद्यकीय तपासणी, नंतर विमानाचे केलेले निर्जंतुकीकरण आणि या साऱ्यांमुळे विमानाच्या परतीच्या प्रवाशाला झालेला सहा तासांचा विलंब.. या साऱ्या गोष्टी 'करोना' विषाणूमुळे निर्माण झालेली दहशत अधोरेखित करणाऱ्या आहेत.
संबंधित प्रवाशाला या विषाणूची लागण झाली नसल्याचे नंतर सिद्ध झाल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडला. 'करोना'चा संसर्ग जीवघेणा ठरत असल्याने आणि मृतांची संख्या वाढत असल्याने याबाबत केवळ चीनमध्येच नाही, तर जगभर भीती आहे. या विषाणूचा चीनमधून सुरू झालेला संसर्ग जगाच्या विविध भागांत पोहचला असून, भारतासह किमान २५ देशांत या त्याचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत 'करोना'मुळे प्राण गमावलेल्यांची चीनमधील संख्या ७२२वर गेली होती आणि तेथील संसर्गग्रस्तांची संख्या ३४ हजारांहून अधिक होती.
विविध प्रकारच्या रोगांवर प्रतिबंधक लस शोधून त्यांवर मानवाने मात केली असली, तरी नवनवीन विषाणूंचा प्रादुर्भाव होत असल्याने, त्यांचा संसर्ग जीवघेणा ठरतो. नव्या सहस्रकाच्या सुरुवातीला चीनसह आग्नेय आशियात 'सार्स' नावाचा श्वसनाचा विषाणूजन्य रोग निर्माण झाला आणि त्यावर मात करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागले. 'करोना'चा उद्रेक 'सार्स'हून मोठा असल्याचे दिसते आहे. 'करोना'चा प्रादुर्भाव झालेल्या वुहानमध्ये आणि हुबेई प्रांतात संसर्गाला अटकाव घालण्यासाठी चिनी प्रशासनाकडून आपत्कालीन वैद्यकीय उपचार देण्याबरोबरच मोठ्या संख्येने संसर्ग असलेल्या शहरांचा बाह्य जगताशी असलेला भौतिक संपर्क पूर्णपणे बंद करण्यापासून प्रवासबंदीपर्यंतचे उपाय केले जात आहेत. तरीही 'करोना'चा उद्रेक थांबलेला नाही. त्यामुळे चीन सरकारसमोरचे आव्हान वाढले आहे. 'करोना'मुळे चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली असून, त्याचा फटका अर्थव्यवस्थेसह अनेक क्षेत्रांना बसतो आहे.
बहुतेक देशांच्या विमान कंपन्यांनी चीनची हवाई वाहतूक सेवा तूर्तास स्थगित केली आहे. भारतासह अनेक देशांनी चीनमधील नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधील कामकाजांवरही निर्बंध आणले आहेत. चिनी पर्यटकांच्या संख्येत गेल्या पंधरा वर्षांत सातपटीने वाढ झाली असून, सध्या दरवर्षी सुमारे पंधरा कोटी पर्यटक जगभर फिरतात. या पर्यटकांद्वारे आपल्या देशात 'करोना'चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. असे असले, तरी जपान, थायलंड, संयुक्त अरब अमिराती यांसह पंचवीस देशांत 'करोना'चे रुग्ण आढळले आहेत. भारतातही केरळमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे केवळ चीनसमोरच नव्हे, तर अन्य देशांसमोरही 'करोना'ने आव्हान आहे.
विषाणूंचे आव्हान मानवाला नवीन नाही हे खरे. विषाणूंचा अभ्यास करून त्यांना अटकाव घालण्यासाठीची लस मानवाकडून विकसित होत आली आहे. मात्र, आता विषाणूही स्वत:त बदल घडवून आणत आहेत. एकाच प्रकारचे विषाणू खूप झटकन बदल करीत असल्याने त्यांना तितक्याच वेगाने प्रतिसाद देण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच 'करोना'चे संकट केवळ चीनपुढील नसून, संपूर्ण जग आणि मानवजातीवरचे आहे.
संपर्काची साधने वेगाने वाढल्याने संपूर्ण जग जवळ येत असल्याने आणि विविध कारणांनी अन्य देशांत प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने जग छोटे बनले आहे आणि सर्व देश जवळ आले आहेत. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात एखाद्या नव्या विषाणूचा झालेला उद्रेक हा गतिमानतेने अन्य भागांत पोहोचू शकतो. असा उद्रेक स्थानिक राहण्याची शक्यता कमी असते. 'करोना'च्या निमित्ताने आपण हे अनुभवतो आहोतच. हा विषाणू नवा आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात सध्या तरी प्रतिबंधात्मक लस नाही. ती येत्या काळात विकसित होणार यात शंका नाही. तसे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, लस विकसित होईपर्यंत तरी उपचारात्मक प्रयत्नांवरच भर द्यावा लागणार आहे. अशा वैद्यकीय आणीबाणीत अफवांना ऊत येतो. चीनमधील बळींची संख्या हजारोंवर नेण्यापासून तेथील रुग्णांना मारण्यासाठी हालचाली सुरू असल्यापर्यंतच्या अफवा आहेत. त्या दूर करण्यापासून कार्यक्षमतेने उपचारात्मक यंत्रणा उभारण्यापर्यंतची पावले संबंधित सरकारांना उचलावी लागतील. 'करोना'चा उद्रेक धडा देणाराही आहे. तो योग्य रीतीने घेतल्यास पुढील आव्हानांना अधिक सक्षमतेने सामोरे जाता येईल.
संबंधित प्रवाशाला या विषाणूची लागण झाली नसल्याचे नंतर सिद्ध झाल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडला. 'करोना'चा संसर्ग जीवघेणा ठरत असल्याने आणि मृतांची संख्या वाढत असल्याने याबाबत केवळ चीनमध्येच नाही, तर जगभर भीती आहे. या विषाणूचा चीनमधून सुरू झालेला संसर्ग जगाच्या विविध भागांत पोहचला असून, भारतासह किमान २५ देशांत या त्याचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत 'करोना'मुळे प्राण गमावलेल्यांची चीनमधील संख्या ७२२वर गेली होती आणि तेथील संसर्गग्रस्तांची संख्या ३४ हजारांहून अधिक होती.
विविध प्रकारच्या रोगांवर प्रतिबंधक लस शोधून त्यांवर मानवाने मात केली असली, तरी नवनवीन विषाणूंचा प्रादुर्भाव होत असल्याने, त्यांचा संसर्ग जीवघेणा ठरतो. नव्या सहस्रकाच्या सुरुवातीला चीनसह आग्नेय आशियात 'सार्स' नावाचा श्वसनाचा विषाणूजन्य रोग निर्माण झाला आणि त्यावर मात करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागले. 'करोना'चा उद्रेक 'सार्स'हून मोठा असल्याचे दिसते आहे. 'करोना'चा प्रादुर्भाव झालेल्या वुहानमध्ये आणि हुबेई प्रांतात संसर्गाला अटकाव घालण्यासाठी चिनी प्रशासनाकडून आपत्कालीन वैद्यकीय उपचार देण्याबरोबरच मोठ्या संख्येने संसर्ग असलेल्या शहरांचा बाह्य जगताशी असलेला भौतिक संपर्क पूर्णपणे बंद करण्यापासून प्रवासबंदीपर्यंतचे उपाय केले जात आहेत. तरीही 'करोना'चा उद्रेक थांबलेला नाही. त्यामुळे चीन सरकारसमोरचे आव्हान वाढले आहे. 'करोना'मुळे चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली असून, त्याचा फटका अर्थव्यवस्थेसह अनेक क्षेत्रांना बसतो आहे.
बहुतेक देशांच्या विमान कंपन्यांनी चीनची हवाई वाहतूक सेवा तूर्तास स्थगित केली आहे. भारतासह अनेक देशांनी चीनमधील नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधील कामकाजांवरही निर्बंध आणले आहेत. चिनी पर्यटकांच्या संख्येत गेल्या पंधरा वर्षांत सातपटीने वाढ झाली असून, सध्या दरवर्षी सुमारे पंधरा कोटी पर्यटक जगभर फिरतात. या पर्यटकांद्वारे आपल्या देशात 'करोना'चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. असे असले, तरी जपान, थायलंड, संयुक्त अरब अमिराती यांसह पंचवीस देशांत 'करोना'चे रुग्ण आढळले आहेत. भारतातही केरळमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे केवळ चीनसमोरच नव्हे, तर अन्य देशांसमोरही 'करोना'ने आव्हान आहे.
विषाणूंचे आव्हान मानवाला नवीन नाही हे खरे. विषाणूंचा अभ्यास करून त्यांना अटकाव घालण्यासाठीची लस मानवाकडून विकसित होत आली आहे. मात्र, आता विषाणूही स्वत:त बदल घडवून आणत आहेत. एकाच प्रकारचे विषाणू खूप झटकन बदल करीत असल्याने त्यांना तितक्याच वेगाने प्रतिसाद देण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच 'करोना'चे संकट केवळ चीनपुढील नसून, संपूर्ण जग आणि मानवजातीवरचे आहे.
संपर्काची साधने वेगाने वाढल्याने संपूर्ण जग जवळ येत असल्याने आणि विविध कारणांनी अन्य देशांत प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने जग छोटे बनले आहे आणि सर्व देश जवळ आले आहेत. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात एखाद्या नव्या विषाणूचा झालेला उद्रेक हा गतिमानतेने अन्य भागांत पोहोचू शकतो. असा उद्रेक स्थानिक राहण्याची शक्यता कमी असते. 'करोना'च्या निमित्ताने आपण हे अनुभवतो आहोतच. हा विषाणू नवा आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात सध्या तरी प्रतिबंधात्मक लस नाही. ती येत्या काळात विकसित होणार यात शंका नाही. तसे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, लस विकसित होईपर्यंत तरी उपचारात्मक प्रयत्नांवरच भर द्यावा लागणार आहे. अशा वैद्यकीय आणीबाणीत अफवांना ऊत येतो. चीनमधील बळींची संख्या हजारोंवर नेण्यापासून तेथील रुग्णांना मारण्यासाठी हालचाली सुरू असल्यापर्यंतच्या अफवा आहेत. त्या दूर करण्यापासून कार्यक्षमतेने उपचारात्मक यंत्रणा उभारण्यापर्यंतची पावले संबंधित सरकारांना उचलावी लागतील. 'करोना'चा उद्रेक धडा देणाराही आहे. तो योग्य रीतीने घेतल्यास पुढील आव्हानांना अधिक सक्षमतेने सामोरे जाता येईल.