सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडॉरमधील सोळा हजार एकरांतील झाडांची तोड झाल्याचा प्रकार गंभीर असून त्यासंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले टाकायला हवीत. महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्यापासून कर्नाटकातील भीमागड अभयारण्यापर्यंतच्या क्षेत्रात वृक्षतोडीला बंदी घालण्याचा आदेश २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिला, त्यानंतर ही वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागातील वृक्षतोड एवढ्या भीषण प्रमाणात होणे चिंताजनक आहे.
सावंतवाडी दोडामार्ग वन्यजीव कॉरिडॉर इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे त्या क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनेही या कॉरिडॉरसह कोकणातील साडेतीनशे गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण खात्याला केली आहे. परंतु केंद्र सरकारने त्यासंदर्भात निर्णय दिलेला नाही. कोकणातील वनसंपदा, तेथील घनदाट जंगले, वन्यजीवांसाठीचा उत्तम अधिवास आदी बाबींची सतत चर्चा होत असते. कारण बदलत्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पर्यावरणात या संपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या दशकभराहून अधिक काळ त्यासंदर्भात राजकीय पातळीवरून गोंधळ घालण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात खनिज प्रकल्प प्रस्तावित असल्यामुळे खाणउद्योजकांची लॉबी या इकोसेन्सिटिव्ह झोनच्या विरोधात आहे. राज्य सरकारच्या शिफारसीला निमित्त लोकांच्या मागणीचे असले तरी मूळ उद्देश खाणउद्योजकांच्या भल्याचाच आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली आणि दोडामार्ग तालुक्यातील मांगेली दरम्यानचा ३५ चौरस किलोमीटरचा कॉरिडॉर राधानगरी, कोयना, चांदोली या अभयारण्यांना कर्नाटकातील भीमगड अभयारण्याशी जोडतो. हत्तींसहित अनेक दुर्मीळ वन्यजीवांचा हा भ्रमणमार्ग आहे. तीनशेहून अधिक प्रकारच्या वनस्पती, वनौषधी, दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांनी हा कॉरिडोर जैवसमृद्ध आहे. जंगले जपली तरच या सगळ्याचे संवर्धन होईल.
सावंतवाडी दोडामार्ग वन्यजीव कॉरिडॉर इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे त्या क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनेही या कॉरिडॉरसह कोकणातील साडेतीनशे गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण खात्याला केली आहे. परंतु केंद्र सरकारने त्यासंदर्भात निर्णय दिलेला नाही. कोकणातील वनसंपदा, तेथील घनदाट जंगले, वन्यजीवांसाठीचा उत्तम अधिवास आदी बाबींची सतत चर्चा होत असते. कारण बदलत्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पर्यावरणात या संपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या दशकभराहून अधिक काळ त्यासंदर्भात राजकीय पातळीवरून गोंधळ घालण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात खनिज प्रकल्प प्रस्तावित असल्यामुळे खाणउद्योजकांची लॉबी या इकोसेन्सिटिव्ह झोनच्या विरोधात आहे. राज्य सरकारच्या शिफारसीला निमित्त लोकांच्या मागणीचे असले तरी मूळ उद्देश खाणउद्योजकांच्या भल्याचाच आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली आणि दोडामार्ग तालुक्यातील मांगेली दरम्यानचा ३५ चौरस किलोमीटरचा कॉरिडॉर राधानगरी, कोयना, चांदोली या अभयारण्यांना कर्नाटकातील भीमगड अभयारण्याशी जोडतो. हत्तींसहित अनेक दुर्मीळ वन्यजीवांचा हा भ्रमणमार्ग आहे. तीनशेहून अधिक प्रकारच्या वनस्पती, वनौषधी, दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांनी हा कॉरिडोर जैवसमृद्ध आहे. जंगले जपली तरच या सगळ्याचे संवर्धन होईल.