अ‍ॅपशहर

ऑल इज वेल; पण...

‘तुम्ही मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे हे विसरा... आपल्याला ऐतिहासिक विजयाची नोंद करायची आहे. आज कसोटीचा तिसरा नव्हे, अखेरचा पाचवा दिवस आहे, असे समजा. जे करायचे आहे ते आजच... तेव्हा आजच बाजी मारायची’, हे उद्‍गार आहेत विराट कोहलीचे.

Maharashtra Times 16 Aug 2017, 4:26 am
‘तुम्ही मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे हे विसरा... आपल्याला ऐतिहासिक विजयाची नोंद करायची आहे. आज कसोटीचा तिसरा नव्हे, अखेरचा पाचवा दिवस आहे, असे समजा. जे करायचे आहे ते आजच... तेव्हा आजच बाजी मारायची’, हे उद्‍गार आहेत विराट कोहलीचे. अलीकडेच आटोपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पल्लीकेली कसोटीच्या तिसऱ्या दिवसाला सामोरे जाण्याआधी कोहलीने घेतलेले हे आपल्या संघाचे बौद्धिक. हा किस्सा आवर्जून नमूद करण्याचे प्रयोजन म्हणजे प्रतिस्पर्धी दुबळा असो तुल्यबळ किंवा आव्हानात्मक सामन्यात सर्वस्व पणाला लावूनच खेळण्याची कोहलीची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. बहुधा म्हणूनच धोनीच्या निवृत्तीनंतर पूर्णवेळ कसोटी कर्णधारपदाची धुरा हाती आल्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीत बऱ्यापैकी सातत्य दिसते आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम all is well
ऑल इज वेल; पण...


श्रीलंका दौऱ्यावरील पहिली कसोटी भारताने ३०४, तर दुसरी कसोटी एक डाव अन् ५४ धावांनी जिंकली होती. तिसऱ्या कसोटीत भारताने एक डाव १७१ धावांनी सरशी साधली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा २९ पैकी १९वा कसोटी विजय ठरला. यात तीन पराभव आणि ७ अनिर्णित सामन्यांचा समावेश आहे. कोहलीची विजयाची टक्केवारी ६५.५१ आहे. विजयाच्या टक्केवारीत त्याने धोनीला (४५) मागे टाकले. एक गोष्ट मात्र तितकीच खरी की, टीम इंडियाचे कौतुक करताना कोहलीच्या संघाने मिळवलेले बहुतेक कसोटी विजय हे घरच्या मैदानावरील होते हे लक्षात घ्यायला हवे. २०१५मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पिछाडी भरून काढत लंकेला त्यांच्याच मायभूमीत नमवले होते. ती कामगिरी यंदाच्या निर्भेळ यशापेक्षा मोठीच म्हणावी लागेल; कारण यावेळी भारताने ज्या श्रीलंकेची ‘शिकार’ केली तो आधीच अनेक गोष्टींच्या ओझ्याने पिचलेला आहे.

दुखापती, बोर्डातील निराशाजनक वातावरण, आपल्या मंत्र्यांकडून सोशल मीडियावर मिळणारा घरचा अहेर अन् माजी कर्णधार रणतुंगाकडून होणारे आरोप अशा विविध कारणांमुळे श्रीलंका संघ दबलेला वाटतो. तेव्हा या सोप्या परीक्षेत मिळवलेल्या पैकीच्या पैकी गुणांच्या सुखद आठवणीसह भारताने पुढील आव्हानात्मक दौऱ्यांच्या तयारीला लागायला हवे. तसे जानेवारीत रंगणारा दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोडल्यास कोहली आणि कंपनीला आता घरच्या मैदानावरच खेळायचे आहे. २०१८मधील इंग्लंड दौऱ्याचा विचार करून बीसीसीआयने अश्विनला इंग्लिश कौंटीत खेळण्याची मुभा दिली आहे. याचा सदुपयोग झाला म्हणजे मिळवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज