अ‍ॅपशहर

चालता बोलता चमत्कार

अमिताभ बच्चन यांना फाळके पुरस्कार मिळाल्याचे वाचून आपल्याला आश्चर्य वाटते. कारण असे सर्वोच्च पुरस्कार साधारणतः त्या कलावंताची कारकीर्द संपून पंधरा-वीस वर्षे उलटल्यावर दिले जातात असा आपला अनुभव आहे.

महाराष्ट्र टाइम्स 26 Sep 2019, 7:54 am
अमिताभ बच्चन यांना फाळके पुरस्कार मिळाल्याचे वाचून आपल्याला आश्चर्य वाटते. कारण असे सर्वोच्च पुरस्कार साधारणतः त्या कलावंताची कारकीर्द संपून पंधरा-वीस वर्षे उलटल्यावर दिले जातात असा आपला अनुभव आहे. तो कलावंत काम करत असतो तोवर त्याचे 'ज्येष्ठत्व' एवढा मोठा सन्मान देण्याच्या योग्यतेचे झालेले नाही, असाही एक अकारण समज असतो. अमिताभ बच्चन हे नाव या सर्व गोष्टींना अपवाद आहे आणि तसा अपवाद यापूर्वी झालेला नाही. नजीकच्या भविष्यात होण्याची शक्यताही नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amitabh


अमिताभ यांनी पंच्याहत्तरी ओलांडली असून गेली पन्नास वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. वयाच्या आणि कारकीर्दीच्या या टप्प्यावर व्यावसायिकदृष्ट्या मागणी कायम असलेला त्यांच्यासारखा अभिनेता दुर्मीळच. केवळ तेवढेच नव्हे तर अभिनेता म्हणून स्वतःला जोखून पाहण्याची त्यांची लालसा अजूनही धगधगती आहे. लेखक अजूनही त्यांना डोळ्यांपुढे ठेवून रोज नव्या पटकथा लिहीत आहेत. त्यांनी आपली पटकथा वाचावी, असे कोणास वाटत असेल तर त्याला वर्षभरानंतरची तारीख मिळते.

यशस्वी अभिनेता म्हणून त्यांनी एकेकाळी प्राप्त केलेला 'वन मॅन इंडस्ट्री' हा अधिकार, त्यांच्या फिल्मी कारकीर्दीत यश-अपयशाचे त्यांना आलेले टोकाचे अनुभव, राजकारणात पोळून घेतलेले हात, आर्थिक डबघाई, 'कौन बनेगा करोडपती'ची ऐतिहासिक कामगिरी, मोठा अपघात अशा घटनांनी खच्चून भरलेले त्यांचे आयुष्य हाच एका चित्रपटाचा विषय आहे. १९६९ साली आलेल्या 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटापासून तर या वर्षी मार्चमध्ये आलेल्या 'बदला' या चित्रपटापर्यंत अमिताभ कधीही 'आऊट डेटेड' वाटत नाहीत. अमिताभ हे स्वतःच गेल्या पन्नास वर्षाच्या हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास आहेत. अभिनयाच्या क्षेत्रातला, आपल्या डोळ्यांदेखत घडलेला एक चालता बोलता चमत्कार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज