महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस पडलेला नसल्याने बळीराजाचे पीकपाणी धोक्यात आले असले तरी एका वर्षात दोनदा आयपीएलचे भरघोस पीक घेऊन बक्कळ कमाईचा नवा फंडा बीसीसीआयने शोधून काढला आहे. क्रिकेटच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन गब्बर व मातब्बर बनलेल्या या संघटनेने सप्टेंबरच्या सुमारास आयपीएलचा नवा अवतार (मिनी आयपीएल) सादर करण्याचे निश्चित केले आहे. महत्त्वाचे म्हणजे गर्भश्रीमंत अमेरिका आणि दुबईतच हा खेळ रंगेल. मुळात क्रिकेटचा प्रसार आणि प्रचाराच्या उद्देशानेच ही संघटना स्थापन झालेली असल्याने या खेळाचा कोणताही सीझन घेण्याचा घटनादत्त अधिकार त्यांना आहे; परंतु निव्वळ पैसा खेचण्याच्या स्पर्धांनी क्रिकेटला लाभ होतो आहे का? क्रिकेट वगळले तर एकूणच देशी व पारंपरिक खेळ सध्या कुठल्या अवस्थेत आहेत, याचाही खेळाकडे मनोरंजन म्हणून पाहणाऱ्या आणि त्यासाठी एका तिकिटाला हजारो रुपये मोजणाऱ्या प्रेक्षकवर्गाने सारासार विचार करण्याची आवश्यकता आहे.
अर्थात, इतर खेळांच्या दारिद्र्याबद्दल बीसीसीआयला जबाबदार ठरविणे योग्य नाही. त्यास आपली सरकारे व त्यांची धोरणे आणि सोबतीला पुढारी जबाबदार आहेत. क्रिकेटप्रमाणे इतर खेळ व त्यांच्या संघटनांना स्वायत्तता आणि सोयी-सवलती दिल्या गेल्यास चित्र बदलेल. प्रो कबड्डी लीग त्याचे उत्तम उदारहण मानता येईल; पण कबड्डीच्या या रोपट्याचा वटवृक्ष होईलच, हे आज सांगता येत नाही. प्रेक्षकांनी फारसे स्वारस्य न दाखविल्याने आणि स्पॉन्सर न मिळाल्याने बीसीसीआयला २०१४ मध्ये टी-२० चॅम्पियन लीग गुंडाळावी लागली. तेव्हापासूनच म्हणे, ही संघटना उत्पन्नाच्या नव्या स्रोताच्या शोधात होती. आता आयपीएलचा मिनी आणि पुढे जाऊन नॅनो अवतारही येऊ शकतो! आयपीएल येण्यापूर्वी भारतीय, तसेच इतर देशांतील संघही विश्रांतीला वेळ मिळत नसल्याची तक्रार करायचे. आता खेळाडूंची व्यस्तता कित्येकपट वाढूनही कुणी तक्रार करताना दिसत नाही! अर्थात, सारा मामला पैशांचा असल्याने यापुढे पैसा, प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या अशा स्पर्धा वाढल्या तरी कुणी चकार शब्द काढणार नाही, हेही खरे! कौंटी क्रिकेटपासून जन्मलेला आणि एका दशकात लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर पोचलेल्या आयपीएलसारख्या स्पर्धांपासून पैसा कमाविण्याच्या नादात खेळ तसेच खिलाडूवृत्तीचा कडेलोट न झाला म्हणजे मिळविले!
अर्थात, इतर खेळांच्या दारिद्र्याबद्दल बीसीसीआयला जबाबदार ठरविणे योग्य नाही. त्यास आपली सरकारे व त्यांची धोरणे आणि सोबतीला पुढारी जबाबदार आहेत. क्रिकेटप्रमाणे इतर खेळ व त्यांच्या संघटनांना स्वायत्तता आणि सोयी-सवलती दिल्या गेल्यास चित्र बदलेल. प्रो कबड्डी लीग त्याचे उत्तम उदारहण मानता येईल; पण कबड्डीच्या या रोपट्याचा वटवृक्ष होईलच, हे आज सांगता येत नाही. प्रेक्षकांनी फारसे स्वारस्य न दाखविल्याने आणि स्पॉन्सर न मिळाल्याने बीसीसीआयला २०१४ मध्ये टी-२० चॅम्पियन लीग गुंडाळावी लागली. तेव्हापासूनच म्हणे, ही संघटना उत्पन्नाच्या नव्या स्रोताच्या शोधात होती. आता आयपीएलचा मिनी आणि पुढे जाऊन नॅनो अवतारही येऊ शकतो! आयपीएल येण्यापूर्वी भारतीय, तसेच इतर देशांतील संघही विश्रांतीला वेळ मिळत नसल्याची तक्रार करायचे. आता खेळाडूंची व्यस्तता कित्येकपट वाढूनही कुणी तक्रार करताना दिसत नाही! अर्थात, सारा मामला पैशांचा असल्याने यापुढे पैसा, प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या अशा स्पर्धा वाढल्या तरी कुणी चकार शब्द काढणार नाही, हेही खरे! कौंटी क्रिकेटपासून जन्मलेला आणि एका दशकात लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर पोचलेल्या आयपीएलसारख्या स्पर्धांपासून पैसा कमाविण्याच्या नादात खेळ तसेच खिलाडूवृत्तीचा कडेलोट न झाला म्हणजे मिळविले!