'गेट वे ऑफ टायगर कॅपिटल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भाने लज्जेने मान खाली घालावी, अशा घटना केवळ ४८ तासांत घडल्या आहेत. वाघांच्या या बालेकिल्ल्यात सात वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघ हमखास दिसणारच या भावनेने विदर्भातील जंगलांना भेटी देणाऱ्या पर्यटकांनी आता वाघांचे मृतदेह बघण्यासाठी यावे काय, अशी संतापजनक भावना यामुळे खदखदत आहे. या संतापामागे मागे आहे, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची थंड आणि तेवढीच कोडगी वागणूक. एक वाघ जगावा म्हणून सरकार लाखो रुपये खर्च करीत असेल, तर एक वाघ मेला म्हणून त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना दंड किती आकारावा हेदेखील ठरविण्याची वेळ आली आहे. वाघांच्या मृत्यूच्या तपशिलात शिरले असता ही भावना अधिक तीव्रपणे जाणवते.
पेंच परिसरात वेदनेने तळमळणारा एक ढाण्या वाघ मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. वनविभागाला तो दिसला, तेव्हा त्याचा श्वास थांबून तीन दिवस उलटले होते. चिमूरच्या भान्सुली वनबीटमध्ये ‘येडा अण्णा’ या नावाचा एक वाघ २१ फेब्रुवारीला जखमी झाल्याचे निदर्शनास आले. त्याला बेशुद्ध करून तातडीचे उपचार करणे आवश्यक होते. तसा अहवाल पाठविला गेला २३ तारखेला. २४ तारखेला तज्ज्ञांची समिती नेमली गेली. २५ तारखेला एक वाजता ही समिती या वाघाला बघायला आली. त्या आधीच त्याने शेवटचा श्वास सोडला होता. कागदी रकान्यांच्या खानापूर्तीने त्याला अखेर निपचित केले. ब्रह्मपुरी वन विभागाच्या तळोधी परिक्षेत्रातील दोन महिन्यांच्या बछड्यावर चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू होते. तो गंभीर होता. त्याला खरेतर नागपूरला हलवायला हवे होते. परवानगीची दिरंगाई नडली. आणखी एक वाघ घटला. नागपूरजवळ गोरेवाडा बचाव केंद्रात वाघाचे चार बछडे अचानकच गेले. मोठमोठ्या अभिनेत्यांना कोट्यवधी रुपये देऊन वाघाचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा वाघांच्या सुरक्षेवर लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे. वनमंत्री आपल्याच भागातील या घटनांकडे नुसते स्थितप्रज्ञतेने पाहात राहणार असतील, तर वाघाची डरकाळी हा शब्द केवळ पुस्तकात उरेल.
पेंच परिसरात वेदनेने तळमळणारा एक ढाण्या वाघ मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. वनविभागाला तो दिसला, तेव्हा त्याचा श्वास थांबून तीन दिवस उलटले होते. चिमूरच्या भान्सुली वनबीटमध्ये ‘येडा अण्णा’ या नावाचा एक वाघ २१ फेब्रुवारीला जखमी झाल्याचे निदर्शनास आले. त्याला बेशुद्ध करून तातडीचे उपचार करणे आवश्यक होते. तसा अहवाल पाठविला गेला २३ तारखेला. २४ तारखेला तज्ज्ञांची समिती नेमली गेली. २५ तारखेला एक वाजता ही समिती या वाघाला बघायला आली. त्या आधीच त्याने शेवटचा श्वास सोडला होता. कागदी रकान्यांच्या खानापूर्तीने त्याला अखेर निपचित केले. ब्रह्मपुरी वन विभागाच्या तळोधी परिक्षेत्रातील दोन महिन्यांच्या बछड्यावर चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू होते. तो गंभीर होता. त्याला खरेतर नागपूरला हलवायला हवे होते. परवानगीची दिरंगाई नडली. आणखी एक वाघ घटला. नागपूरजवळ गोरेवाडा बचाव केंद्रात वाघाचे चार बछडे अचानकच गेले. मोठमोठ्या अभिनेत्यांना कोट्यवधी रुपये देऊन वाघाचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा वाघांच्या सुरक्षेवर लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे. वनमंत्री आपल्याच भागातील या घटनांकडे नुसते स्थितप्रज्ञतेने पाहात राहणार असतील, तर वाघाची डरकाळी हा शब्द केवळ पुस्तकात उरेल.