माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांच्या निधनाने राजकारण आणि प्रशासन यांच्यातील एका दुवा निखळला आहे. सत्ता कोणाचीही असली तरी राज्यकारभार प्रशासनच हाकते असे म्हटले जाते. त्यामुळे नियमांची माहिती आणि चाड असलेले अधिकारी हे नेहमीच लोकशाही व्यवस्थेचा कणा असतात. स्वातंत्र्योत्तर काळात अशा अनेक अधिकाऱ्यांनी देशाची घडी निट बसवण्यास हातभार लावला. माधवराव हे आपल्या कामाविषयी आत्यंतिक निष्ठा असलेल्या अशाच अधिकाऱ्यांपैकी एक होते. उमदे व्यक्तिमत्व, स्पष्टवक्तेपणा आणि 'अभ्यासावाचोनि प्रकटण्याच्या' वृत्तीचा आत्यंतिक तिटकारा यामुळे त्यांचा दरारा असे. समोर कितीही मोठी अधिकारी व्यक्ती असली तरी आपले मत रोखठोकपणे व्यक्त करण्यास ते कधीच कचरले नाही.
शंकरराव चव्हाण केंद्रात गृहमंत्री असताना गोडबोले हे गृहसचिव होते. याच कार्यकाळात निवृतीला सतरा महिने शिल्लक असतानाच १९९३ साली गोडबोले यांनी नोकरीचा अचानक राजीनामा दिला होता. बाबरी मशीद पाडली जात असताना ते कृत्य थांबविण्याबाबत, गोडबोले यांनी सूचना करुनही कोणतीही पावले उचलली गेली नाही असे म्हटले जाते. तत्कालिन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि तत्कालिन गृहराज्यमंत्री राजेश पायलट यांच्यातील संघर्षाचा ते बळी होते असे म्हटले जाते. चव्हाण हे गोडबोले यांच्या फार आहारी गेले आहेत, आपल्याला किंमत देत नाहीत, अशा समजातून पायलट यांनी जाहीरपणे अपमान केला, त्यानंतर गोडबोले यांनी तडकाफडकी निवृत्ती पत्करली असा घटनाक्रम अजूनही सांगितला जातो. खरे तर त्या काळात गृहमंत्रालय हे घटनांचा केद्रबिंदू बनले होते. परंतु राजकारणापेक्षा देशहित आणि समाजहिताला अधिक किंमत देण्याच्या संस्कृतीत गोडबोले यांचा पिंड घडलेला होता.
बदलत्या राजकारणाचा त्यांना बहुधा अंदाज आला आणि यापुढे आपल्यासारख्यांना काम करता येणे शक्य होणार नाही हे त्यांनी ताडले असावे. 'अनफिनिश्ड इनिंग्ज' या आपल्या आठवणी सांगणाऱ्या पुस्तकात त्यांनी अशा अनेक घटनांचे सूचन केले आहे. केंद्रीय गृहसचिव, नगरविकास सचिव, राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रधान वित्त सचिव, आशियाआ विकास बँकेतील महत्वाचे पद अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. चिंतन आणि लेखन यात त्यांनी वेळ घालवला आणि अनेक राजकीय पेचप्रसंगांचे साक्षीदार असूनही त्याविषयी काही बोलायचे, लिहायचे आणि वाद निर्माण करण्याचे त्यांनी टाळले. त्यांच्या उपजत वृत्तीचाच तो एक भाग होता. केंद्रातील मोठ्या पदांवर मराठी अधिकारी फार क्वचित दिसतात. मात्र ज्या काही मोजक्या मराठी अधिकाऱ्यांनी अतिशय कसोटीच्या काळात जबाबदारीचे पद सांभाळले त्यात गोडबोले यांचा समावेश होतो.
शंकरराव चव्हाण केंद्रात गृहमंत्री असताना गोडबोले हे गृहसचिव होते. याच कार्यकाळात निवृतीला सतरा महिने शिल्लक असतानाच १९९३ साली गोडबोले यांनी नोकरीचा अचानक राजीनामा दिला होता. बाबरी मशीद पाडली जात असताना ते कृत्य थांबविण्याबाबत, गोडबोले यांनी सूचना करुनही कोणतीही पावले उचलली गेली नाही असे म्हटले जाते. तत्कालिन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि तत्कालिन गृहराज्यमंत्री राजेश पायलट यांच्यातील संघर्षाचा ते बळी होते असे म्हटले जाते. चव्हाण हे गोडबोले यांच्या फार आहारी गेले आहेत, आपल्याला किंमत देत नाहीत, अशा समजातून पायलट यांनी जाहीरपणे अपमान केला, त्यानंतर गोडबोले यांनी तडकाफडकी निवृत्ती पत्करली असा घटनाक्रम अजूनही सांगितला जातो. खरे तर त्या काळात गृहमंत्रालय हे घटनांचा केद्रबिंदू बनले होते. परंतु राजकारणापेक्षा देशहित आणि समाजहिताला अधिक किंमत देण्याच्या संस्कृतीत गोडबोले यांचा पिंड घडलेला होता.
बदलत्या राजकारणाचा त्यांना बहुधा अंदाज आला आणि यापुढे आपल्यासारख्यांना काम करता येणे शक्य होणार नाही हे त्यांनी ताडले असावे. 'अनफिनिश्ड इनिंग्ज' या आपल्या आठवणी सांगणाऱ्या पुस्तकात त्यांनी अशा अनेक घटनांचे सूचन केले आहे. केंद्रीय गृहसचिव, नगरविकास सचिव, राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रधान वित्त सचिव, आशियाआ विकास बँकेतील महत्वाचे पद अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. चिंतन आणि लेखन यात त्यांनी वेळ घालवला आणि अनेक राजकीय पेचप्रसंगांचे साक्षीदार असूनही त्याविषयी काही बोलायचे, लिहायचे आणि वाद निर्माण करण्याचे त्यांनी टाळले. त्यांच्या उपजत वृत्तीचाच तो एक भाग होता. केंद्रातील मोठ्या पदांवर मराठी अधिकारी फार क्वचित दिसतात. मात्र ज्या काही मोजक्या मराठी अधिकाऱ्यांनी अतिशय कसोटीच्या काळात जबाबदारीचे पद सांभाळले त्यात गोडबोले यांचा समावेश होतो.