अ‍ॅपशहर

वसईकरांना वाली कोण ?

गेल्या आठवड्यात मुंबईसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. मुंबईसह अन्य ठिकाणचे जनजीवन लवकर सावरले असताना वसई, विरार, नालासोपारा परिसरातील नागरिकांचे मात्र आठवडाभर हाल झाले. संकटे कधी एकेकटी येत नाहीत, याची प्रचीती या काळात येथील लोकांना आली.

Maharashtra Times 17 Jul 2018, 4:00 am
गेल्या आठवड्यात मुंबईसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. मुंबईसह अन्य ठिकाणचे जनजीवन लवकर सावरले असताना वसई, विरार, नालासोपारा परिसरातील नागरिकांचे मात्र आठवडाभर हाल झाले. संकटे कधी एकेकटी येत नाहीत, याची प्रचीती या काळात येथील लोकांना आली. पावसाने झोडपले, पुराने वेढले, लोकलसेवा बंद पडली आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जे हाल जे झाले त्याबद्दल बोलायलाच नको.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heavy rains lash vasai virar
वसईकरांना वाली कोण ?


मुंबईलगतच्या एका विकसनशील परिसरातील लोकांवर अशी आपत्ती कोसळणे एकूणच आपल्या व्यवस्थेसाठी नामुष्कीजनक आहे. लोकल ठप्प झाल्याने भाईंदरपासून ते विरारपर्यंतच्या लोकांना तीन दिवस सक्तीची रजा घ्यावी लागली. वसई-विरार भागाला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या वसई अतिउच्च दाबकेंद्राच्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद झाला. वसई पट्ट्यातील या आपत्तीची फार तर पुढचे चार दिवस चर्चा होईल, वेदना ताज्या आहेत तोवर संताप व्यक्त होईल आणि सगळे विसरून लोक पुन्हा लोकलच्या गर्दीत हरवून जातील. वसई परिसरावर ही परिस्थिती का ओढवली याचा गंभीरपणे विचार होण्याची शक्यता कमीच आहे. असे होण्याची कारणे सामान्य लोकांपासून राज्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहेत. या संकटाचे निर्माते कोण आहेत, हे ही सगळ्यांना माहीत आहेत. त्यांच्याविरुद्ध बोलण्याचीही कुणाची बिशाद नाही, तिथे कृती दूरच राहते.

वेगाने लोकसंख्या वाढत असलेल्या मुंबईलगतच्या या शहराच्या नियोजनासंदर्भातच मूळ प्रश्न आहेत. एकीकडे बांधकामे अनिर्बंध वाढत असताना पाणी वाहून जाण्याच्या जागा तसेच पाणथळ जागा कमी होत आहेत. त्यावर तातडीने पावले उचलून कारवाई केली नाही, तर भविष्यात हे संकट अधिक गंभीरपणे समोर येऊ शकते. त्याचवेळी वसईला संकटात लोटणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारायला हवा, आणि कारवाई म्हणजे त्यांच्याशी राजकीय युती करणे नव्हे, हे ही लक्षात घ्यावयास हवे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज