अ‍ॅपशहर

सूरबहार अन्नपूर्णा

सतारीपेक्षा जड असलेले आणि वाजविण्यास अवघड असलेले सूरबहार हे वाद्य लीलया वाजवून रसिकांची मने जिंकणाऱ्या अन्नपूर्णादेवी यांच्या निधनाने एक प्रतिभावंत कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. गेली काही वर्षे एकांतवासात असूनही त्यांचे नाव आजही त्या वाद्याशी जोडले जाणे, यातच त्यांची महानता दिसते.

Maharashtra Times 15 Oct 2018, 4:00 am
सतारीपेक्षा जड असलेले आणि वाजविण्यास अवघड असलेले सूरबहार हे वाद्य लीलया वाजवून रसिकांची मने जिंकणाऱ्या अन्नपूर्णादेवी यांच्या निधनाने एक प्रतिभावंत कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. गेली काही वर्षे एकांतवासात असूनही त्यांचे नाव आजही त्या वाद्याशी जोडले जाणे, यातच त्यांची महानता दिसते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindustani music loses a note annapurna devi passes away
सूरबहार अन्नपूर्णा


मध्य प्रदेशातील मैहर येथे १९२७ साली जन्माला आलेल्या अन्नपूर्णादेवींनी आपले वडील प्रसिद्ध संगीतकार अल्लाउद्दीन खान यांच्याकडे सुरुवातीला सतारचे, नंतर सूरबहारचे धडे गिरविले. मैहरचे तत्कालीन महाराज ब्रिजनाथ सिंह यांनी आपले राजगायक असलेल्या अल्लाउद्दीन खान यांच्या या नवजात कन्येचे नाव अन्नपूर्णा देवी असे ठेवले. शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याच्या जडणघडणीतही अन्नपूर्णादेवींचा मोठा वाटा होता. त्यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया, निखील बॅनर्जी, आशीश खान, अमित भट्टाचार्य व वसंत काब्रा यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. अल्लाउद्दीन खान यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांना अन्नपूर्णा देवी यांचा मोठा आधार होता. प्रख्यात सतार वादक पं. रविशंकर यांच्याशी त्यांचा १९४१ साली विवाह झाला होता. सुरुवातीच्या काही वर्षांत या दोघांनी एकत्र कार्यक्रमही केले होते. १९६२साली ते विभक्त झाले. तत्पूर्वी अन्नपूर्णा देवी यांनी जाहीर मैफिली थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय बदलावा यासाठी विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी विनवणी केली होती; परंतु त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. या काळात त्यांनी आपल्या शिष्यांकडे पूर्ण लक्ष दिले. १९८२ मध्ये त्यांनी ऋषीकुमार पांड्या यांच्याशी पुनर्विवाह केला.

चैत्र पौर्णिमेला जन्म झालेल्या या विलक्षण कलावतीचा जीवनकाल मोठा आणि विलक्षण ठरला. प्रतिभावान पित्याच्या या तितक्याच प्रतिभावान कन्येने अमाप लोकप्रियता अनुभवली होती. त्याचवेळी या सगळ्याकडे पाठ फिरविण्याचे धैर्यही त्यांच्याकडे होते. १९७७मध्ये केंद्राने त्यांना 'पद्मश्री' प्रदान केली. १९९१मध्ये त्यांना 'संगीत नाटक अकादमी'चा पुरस्कार मिळाला. रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारती विद्यापीठाने त्यांना १९९९ साली 'देशिकोत्तम', म्हणजे मानद डॉक्टरेट दिली. २००४साली 'संगीत नाटक अकादमी'ने त्यांना 'रत्न' म्हणून नावाजले. अन्नपूर्णा देवी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, त्यांनी जाहीर कार्यक्रम केले नाहीत, रेकॉर्डही काढल्या नाहीत, तरीही भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट वादक कलाकार म्हणून कायम नावाजल्या गेल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज