नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरूंचा सतत विरोध करीत आले आहेत. नेहरूंऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताचे चित्र वेगळे राहिले असते, असा थेट हल्ला मोदींनी मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्यासमक्ष केला होता. सत्तेत आल्यावरही मोदींच्या नेहरूविरोधाची धार तशीच आहे.
नेहरूंनी भारताचे विभाजन केले, असा आरोप त्यांनी संसदेतही केला. नेहरूंच्या स्मृतीला अर्पण केलेल्या दिल्लीतील तीन मूर्ती भवनात आजवरच्या सर्व पंतप्रधानांच्या स्मृती एकत्र करण्याचा प्रस्ताव मोदींनी आणला. मनमोहनसिंग यांनी पत्र लिहून या कारवाईला विरोध केला. नेहरू केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, याकडे लक्ष वेधले. तीन मूर्ती भवन नेहरूंनाच समर्पित असावे, अशी सूचना केली. काँग्रेसी नेत्यांवर परखड टीका करण्याची संस्कृती एकीकडे भाजप जोपासत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या आणि त्या पक्षातील महापुरुषांच्या योगदानाचा संघाच्या कार्यक्रमात सन्मान केल्याने भाजपच्या काही नेत्यांची नक्कीच अडचण झाली असेल.
सूर्योदय व्हावा मात्र तो आमच्याच आरवण्याने व्हावा, असे नाही या शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या योगदानाची प्रशंसा केली. काँग्रेसच्या नेतृत्वातील आंदोलनातून मिळालेले स्वातंत्र्य ही मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. देशाच्या विविधतेतील एकतेवर त्यांनी भर दिला. भाजपाच्या नेत्यांनी नेहरूंविषयीचा दुरावा दर्शवितानाच पटेलांविषयीचे ममत्व जपण्याचा सोयीस्कर प्रयत्न केला आहे. स्वत: पटेल यांनी मात्र गांधी आणि नेहरूंना आपले नेते मानले होते. काँग्रेसने फक्त स्वातंत्र्यच नव्हे तर स्वर्वस्वाचा त्याग करणारे महापुरूषही देशाला दिले, या सरसंघचालकांच्या उल्लेखामुळे काही भाजप नेत्यांच्या काँग्रेसद्वेषाची धार कमी व्हायला हवी. भागवत यांच्या चिंतनात भविष्यात फक्त भारताने नव्हे तर भाजपनेही बदलावे, असा मनोदय असू शकतो.
अनेक नेत्यांना बोलावूनही काँग्रेसी मंडळींनी संघाच्या या निमंत्रणाकडे पाठ फिरवली. देशाच्या पंतप्रधानांनी सर्व महापुरुषांविषयी आदराची भावना राखणे अपेक्षित असते. भाजपचे पक्षीय द्वेषाचे राजकारण भागवत यांच्या भाषणानंतर बदलावे, अशी अपेक्षा आहे. संघपरिवाराला कुणीच परके नसेल आणि काँग्रेसच्या योगदानाची एवढी आंतरिक जाणीव असेल तर काँग्रेसमुक्त भारताचा काही नेत्यांचा अट्टहास कशासाठी, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो.
नेहरूंनी भारताचे विभाजन केले, असा आरोप त्यांनी संसदेतही केला. नेहरूंच्या स्मृतीला अर्पण केलेल्या दिल्लीतील तीन मूर्ती भवनात आजवरच्या सर्व पंतप्रधानांच्या स्मृती एकत्र करण्याचा प्रस्ताव मोदींनी आणला. मनमोहनसिंग यांनी पत्र लिहून या कारवाईला विरोध केला. नेहरू केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, याकडे लक्ष वेधले. तीन मूर्ती भवन नेहरूंनाच समर्पित असावे, अशी सूचना केली. काँग्रेसी नेत्यांवर परखड टीका करण्याची संस्कृती एकीकडे भाजप जोपासत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या आणि त्या पक्षातील महापुरुषांच्या योगदानाचा संघाच्या कार्यक्रमात सन्मान केल्याने भाजपच्या काही नेत्यांची नक्कीच अडचण झाली असेल.
सूर्योदय व्हावा मात्र तो आमच्याच आरवण्याने व्हावा, असे नाही या शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या योगदानाची प्रशंसा केली. काँग्रेसच्या नेतृत्वातील आंदोलनातून मिळालेले स्वातंत्र्य ही मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. देशाच्या विविधतेतील एकतेवर त्यांनी भर दिला. भाजपाच्या नेत्यांनी नेहरूंविषयीचा दुरावा दर्शवितानाच पटेलांविषयीचे ममत्व जपण्याचा सोयीस्कर प्रयत्न केला आहे. स्वत: पटेल यांनी मात्र गांधी आणि नेहरूंना आपले नेते मानले होते. काँग्रेसने फक्त स्वातंत्र्यच नव्हे तर स्वर्वस्वाचा त्याग करणारे महापुरूषही देशाला दिले, या सरसंघचालकांच्या उल्लेखामुळे काही भाजप नेत्यांच्या काँग्रेसद्वेषाची धार कमी व्हायला हवी. भागवत यांच्या चिंतनात भविष्यात फक्त भारताने नव्हे तर भाजपनेही बदलावे, असा मनोदय असू शकतो.
अनेक नेत्यांना बोलावूनही काँग्रेसी मंडळींनी संघाच्या या निमंत्रणाकडे पाठ फिरवली. देशाच्या पंतप्रधानांनी सर्व महापुरुषांविषयी आदराची भावना राखणे अपेक्षित असते. भाजपचे पक्षीय द्वेषाचे राजकारण भागवत यांच्या भाषणानंतर बदलावे, अशी अपेक्षा आहे. संघपरिवाराला कुणीच परके नसेल आणि काँग्रेसच्या योगदानाची एवढी आंतरिक जाणीव असेल तर काँग्रेसमुक्त भारताचा काही नेत्यांचा अट्टहास कशासाठी, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो.