ओरिसा किनारपट्टीलगतच्या अब्दुल कलाम बेटावरून 'अग्नी-४' या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची सातवी चाचणी यशस्वी करून भारताने आपली संरक्षणसज्जता मजबूत करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.
'अग्नी' मालिकेत एकूण पाच क्षेपणास्त्रे असून, त्यांची प्रत्येकाची क्षमता आणि मारा करण्याचे टप्पे भिन्न आहेत. 'अग्नी १' हे एक टप्प्यातील क्षेपणास्त्र असून, १२५० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. 'अग्नी २'मध्ये मारा करण्याची मर्यादा दोन हजार किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. 'अग्नी ३' हे द्विस्तरीय आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून, ते ३५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. 'अग्नी ४'मध्ये ही मर्यादा चार हजार किलोमीटरपर्यंत आहे. 'अग्नी' मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रे अण्वस्त्रे वाहू शकतात आणि डागू शकतात. 'अग्नी ४'ची पहिली चाचणी २०१४मध्ये झाली होती. त्यानंतर एकूण सात चाचण्या झाल्या असून, त्यातून या क्षेपणास्त्राच्या क्षमता तपासल्या गेल्या आहेत. द्विस्तरीय, घन इंधनावर चालणारे आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणारे 'अग्नी ४' हे क्षेपणास्त्र एक टनापर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या क्षेपणास्त्रात असल्याने ते स्मार्टही आहे. 'अग्नी ५' या क्षेपणास्त्राची सातवी चाचणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. ही क्षेपणास्त्रे विकसित करून भारताने आपली संरक्षणसज्जता वाढविली आहे, यात शंका नाही. 'तुम्हाला शांतता हवी असेल, तर युद्धाची तयारी करा' अशी एक म्हण आहे. युद्धसज्ज होणे, त्यासाठी संरक्षण साहित्यांची जमवाजमव करणे, आधुनिक तंत्रज्ञानाची शस्त्रास्त्रे विकसित करणे त्यामुळे आवश्यकच आहे. त्यामुळे याबाबतीत भारताकडून होत असलेले प्रयत्न या आवश्यकतेची पूर्तता करणारेच आहेत. आपल्याबरोबर यापूर्वी युद्ध छेडलेल्या पाकिस्तान आणि चीन या देशांचा शेजार भारताला लाभला आहे. पुरेशी संरक्षणसज्जता नसल्यास काय होते याचा कटू अनुभव भारताने चीनबरोबरील युद्धात घेतला आहे. हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. शिवाय या दोघांची आघाडीही आहे. याखेरीज दक्षिण आशियातील देशांत आर्थिक हितसंबंध निर्माण करीत चीन भारताची सामरिक कोंडी करतो आहे आणि 'डोकलाम'सारखी स्थिती निर्माण करून भारताच्या संरक्षणसज्जतेची कसोटीही पाहतो आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणसज्जतेचे महत्त्व अधोरेखित होते.
'अग्नी' मालिकेत एकूण पाच क्षेपणास्त्रे असून, त्यांची प्रत्येकाची क्षमता आणि मारा करण्याचे टप्पे भिन्न आहेत. 'अग्नी १' हे एक टप्प्यातील क्षेपणास्त्र असून, १२५० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. 'अग्नी २'मध्ये मारा करण्याची मर्यादा दोन हजार किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. 'अग्नी ३' हे द्विस्तरीय आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून, ते ३५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. 'अग्नी ४'मध्ये ही मर्यादा चार हजार किलोमीटरपर्यंत आहे. 'अग्नी' मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रे अण्वस्त्रे वाहू शकतात आणि डागू शकतात. 'अग्नी ४'ची पहिली चाचणी २०१४मध्ये झाली होती. त्यानंतर एकूण सात चाचण्या झाल्या असून, त्यातून या क्षेपणास्त्राच्या क्षमता तपासल्या गेल्या आहेत. द्विस्तरीय, घन इंधनावर चालणारे आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणारे 'अग्नी ४' हे क्षेपणास्त्र एक टनापर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या क्षेपणास्त्रात असल्याने ते स्मार्टही आहे. 'अग्नी ५' या क्षेपणास्त्राची सातवी चाचणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. ही क्षेपणास्त्रे विकसित करून भारताने आपली संरक्षणसज्जता वाढविली आहे, यात शंका नाही. 'तुम्हाला शांतता हवी असेल, तर युद्धाची तयारी करा' अशी एक म्हण आहे. युद्धसज्ज होणे, त्यासाठी संरक्षण साहित्यांची जमवाजमव करणे, आधुनिक तंत्रज्ञानाची शस्त्रास्त्रे विकसित करणे त्यामुळे आवश्यकच आहे. त्यामुळे याबाबतीत भारताकडून होत असलेले प्रयत्न या आवश्यकतेची पूर्तता करणारेच आहेत. आपल्याबरोबर यापूर्वी युद्ध छेडलेल्या पाकिस्तान आणि चीन या देशांचा शेजार भारताला लाभला आहे. पुरेशी संरक्षणसज्जता नसल्यास काय होते याचा कटू अनुभव भारताने चीनबरोबरील युद्धात घेतला आहे. हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. शिवाय या दोघांची आघाडीही आहे. याखेरीज दक्षिण आशियातील देशांत आर्थिक हितसंबंध निर्माण करीत चीन भारताची सामरिक कोंडी करतो आहे आणि 'डोकलाम'सारखी स्थिती निर्माण करून भारताच्या संरक्षणसज्जतेची कसोटीही पाहतो आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणसज्जतेचे महत्त्व अधोरेखित होते.