भारतातील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या सर्वसाधारण सभेत अनेक योजनांसाबेत प्रतिक्षित जिओ गिगा फायबर ब्रॉडबँडच्या योजनेच्या पुढील महिन्यापासून होत असलेल्या शुभारंभाची घोषणा केली. तसेच, आपला हिस्सा जगातील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या सौदी अरेबियातील सौदी अरॅमको या कंपनीस विकण्यात येणार असल्याचेही घोषित केले. जिओच्या नवीन सेवांच्या अत्यंत आकर्षक योजनांची चर्चा होणे साहजिक आहे. तसेच या विक्री खरेदी व्यवहारातून या दोन्ही तेल व रसायन उद्योगाशी संबंधित व्यवहाराची चर्चा होणेही आवश्यक आहे. व्यवहारातील केवळ आकडेवारीने सर्वांना चकित करून सोडले तरी त्या मागची कारणे ही दोन्ही कंपन्यांची असलेली त्या मागची अपरिहार्यता आणि साधलेली संधीही पाहायला हवी. जगभर तेल उद्योगात होत असलेले बदल आणि भारताचे या तेलाशी जुळलेले नशीब या दृष्टीकोनातूनही ही घटना पाहता येते. रिलायन्स ही देशातील सर्वाधिक नफायुक्त कंपनी असूनही तिला आपला तब्बल एक पंचमांश हिस्सा विकण्याची का वेळ आली असावी? तसेच, जगातील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या अरॅमकोलाही रिलायन्समध्ये भागीदारी होण्याची गरज का वाटली असेल, या प्रश्नाची उत्तरे शोधायला हवीत. अरॅमको देऊ करीत असलेली किंमत खूप अधिक आहे. अरॅमको ही किंमत देऊ शकते हे खरे आहे. गेल्या सहा महिन्यात त्याच्या नफ्यात १२ टक्के घट होऊनही. सौदीला तेलावर आधारित भवितव्यावर विश्वास उरलेला नाही आणि त्याच्या राजकुमार मोहम्मद बिन सलेम यांच्या भविष्यकालीन योजनेत विविधांगी उद्योग विस्तारातून प्रगती साधण्याची योजना आहे. त्यादृष्टीने या कंपनीचा आयपीओ देखील येत्या एकदोन वर्षांत निघणार आहे. रिलायन्सला त्याचे आधारस्तंभ असलेल्या गुंतवणुकदारांच्या संभाव्य लाभांवर होऊ शकणाऱ्या परिणामांच्या चिंतेची काळजी आहे. तसेच त्याला आपल्या तेल व रसायन उद्योगात सध्या असलेल्या अडचणींचीही आहे. वाढत्या कर्जामुळे रिलायन्सच्या लाभांशावर परिणाम होऊ शकत असल्याने दीड वर्षांत कंपनी कर्जमुक्त करण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. सध्या आपल्या देशात असलेल्या आर्थिक मंदीच्या कचाट्यामुळे तेलाला मागणी नाही. त्याची झळ अंबानींच्या ज्या तेल प्रकल्पांना लागणार आहे, त्यांना या करारामुळे ऊर्जा प्राप्त होईल. तसेच, नजीकच्या भविष्यकाळात सौदीला तेलाची मागणी कमी होत असल्याने पोचणारी झळही नुकसान करणार नाही. आपल्या देशाचे अर्थकरण तेलाच्या भोवती फिरते त्यामुळे अरॅमकोला आपली गुंतवणूक वसूल करण्यास फार काळ लागणार नाही.
अपरिहार्यतेतून संधी
भारतातील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या सर्वसाधारण सभेत अनेक योजनांसाबेत प्रतिक्षित जिओ गिगा फायबर ब्रॉडबँडच्या योजनेच्या पुढील महिन्यापासून होत असलेल्या शुभारंभाची घोषणा केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2019, 7:29 am