अ‍ॅपशहर

आत्मपरीक्षण करणार?

राहुल गांधी अजूनही समजदार झालेले नाहीत, त्यांना आणखी वेळ दिला पाहिजे, असे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित बॅकफूटवर गेल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत देताना त्यांनी हे विधान केले होते आणि त्यावरून हायकमांडने डोळे वटारताच त्यांनी त्वरेने घुमजाव केले, हे उघड गुपित आहे.

Maharashtra Times 27 Feb 2017, 2:20 am
राहुल गांधी अजूनही समजदार झालेले नाहीत, त्यांना आणखी वेळ दिला पाहिजे, असे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित बॅकफूटवर गेल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत देताना त्यांनी हे विधान केले होते आणि त्यावरून हायकमांडने डोळे वटारताच त्यांनी त्वरेने घुमजाव केले, हे उघड गुपित आहे. वास्तविक, आतापर्यंत विरोधकांकडून राहुल यांच्यावर जी टीका केली जात होती, त्यात पक्षाच्या निष्ठावान आणि गांधी कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असलेल्या दीक्षित यांनी सूर मिसळल्यामुळे पक्षात खळबळ उडाली. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसला जे हादरे बसले, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली. त्यात वावगे काहीही नसले तरी निष्ठावान म्हणविणाऱ्या, पक्षकृपेने कित्येक वर्षे दिल्लीसारख्या महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या नेत्याकडून असा घरचा आहेर दिला जाणे भारताच्या राजकारणात धक्कादायकच मानले जाते. प्रत्येक पक्ष अंतर्गत लोकशाहीचे ढोल वाजवत असला तरी नेत्यांना एवढे स्वातंत्र्य अजून कोणत्याही पक्षाने दिलेले नाही. काँग्रेसमध्ये तर एवढी लोकशाही कधीच नव्हती. पक्षाचा देशभर एवढा दबदबा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi on back foot
आत्मपरीक्षण करणार?


होता की कोणताही नेता गांधी कुटुंबियांविरुद्ध अवाक्षर काढण्यास धजावत नव्हता, पण आज त्याची अवस्था निर्नायकी आहे.

सर्वच निवडणुकांमध्ये त्याची इतकी पडझड झाली आहे की, पक्षनेतृत्वावर कार्यकर्तेच टीकेची झोड उठवत आहेत. अशा वातावरणात दीक्षित यांनीही राहुल हे प्रगल्भ नेतृत्व नसल्याचा निष्कर्ष काढल्यामुळे खळबळ होणे स्वाभाविक आहे. पक्षनेत्याविरुद्ध किंवा विरोधकांच्या बाजूने विधाने करण्याचा अधिकार कोणत्याही राजकीय व्यक्तीला नाही, हा

अलिखित नियम दीक्षित यांनी पाळलेला नाही, पण त्यांच्याकडे आजघडीला गमावण्यासारखे काहीही नसल्यामुळे त्यांनी मनमोकळी मुलाखत दिली असावी. नेत्याचे गुण केवळ वक्तृत्वातून नव्हे, तर रणनीतीतूनही दिसावयास हवेत. अर्थात, केवळ एका घराण्याच्या इशाऱ्यावर जो पक्ष चालतो, तेथे इतर कोणतेच नियम लागू

पडत नाहीत. अलिकडच्या पराभवांमधून धडा घेऊन केवळ राहुल गांधी यांनाच नव्हे, तर काँग्रेस पक्षाला अधिक प्रगल्भ होण्याची गरज आहे. शीला दीक्षित यांच्या विधानावरून आत्मपरीक्षण केले, तरी हा पक्ष नवी उभारी घेऊ शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज