राजमाची गडावर होत असलेली दारू आणि हुक्का पार्टी दुर्गप्रेमींनी उधळून लावण्याची घटना, ऐतिहासिक वारसास्थळांच्या जतनाबाबतचे दुर्लक्ष अधोरेखित करणारी आहे. दुर्गप्रेमींची जागरूकता वाखाणण्याजोगी असली, तरी पोलिस आणि पुरातत्त्व खात्याने त्यांचे काम करण्याची गरजही या घटनेने पुन्हा एकदा दिसली. गड, किल्ले ही प्रेरणास्थाने; परंतु त्यांकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नाही.
वास्तविक, त्यांकडे पाहण्याची आपली दृष्टीच अविकसित झालेली नाही. ही सारी स्थळे आपल्याला इतिहासाची जाणीव करून देतात. आपण वर्तमानात जगत असलो, तरी पाय इतिहासाच्या खांद्यावर असतात आणि आपल्या खांद्यावर वर्तमान असतो. ही एक साखळी आहे. भविष्यासाठी इतिहासाचा अभ्यास वर्तमानात करायचा असतो. वर्तमानातील गोष्टींचे दुवे इतिहासातून जोडता येतात. ऐतिहासिक घटना, घडामोडी, त्यावेळचे पर्यावरण या साऱ्याचा अभ्यास भविष्यासाठी उपयुक्त ठरतो. नेमकी हीच जाणीव आपल्याकडे नाही. यामुळे ऐतिहासिक ठिकाणे ही फक्त पर्यटन किंवा पार्टीची स्थळे म्हणून पाहिली जातात.
या घटनांना दुसरी बाजूही आहे. इतिहासाचे महत्त्व, त्याचा अभ्यास आणि त्याची गरज हे सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत जात नाही. काहीवेळा सामान्यांना दंडेलीही सहन करावी लागते. या साऱ्यातून सुवर्णमध्य काढायला हवा. शिवाजी महाराजांचे कार्य जगभर जाण्यासाठी अरबी समुद्रात भव्य स्मारक होणार आहे. त्याबरोबर त्यांच्या जीवनात महत्त्व असणाऱ्या वास्तूंचाही विचार करायला हवा. त्या पूर्वीच्या डौलाने उभ्या राहाव्यात, त्या त्या वास्तूची तेथे माहिती मिळावी, आपल्या इतिहासाचे साहित्य काही परकीय भाषांतही आपल्याकडून निर्माण व्हावे आणि त्यातून ती इतिहासात डोकावण्याची कवाडे व्हावीत. पर्यटनाचा आनंद मिळविण्यास कोणाची ना नाही; परंतु त्याबरोबर त्या त्या ठिकाणांचा आदर राखला जावा, ही अपेक्षा वावगी नाही. यातला पुढाकार इतिहासप्रेमी, त्याविषयीचे अभ्यासक्रम असणाऱ्या संस्था आणि राज्य व केंद्राचे पुरातत्व विभाग यांनी घ्यावा. सर्व संबंधितांनी याबाबत एकत्र यावे. सारेच एकत्र झाले, तर ऐतिहासिक स्थळांविषयी जागरुकता येईल. गावोगावच्या प्राचीन व ऐतिहासिक स्थळांचे मूक आक्रंदन कमी होईल, त्यांचे जतन होईल, त्यातून रोजगार निर्मिती होईल.
वास्तविक, त्यांकडे पाहण्याची आपली दृष्टीच अविकसित झालेली नाही. ही सारी स्थळे आपल्याला इतिहासाची जाणीव करून देतात. आपण वर्तमानात जगत असलो, तरी पाय इतिहासाच्या खांद्यावर असतात आणि आपल्या खांद्यावर वर्तमान असतो. ही एक साखळी आहे. भविष्यासाठी इतिहासाचा अभ्यास वर्तमानात करायचा असतो. वर्तमानातील गोष्टींचे दुवे इतिहासातून जोडता येतात. ऐतिहासिक घटना, घडामोडी, त्यावेळचे पर्यावरण या साऱ्याचा अभ्यास भविष्यासाठी उपयुक्त ठरतो. नेमकी हीच जाणीव आपल्याकडे नाही. यामुळे ऐतिहासिक ठिकाणे ही फक्त पर्यटन किंवा पार्टीची स्थळे म्हणून पाहिली जातात.
या घटनांना दुसरी बाजूही आहे. इतिहासाचे महत्त्व, त्याचा अभ्यास आणि त्याची गरज हे सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत जात नाही. काहीवेळा सामान्यांना दंडेलीही सहन करावी लागते. या साऱ्यातून सुवर्णमध्य काढायला हवा. शिवाजी महाराजांचे कार्य जगभर जाण्यासाठी अरबी समुद्रात भव्य स्मारक होणार आहे. त्याबरोबर त्यांच्या जीवनात महत्त्व असणाऱ्या वास्तूंचाही विचार करायला हवा. त्या पूर्वीच्या डौलाने उभ्या राहाव्यात, त्या त्या वास्तूची तेथे माहिती मिळावी, आपल्या इतिहासाचे साहित्य काही परकीय भाषांतही आपल्याकडून निर्माण व्हावे आणि त्यातून ती इतिहासात डोकावण्याची कवाडे व्हावीत. पर्यटनाचा आनंद मिळविण्यास कोणाची ना नाही; परंतु त्याबरोबर त्या त्या ठिकाणांचा आदर राखला जावा, ही अपेक्षा वावगी नाही. यातला पुढाकार इतिहासप्रेमी, त्याविषयीचे अभ्यासक्रम असणाऱ्या संस्था आणि राज्य व केंद्राचे पुरातत्व विभाग यांनी घ्यावा. सर्व संबंधितांनी याबाबत एकत्र यावे. सारेच एकत्र झाले, तर ऐतिहासिक स्थळांविषयी जागरुकता येईल. गावोगावच्या प्राचीन व ऐतिहासिक स्थळांचे मूक आक्रंदन कमी होईल, त्यांचे जतन होईल, त्यातून रोजगार निर्मिती होईल.