ज्ञान-विज्ञान-संशोधनाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत देशाची उंची वाढली असावी, अंधश्रद्धांचे जळमट बऱ्यापैकी झाडून निघाले असावे, प्रतिगामीपणाच्या छायेत अडकलेला देश त्या काळ्याकुट्ट अंधारातून बाहेर पडत असावा, अशी भाबडी आशा वाटत असतानाच काही रूढीवादी मंडळींना विज्ञानाचे वावडे असावे की काय, असा प्रश्न पडू लागला आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे आंबापुराण चांगलेच गाजते आहे. माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते, अहो अशा दीडशे जोडप्यांना अपत्ये झाली, मूल होत नसलेल्यांनी आपला वेळ, पैसा खर्च करण्याची गरज नाही, असा दावा नाशिक येथे एका बैठकीत करून त्यांनी धम्माल तर उडवून दिलीच, पण शास्त्र शाखेचे सुवर्णपदक मिळवणारा हा माणूस इतका कसा काय अंधश्रद्धाळू, असा प्रश्नही त्यांनी महाराष्ट्रासमोर उभा केला. ते केवळ शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे नव्हेत तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'गुरुजी' असल्याने त्यांच्या या वक्तव्याचे मोठेच हसे होते आहे.
गुरुजी आम्हाला नवे काहीतरी शिकवा, हाताला काम देणारे काहीतरी सांगा, दोनवेळची भूक कशी भागवता येईल, याची वाट दाखवा अशा आशेने त्यांच्याकडे आकृष्ट झालेल्या नव्या पिढीचा त्यांचे हे सडके विचार ऐकून भ्रमनिरासच झाला असावा. भिडेंचे समर्थक त्यांची प्रतिमा शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि नवतरूणांचा तारणहार अशी उभी करतात. पण भिडेंनी लावलेला हा भलताच शोध समाजाला पुन्हा शंभर वर्षे मागे घेऊन जाणारा आहे. त्यांनी आजचे सर्वच प्रगत शास्त्र गुंडाळून ठेवले आहे. त्यांच्या या अज्ञानावर टीकेची झोड उठणे साहजिकच, पण एवढ्यावर चालणार नाही. अंधश्रद्धा पसरवणे, तिला खतपाणी घालणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे त्यांना कोणीतरी एकदा ठणकावून सांगण्याचीच गरज आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे आंबापुराण चांगलेच गाजते आहे. माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते, अहो अशा दीडशे जोडप्यांना अपत्ये झाली, मूल होत नसलेल्यांनी आपला वेळ, पैसा खर्च करण्याची गरज नाही, असा दावा नाशिक येथे एका बैठकीत करून त्यांनी धम्माल तर उडवून दिलीच, पण शास्त्र शाखेचे सुवर्णपदक मिळवणारा हा माणूस इतका कसा काय अंधश्रद्धाळू, असा प्रश्नही त्यांनी महाराष्ट्रासमोर उभा केला. ते केवळ शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे नव्हेत तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'गुरुजी' असल्याने त्यांच्या या वक्तव्याचे मोठेच हसे होते आहे.
गुरुजी आम्हाला नवे काहीतरी शिकवा, हाताला काम देणारे काहीतरी सांगा, दोनवेळची भूक कशी भागवता येईल, याची वाट दाखवा अशा आशेने त्यांच्याकडे आकृष्ट झालेल्या नव्या पिढीचा त्यांचे हे सडके विचार ऐकून भ्रमनिरासच झाला असावा. भिडेंचे समर्थक त्यांची प्रतिमा शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि नवतरूणांचा तारणहार अशी उभी करतात. पण भिडेंनी लावलेला हा भलताच शोध समाजाला पुन्हा शंभर वर्षे मागे घेऊन जाणारा आहे. त्यांनी आजचे सर्वच प्रगत शास्त्र गुंडाळून ठेवले आहे. त्यांच्या या अज्ञानावर टीकेची झोड उठणे साहजिकच, पण एवढ्यावर चालणार नाही. अंधश्रद्धा पसरवणे, तिला खतपाणी घालणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे त्यांना कोणीतरी एकदा ठणकावून सांगण्याचीच गरज आहे.