अ‍ॅपशहर

अभद्रतेचा कळस

जेएनयूतील विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रव्यापी करण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांनी केले. कन्हैया कुमार हा विद्यार्थी नेता या आंदोलनातून पुढे आला.

Maharashtra Times 26 Sep 2017, 12:57 am
जेएनयूतील विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रव्यापी करण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांनी केले. कन्हैया कुमार हा विद्यार्थी नेता या आंदोलनातून पुढे आला. तेथील विद्यार्थ्यांचा कल्लोळ देशभर पोहोचविण्यात डाव्यांची भूमिका महत्त्वाची होती. यंदाच्या निवडणुकीत एनएसयूआय आणि डाव्यांनी अभाविपला मात दिली. केंद्रातील सरकारचा हस्तक्षेप चूक होता या संकेतांची पाठराखण निकालांनी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम university issues banaras
अभद्रतेचा कळस


विद्यार्थ्यांचे आंदोलन चेतविण्यात पक्षांना नेहमीच स्वारस्य असते. मागे जेएनयू पेटले. सध्या बीएचयूकडे लक्ष आहे. ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तील आंदोलन चिघळले आहे. वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ. त्यांचा वाराणसी दौरा आटोपताच वादाला तोंड फुटले. या विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या छेडखानीवरून आंदोलनाचा भडका उडाला. सुरक्षा रक्षकांनी लगेच कारवाई न केल्याने हे प्रकरण वाढले. दोषी विद्यार्थ्यांवर कारवाईऐवजी तक्रार करणाऱ्या विद्यार्थीनींनाच सद्‍वर्तनाचे डोस पाजण्यात आले, असा आरोप होतो आहे. विद्यार्थिनींनी रात्री बाहेर कशाला पडावे इथपासून छेड काढून पळणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले का नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती विद्यार्थिनींवर झाली, असा आरोप आंदोलकांनी केला. कुलगुरूंच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या संतप्त विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि आदोलनाचा भडका उडाला. मुख्यमंत्री योगींनी तातडीने लक्ष घालून घटनेचा अहवाल मागविला. विद्यार्थिनींची सुरक्षा जपायलाच हवी, असे विद्यापीठाने स्पष्ट केले. कारवाईत निर्दयता झळकणार नाही, याची काळजी पोलिसांनी आणि प्रशासनाने घ्यायला हवी. दहा पोलिस ठाण्यांची कुमक तैनात करूनही विद्यार्थिनींचा संताप शांत होत नसेल तर गांभीर्य समजून घ्यायला हवे.

अनेक महिन्यांपासून काही विद्यार्थी अभद्र व्यवहार करायचे. त्यांच्या अश्लील हातवाऱ्यांमुळे मुलींना वसतिगृहाच्या खिडकीत उभे राहण्याचीही सोय उरली नव्हती. संध्याकाळी सहानंतर पहाटे काळोख दूर होईपर्यंत मुलींनी बाहेर पडू नये, असा आदेशच काढण्यात आला. टगेगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करायचा सोडून विद्यार्थिनींवर निर्बंध घालणे चूक होते. लाठीमाराचा अनेक राजकीय पक्षांनी निषेध केला. राहुल गांधींनी भाजपावर टीका केली. हे होणे क्रमप्राप्तच आहे. मोदींचा मतदारसंघ असल्याने देशाचे लक्ष बीएचयूकडे असणे स्वाभाविक आहे. संरक्षित वातावरण प्रदान करणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. जेएनयूत डोस दिले, बीएचयूतील संताप कसा आवरणार, असा प्रश्न अनेकांनी समाजमाध्यमांतून केला. वातावरणातील अभद्रता संपावी, असे मुलींना वाटले तर त्यात चूक काय?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज