उत्तरप्रदेशात दणदणीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने या राज्यात आपल्या सरकारची आगामी पावले कोणत्या दिशेने पडतील, याची झलकच जणू दाखवायला सुरुवात केली आहे. सारा देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नव्या निर्णयांकडे उत्सुकतेने पाहतो आहे. आता पुढे काय? भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटणार काय? यांसारखे प्रश्न जनमानसाकडून विचारले जाणे किंवा ते उपस्थित होणे साहजिक आहे. गोरखपूर मठाच्या अधिपतीपदावरून राज्याचे सत्ताधिपती बनलेले कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर लगेचच त्या दिशेने कामालाही लागले. दोनच दिवसांत त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णयांची घोषणा केली. त्याची सुरुवात करताना त्यांनी राज्यातील अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याचे फर्मान सोडले आणि तशी यंत्रणाही कामाला लावली. राज्यात छापे, धरपकड सुरू झाली आहे. गो-हत्येच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभर गेल्याच वर्षी पेटलेले राजकारण काही नवे नाही. योगी आदित्यनाथ यांनी सत्तारूढ झाल्यानंतर घाईने हा निर्णय लागू केला. त्याचे पडसाद येणाऱ्या काळात उमटत राहतील. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था राखण्याचे आदेश त्यांनी गृहखात्याला दिले आहेत. भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासही प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्र्यांना पंधरा दिवसांत चल-अचल संपत्ती जाहीर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. सध्यातरी लोकप्रिय निर्णय म्हणूनच या अन्य आदेश-निर्देशांकडे पाहावे लागेल. योगींनी लोकसभेच्या निरोपाच्या भाषणात दिलेली उत्तर प्रदेशातील ‘सर्व काही बदलू’ ही ग्वाही बरीच बोलकी आहे. त्याचा अर्थ समजावून घ्यावा लागेल. राज्याचा मागासलेला चेहरा बदलून टाकण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले तर बरे होईल; पण अयोध्येत राममंदिर उभारणीचा कळीचा आणि भावनेचा विषय त्यांच्या अजेंड्यावर प्राधान्याने राहील, असे संकेत आहेत. यातून गेली पंधरा वर्षे थंडावलेल्या धार्मिक संघर्षाला नव्याने सुरुवात होण्याचा धोका संभवतो. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी मुलायम, अखिलेश, मायावतींचे जातीय धृवीकरणाचे राजकारण झुगारून मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली. या विजयाचे अनेक अर्थ असले तरी याचा खरा अर्थ राज्याच्या जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे हाच आहे. सर्वच धर्म-जातीसमूह मोठ्या अपेक्षेने सरकारकडेडोळे लावून बसले आहेत, हे योगींनाही विसरता येणार नाही!
मंत्र्यांना पंधरा दिवसांत चल-अचल संपत्ती जाहीर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. सध्यातरी लोकप्रिय निर्णय म्हणूनच या अन्य आदेश-निर्देशांकडे पाहावे लागेल. योगींनी लोकसभेच्या निरोपाच्या भाषणात दिलेली उत्तर प्रदेशातील ‘सर्व काही बदलू’ ही ग्वाही बरीच बोलकी आहे. त्याचा अर्थ समजावून घ्यावा लागेल. राज्याचा मागासलेला चेहरा बदलून टाकण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले तर बरे होईल; पण अयोध्येत राममंदिर उभारणीचा कळीचा आणि भावनेचा विषय त्यांच्या अजेंड्यावर प्राधान्याने राहील, असे संकेत आहेत. यातून गेली पंधरा वर्षे थंडावलेल्या धार्मिक संघर्षाला नव्याने सुरुवात होण्याचा धोका संभवतो. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी मुलायम, अखिलेश, मायावतींचे जातीय धृवीकरणाचे राजकारण झुगारून मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली. या विजयाचे अनेक अर्थ असले तरी याचा खरा अर्थ राज्याच्या जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे हाच आहे. सर्वच धर्म-जातीसमूह मोठ्या अपेक्षेने सरकारकडेडोळे लावून बसले आहेत, हे योगींनाही विसरता येणार नाही!