सततचा दुष्काळ, नापिकी या दुष्टचक्रात सापडलेल्या ताकतोडा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील ग्रामस्थांनी गावच विक्रीला काढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेती कोरडवाहू, सततच्या दुष्काळामुळे हे गाव ओस पडले आहे. गेल्या चार वर्षांपासून पीक संरक्षण विमा मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जुलै महिन्याचा तिसरा आठवडा संपला तरी मराठवाड्यात जेमतेम १४१ मिमी पाऊस पडला आहे. ताकतोडा हे एकमेव गाव नाही, तर अशी शेकडो गावे मराठवाडा आणि विदर्भात सापडतील.
याच गावाची नव्हे तर, सर्व गावांचीच अवस्था विषन्न करणारी आहे. सरसकट कर्जमाफी, पिक विमा मिळावा, खासगी विमा कंपन्यांचे कर्ज माफ करावे अशा ताकतोडा येथील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. गेल्या आठवड्यात लागोपाठ दोन दिवस विद्यार्थ्यांनी शाळेवरच बहिष्कार घातला होता. पिक विम्याची रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी बहिष्काराचे हत्यार उपसून आपल्या पालकांना पाठिंबा दिला. ताकतोड्यातील पाचशे शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून विम्याची रक्कम मिळालेली नाही. या गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनेो लाभ मिळत नाहीत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मराठवाड्यात ६८.३२ लाखांपैकी तब्बल ४१.५ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळालेली नसल्याचे वास्तव आहे.
सरकारी मदतीच्या जाहिरातींचाच गलबला आहे, प्रत्यक्षात शेतकरी कोरडाच आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वंचित ठेवून कोट्यवधींचा नफा विमा कंपन्या कमावताहेत. या योजनेतील सदोष तरतुदी आणि अंमलबजावणीचा अभाव यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित रहावे लागत आहेत. दीड महिना झाला तरी मराठवाड्यात पाऊस नाही. त्यामुळे ग्रामीण जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. मराठवाड्यावर चिंतेचे ढग दाटून आले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळाच्या खाईत मराठवाडा आहे. दुबार पेरणीची वेळ आली तर त्यासाठी पैसा आणायचा कोठून हा शेतकऱ्यांसमोरचा आजचा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 'आ' वासून उभा आहे, तो वेगळाच. शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे? त्यामुळे ग्रामस्थांवर गाव विकायला काढण्याचे पाऊल उचलावे लागले. प्रशासनाने वेळीच या गावाला मदत केली पाहिजे, अन्यथा हे लोन राज्यभर पसरल्याशिवाय राहणार नाही.
याच गावाची नव्हे तर, सर्व गावांचीच अवस्था विषन्न करणारी आहे. सरसकट कर्जमाफी, पिक विमा मिळावा, खासगी विमा कंपन्यांचे कर्ज माफ करावे अशा ताकतोडा येथील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. गेल्या आठवड्यात लागोपाठ दोन दिवस विद्यार्थ्यांनी शाळेवरच बहिष्कार घातला होता. पिक विम्याची रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी बहिष्काराचे हत्यार उपसून आपल्या पालकांना पाठिंबा दिला. ताकतोड्यातील पाचशे शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून विम्याची रक्कम मिळालेली नाही. या गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनेो लाभ मिळत नाहीत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मराठवाड्यात ६८.३२ लाखांपैकी तब्बल ४१.५ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळालेली नसल्याचे वास्तव आहे.
सरकारी मदतीच्या जाहिरातींचाच गलबला आहे, प्रत्यक्षात शेतकरी कोरडाच आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वंचित ठेवून कोट्यवधींचा नफा विमा कंपन्या कमावताहेत. या योजनेतील सदोष तरतुदी आणि अंमलबजावणीचा अभाव यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित रहावे लागत आहेत. दीड महिना झाला तरी मराठवाड्यात पाऊस नाही. त्यामुळे ग्रामीण जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. मराठवाड्यावर चिंतेचे ढग दाटून आले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळाच्या खाईत मराठवाडा आहे. दुबार पेरणीची वेळ आली तर त्यासाठी पैसा आणायचा कोठून हा शेतकऱ्यांसमोरचा आजचा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 'आ' वासून उभा आहे, तो वेगळाच. शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे? त्यामुळे ग्रामस्थांवर गाव विकायला काढण्याचे पाऊल उचलावे लागले. प्रशासनाने वेळीच या गावाला मदत केली पाहिजे, अन्यथा हे लोन राज्यभर पसरल्याशिवाय राहणार नाही.