महाराष्ट्राच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी अजूनही नाल्यातील पाणी पितात. वऱ्हाडातील खारपाणपट्ट्यात दरवर्षी उन्हाळ्यात गावे ओस पडतात. मराठवाड्यातील टँकरवरची गर्दी वर्षानुवर्षे कायम दिसते. इतकी भीषण परिस्थिती असतानाही एक गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीस वर्षांचा काळही अपुरा पडतो. ही उदाहरणे वानगीदाखल धरली तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थिती वेगळी नाही.
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पाण्यासारखा साधा प्रश्न आपल्याला सोडविता आलेला नाही. अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे काम येथे मोलाचे ठरते. गुण्यागोविंदाने नांदणारी गावे आज जात, धर्म, पंथ, पक्ष अशा चौकडीत अडकून पडली आहेत. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावातील ही चौकडी मोडीत निघाली. सारेच एकत्र येऊन जलसंपदेसाठी झटू लागले. ४५ दिवसांत हजारो गावांची पाणीसाठवण क्षमता वाढली. सरकारी यंत्रणेला न जमलेले काम लोकसहभागातून झाले. यंदा राज्यात ७५ तालुक्यांतील चार हजारांहून अधिक गावे सहभागी झाली. लाखो ग्रामस्थांनी श्रमदानातून २२ हजार २६९ कोटी लिटर पाण्याची साठवणूक केली. अंतिम फेरीत सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी (आंधळी)ने पहिला पुरस्कार पटकावला. द्वितीय क्रमांक भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड या दोन गावांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांकही आनंदवाडी आणि नागपूर जिल्ह्यातील उमठा या दोन गावांना विभागून देण्यात आला.
पहिल्या पाच गावांचे काम उत्कृष्ट ठरून त्यांना पुरस्कार मिळाले असले तरी इतर गावांमध्ये दिसलेली एकजूट कुठल्याही पैशांनी घडवून आणणे शक्य नाही. गावांतील ही एकी पाहून सत्ताधारी आणि विरोधकांत विचारएकी झाली. वॉटर कप स्पर्धेच्या पुण्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात मतभेद बाजूला सारून पाण्यासाठी एकत्र येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पुढील तीन वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात सिंचनाचा मुद्दा समोर आला. त्यावरून सर्वपक्षीय नेत्यांनी तात्पुरती वेळ मारून नेली असली तरी हा मुद्दा दुर्लक्षित करण्याजोगा नाही. पाणी फाउंडेशनमध्ये सरकारी अधिकारी तत्परता दाखवितात. तर जलयुक्त शिवार अभियानात घोटाळे समोर येतात. म्हणून राज्य पातळीवर याचा मॉडेल म्हणून विचार व्हावा.
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पाण्यासारखा साधा प्रश्न आपल्याला सोडविता आलेला नाही. अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे काम येथे मोलाचे ठरते. गुण्यागोविंदाने नांदणारी गावे आज जात, धर्म, पंथ, पक्ष अशा चौकडीत अडकून पडली आहेत. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावातील ही चौकडी मोडीत निघाली. सारेच एकत्र येऊन जलसंपदेसाठी झटू लागले. ४५ दिवसांत हजारो गावांची पाणीसाठवण क्षमता वाढली. सरकारी यंत्रणेला न जमलेले काम लोकसहभागातून झाले. यंदा राज्यात ७५ तालुक्यांतील चार हजारांहून अधिक गावे सहभागी झाली. लाखो ग्रामस्थांनी श्रमदानातून २२ हजार २६९ कोटी लिटर पाण्याची साठवणूक केली. अंतिम फेरीत सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी (आंधळी)ने पहिला पुरस्कार पटकावला. द्वितीय क्रमांक भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड या दोन गावांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांकही आनंदवाडी आणि नागपूर जिल्ह्यातील उमठा या दोन गावांना विभागून देण्यात आला.
पहिल्या पाच गावांचे काम उत्कृष्ट ठरून त्यांना पुरस्कार मिळाले असले तरी इतर गावांमध्ये दिसलेली एकजूट कुठल्याही पैशांनी घडवून आणणे शक्य नाही. गावांतील ही एकी पाहून सत्ताधारी आणि विरोधकांत विचारएकी झाली. वॉटर कप स्पर्धेच्या पुण्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात मतभेद बाजूला सारून पाण्यासाठी एकत्र येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी पुढील तीन वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात सिंचनाचा मुद्दा समोर आला. त्यावरून सर्वपक्षीय नेत्यांनी तात्पुरती वेळ मारून नेली असली तरी हा मुद्दा दुर्लक्षित करण्याजोगा नाही. पाणी फाउंडेशनमध्ये सरकारी अधिकारी तत्परता दाखवितात. तर जलयुक्त शिवार अभियानात घोटाळे समोर येतात. म्हणून राज्य पातळीवर याचा मॉडेल म्हणून विचार व्हावा.