पंजाब आणि हरयाणातील शेतांमध्ये कापणीच्या हंगामानंतर जाळला जाणारा कचरा, पेट कोक आणि फर्नेस ऑइल जाळणारे उद्योग, बांधकाम आणि खोदकामांसह रस्त्यांवर उडणारी धूळ, औष्णिक वीजकेंद्रे, लक्षावधी वाहनांमुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडीतून होणारे प्रदूषण, अविरत चालणाऱ्या बांधकाम आणि खोदकामांमुळे रस्त्यांवर उडणारी धूळ आदींचे प्रमाण शिगेला पोहोचून दरवर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली गॅस चेंबर बनते. या नोव्हेंबरातही तसेच घडणार हे गृहित धरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा सम-विषम क्रमांकाच्या गाड्यांच्या प्रयोगाची घोषणा केली आहे.
यापूर्वी २०१६ च्या पूर्वार्धात दोनदा झालेल्या या प्रयोगाचा तिसरा आणि शेवटचा अंक येत्या ४ ते १५ नोव्हेंबर होईल. नंतर तीन महिन्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक असल्यामुळे आम आदमी पार्टीच्या सरकारचे धोरणात्मक सातत्य त्यातून झळकेळ. वायुप्रदूषण शिगेला पोहोचून दरवर्षी नोव्हेंबरात दिल्लीचा श्वास कोंडतो. तरी त्यात वाहन प्रदूषणाचे योगदान १० टक्के असते. परिणामी काहीतरी वेगळे घडत असल्याचा गाजावाजा हेच सम-विषम प्रयोगाचे फलित. त्यातच महिला, दुचाकी चालक, सीएनजी, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने, व्हीव्हीआयपी आणि दूतावासांची वाहने या प्रयोगात नसतात. त्यामुळे या प्रयोगामुळे काय साधते, हा प्रश्नच आहे. यामुळे दिल्लीतील झोपडवासी 'आम आदमी' मतदार सुखावतात, असेही नाही. पण प्रदूषणाशी लढतो आहोत, हे केजरीवालांना दाखवायचे असते. गेल्या तीन वर्षांत विविध स्तरांवरील उपायांमुळे दिल्लीच्या हवेचा दर्जा २५ टक्क्यांनी सुधारला आहे. दिल्लीभोवती हरयाणा व उत्तर प्रदेशच्या दिशांनी बांधलेल्या दोन महामार्गांमुळे हवेचे प्रदूषण घटले. अशा स्थितीत हा प्रयोग अनावश्यक असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मत आहे. पण प्रसिद्धीपटू अरविंद केजरीवालांना हा लक्षवेधी प्रयोग आवश्यक वाटत असावा.
यापूर्वी २०१६ च्या पूर्वार्धात दोनदा झालेल्या या प्रयोगाचा तिसरा आणि शेवटचा अंक येत्या ४ ते १५ नोव्हेंबर होईल. नंतर तीन महिन्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक असल्यामुळे आम आदमी पार्टीच्या सरकारचे धोरणात्मक सातत्य त्यातून झळकेळ. वायुप्रदूषण शिगेला पोहोचून दरवर्षी नोव्हेंबरात दिल्लीचा श्वास कोंडतो. तरी त्यात वाहन प्रदूषणाचे योगदान १० टक्के असते. परिणामी काहीतरी वेगळे घडत असल्याचा गाजावाजा हेच सम-विषम प्रयोगाचे फलित. त्यातच महिला, दुचाकी चालक, सीएनजी, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने, व्हीव्हीआयपी आणि दूतावासांची वाहने या प्रयोगात नसतात. त्यामुळे या प्रयोगामुळे काय साधते, हा प्रश्नच आहे. यामुळे दिल्लीतील झोपडवासी 'आम आदमी' मतदार सुखावतात, असेही नाही. पण प्रदूषणाशी लढतो आहोत, हे केजरीवालांना दाखवायचे असते. गेल्या तीन वर्षांत विविध स्तरांवरील उपायांमुळे दिल्लीच्या हवेचा दर्जा २५ टक्क्यांनी सुधारला आहे. दिल्लीभोवती हरयाणा व उत्तर प्रदेशच्या दिशांनी बांधलेल्या दोन महामार्गांमुळे हवेचे प्रदूषण घटले. अशा स्थितीत हा प्रयोग अनावश्यक असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मत आहे. पण प्रसिद्धीपटू अरविंद केजरीवालांना हा लक्षवेधी प्रयोग आवश्यक वाटत असावा.