अखेर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचे घोडे गंगेत न्हाले. गेले काही दिवस भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोण यावर गुऱ्हाळ सुरू होते. माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांची शेवटी निवड झाली. ती तशी अपेक्षित होती, तरीही त्या निवडीसाठी अभूतपूर्व गोंधळ घातला गेला. खरे तर, अनिल कुंबळेने राजीनामा देण्यामागेच रवी शास्त्रीची नियुक्ती व्हावी हाच अजेंडा असल्याची चर्चा होती. ती खरी ठरली. शास्त्री यांची नियुक्ती होण्यात गैर काही नाही. शास्त्री यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत भारतीय संघाचे संचालकपद भूषविले होते. त्या कालावधीत त्यांचे विराट कोहली व इतर खेळाडूंशी चांगले ऋणानुबंध तयार झाले.
किंबहुना, शास्त्री यांचा खेळाडूंप्रती असलेला उदार दृष्टिकोन खेळाडूंना प्रिय होता. कदाचित, कुंबळेमध्ये हे गुण नसावेत आणि परिणामी, शास्त्रींना कर्णधार विराटसह अनेक खेळाडूंचे झुकते माप मिळाले असे म्हणता येईल. कुंबळेने राजीनामा दिल्यावर शास्त्री प्रशिक्षकपदी येणार अशी अटकळ बांधली जाऊ लागली. त्यासाठी मग बीसीसीआयने सगळा मंच तयार केला आणि अखेर शास्त्री यांच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ पडली. या सगळ्या घडामोडीत बीसीसीआयने घोळ का घातला हा प्रश्न आहे. प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले इथपर्यंत ठीक होते, पण शास्त्री यांनी अर्ज करताना ती मुदत वाढविण्यात आली. त्यावेळीच शास्त्री योग्य दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट होत होते. तरीही सल्लागार समितीकडून मुलाखतींचा फार्स, नव्या प्रशिक्षकासंदर्भात विराटशी चर्चा, प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करण्यात विलंब, नाव जाहीर झाल्याचे वृत्त आणि लगेच त्याचा इन्कार असा घोळात घोळ बीसीसीआय घालत राहिले. हे अनाकलनीय होते. प्रसारमाध्यमे आणि बीसीसीआय यांच्यात कधीही समन्वय नसतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्याची प्रचीती पुन्हा आली. या एकूण प्रकरणात बीसीसीआय कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. कुंबळे आणि विराट यांच्यात मतभेद असल्याचे जाहीर झाल्यानंतरही बोर्ड त्याचा इन्कार करत राहिले आणि शेवटी एका मोठ्या खेळाडूला नाराज होऊन प्रशिक्षकपद सोडावे लागले.
कुंबळेची मुदत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर खरे तर संपणारच होती. पण त्यापूर्वीच नव्या भिडूसाठी तयारी करून बोर्डाने कुंबळेवर अविश्वास दाखविला. त्यामुळे आपोआप कुंबळेचा पुढील मार्ग बंद झाल्याचे स्पष्ट झाले. कुंबळे प्रशिक्षकपदी नको, अशी विराटची इच्छा असल्यास त्यात चूक नव्हते, पण कर्णधाराला कोणता प्रशिक्षक हवा हे जाणून घेण्यासाठी बीसीसीआयने जी धावपळ केली ती अनुचित होती. मुलाखती झाल्यावरही विराट परतल्यावर त्याच्याशी बोलून घोषणा करू अशी भूमिका सल्लागार समितीने घेतली. तिथेही पुन्हा विराटला जास्त महत्त्व दिल्याचे दिसून आले. क्रिकेटवरील बीसीसीआयची पकड ढिली झाल्याचे हे लक्षण आहे. सध्याचे सगळे पदाधिकारी हेच मुळी हंगामी आहेत. त्यात त्यांची क्रिकेटमधील प्रतिमाही तोळामासाच. जे होते आहे, त्याला सामोरे जाण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही, हे त्यांच्या एकूण वागणुकीतून दिसले. या घडामोडीत बीसीसीआयची प्रतिमा मलीन झाली. ही जपण्याचे मोठे आव्हान आगामी काळात असेल.
किंबहुना, शास्त्री यांचा खेळाडूंप्रती असलेला उदार दृष्टिकोन खेळाडूंना प्रिय होता. कदाचित, कुंबळेमध्ये हे गुण नसावेत आणि परिणामी, शास्त्रींना कर्णधार विराटसह अनेक खेळाडूंचे झुकते माप मिळाले असे म्हणता येईल. कुंबळेने राजीनामा दिल्यावर शास्त्री प्रशिक्षकपदी येणार अशी अटकळ बांधली जाऊ लागली. त्यासाठी मग बीसीसीआयने सगळा मंच तयार केला आणि अखेर शास्त्री यांच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ पडली. या सगळ्या घडामोडीत बीसीसीआयने घोळ का घातला हा प्रश्न आहे. प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले इथपर्यंत ठीक होते, पण शास्त्री यांनी अर्ज करताना ती मुदत वाढविण्यात आली. त्यावेळीच शास्त्री योग्य दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट होत होते. तरीही सल्लागार समितीकडून मुलाखतींचा फार्स, नव्या प्रशिक्षकासंदर्भात विराटशी चर्चा, प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करण्यात विलंब, नाव जाहीर झाल्याचे वृत्त आणि लगेच त्याचा इन्कार असा घोळात घोळ बीसीसीआय घालत राहिले. हे अनाकलनीय होते. प्रसारमाध्यमे आणि बीसीसीआय यांच्यात कधीही समन्वय नसतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्याची प्रचीती पुन्हा आली. या एकूण प्रकरणात बीसीसीआय कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. कुंबळे आणि विराट यांच्यात मतभेद असल्याचे जाहीर झाल्यानंतरही बोर्ड त्याचा इन्कार करत राहिले आणि शेवटी एका मोठ्या खेळाडूला नाराज होऊन प्रशिक्षकपद सोडावे लागले.
कुंबळेची मुदत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर खरे तर संपणारच होती. पण त्यापूर्वीच नव्या भिडूसाठी तयारी करून बोर्डाने कुंबळेवर अविश्वास दाखविला. त्यामुळे आपोआप कुंबळेचा पुढील मार्ग बंद झाल्याचे स्पष्ट झाले. कुंबळे प्रशिक्षकपदी नको, अशी विराटची इच्छा असल्यास त्यात चूक नव्हते, पण कर्णधाराला कोणता प्रशिक्षक हवा हे जाणून घेण्यासाठी बीसीसीआयने जी धावपळ केली ती अनुचित होती. मुलाखती झाल्यावरही विराट परतल्यावर त्याच्याशी बोलून घोषणा करू अशी भूमिका सल्लागार समितीने घेतली. तिथेही पुन्हा विराटला जास्त महत्त्व दिल्याचे दिसून आले. क्रिकेटवरील बीसीसीआयची पकड ढिली झाल्याचे हे लक्षण आहे. सध्याचे सगळे पदाधिकारी हेच मुळी हंगामी आहेत. त्यात त्यांची क्रिकेटमधील प्रतिमाही तोळामासाच. जे होते आहे, त्याला सामोरे जाण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही, हे त्यांच्या एकूण वागणुकीतून दिसले. या घडामोडीत बीसीसीआयची प्रतिमा मलीन झाली. ही जपण्याचे मोठे आव्हान आगामी काळात असेल.