गुरूवारी पहाटे भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळ केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे, वेळ आली तर भारत काय करू शकतो याची आवश्यक ती झलक पाकिस्तानला पुन्हा एकदा मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने सतत शांतताप्रिय देशाची भूमिका वठवली आहे आणि शांतातप्रिय म्हणजे कचखाऊ नव्हे, हे वेळ आली तेव्हा तेव्हा याआधीही सिद्ध केले आहे. दहा दिवसांपूर्वी झालेल्या उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले होते. ते तसे राहावेत अशी खुद्द पाकिस्तानची आणि पाकिस्तानला पाठीशी घालणाऱ्या देशांची इच्छा नेहमीच असते. भारत आणि पाक या दोन्ही देशांदरम्यान शाब्दिक आणि लष्करी चकमकीही सतत चालूच असतात. परंतु उरी येथे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि पाक लष्कराची त्याला झालेली मदत ही केवळ चकमक नव्हती, तर नियोजित असा छुपा हल्ला होता आणि त्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. तेव्हापासून भारताने पाकिस्तानच्याबाबतीत अधिक कठोर भूमिका घेतली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आर्थिक आणि राजनैतिक नाकाबंदी करण्याचे पध्दतशीर प्रयत्न सुरू केले होते. अशा पद्धतीने फास आवळणे ही हुषारीने केलेली राजकीय चाल होती, परंतु भारताच्या या प्रयत्नांना राजनैतिक पातळीवर उत्तर देण्याचे नाटक करत असतानाच पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतीही सुरू आहेत, हे भारताच्या कारवाईने सिध्द केले आहे. लष्कर आणि दहशतवादी यांच्यात संगनमत असणे हे अत्यंत धोक्याचे असते आणि पाकिस्तानबाबत तर लष्कर कोण, दहशतवादी कोण असा प्रश्न कायम पडत आलेला आहे. यापूर्वी पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने केलेल्या प्रत्येक हल्ल्याचे पुरावे भारत पाकिस्तानकडे देत आलेला आहे, त्यानुसार उरी हल्ल्यानंतरदेखील भारताने तसे पुरावे सादर केले. एवढेच नव्हे तर गुरूवारी भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर, या कारवाईची सविस्तर माहितीही भारताने पाकला दिली. ही कारवाई म्हणजे युध्द नव्हे आणि ती अकारण पुढे सुरू ठेवण्याचा भारताचा हेतूही नाही, मात्र सीमेपलिकडून आगळीक झाली तर भारत शांत राहणार नाही, असा इशाराही भारताने दिला आहे.
पाकिस्तानची कोंडी
आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशाशी संवाद साधताना अथवा सीमेवरील घुसखोरी निपटून काढताना जे संकेत पाळायचे असतात ते सर्व संकेत भारत कटाक्षाने पाळत आलेला आहे. परंतु उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्याविषयी भारतात जनमताचा प्रचंड रेटा आहे. असे असूनही भारताने संयम सोडला नाही, मात्र पाकिस्तान आपल्या कुरापतखोर वृत्तीला मुरड घालायला तयार नाही असे दिसते. शत्रुपक्ष सीमेपलीकडे हल्ल्याची तयारी करत असल्याची खबर मिळाली, तर तो हल्ला प्रत्यक्षात येण्याआधीच शत्रुला गाठून त्याचा बंदोबस्त करण्याला लष्करी भाषेत सर्वसामान्यपणे सर्जिकल स्ट्राइक म्हटले जाते. निश्चित असा आकडा जाहीर झालेला नसला, तरी भारताने केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले, पाकिस्तानचे सैनिकही मारले गेले आणि मुख्य म्हणजे शत्रुचे सात तळ उध्वस्त झाले, असे सांगितले गेले आहे. युध्द सुरू नसताना सीमा ओलांडून करण्यात आलेली भारतीय लष्कराची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. भारतीय सैनिक हेलिकॉप्टरद्वारा पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले आणि जवळपास २ किलोमीटर आत जाऊन त्यांनी ही कारवाई केली. चार तासांहून अधिक काळ चालेली ही कारवाई करण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसह माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही विश्वासात घेतले आणि देशावरील संकटाच्या वेळी सर्वपक्षीय एकीही अधोरिखित केली. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच कोंडी केली आहे. भारताने सार्क परिषदेवर बहिष्कार घातल्यावर, पाठोपाठ बांगलादेश आणि अफगाणिस्तानही भारताच्या बाजूने उभे राहिल्याने पाकची अब्रू गेली आहे. सर्वोच्च प्राधान्य देशाच्या यादीतून भारताने पाकिस्तानला वगळले, तर भारताचे थोडेफार आर्थिक नुकसान होईल, परंतु पाकला मोठा आर्थिक फटका बसेल, त्यामुळे भारताने या पर्यायावरही विचार सुरू केला आहे. सिंधू कराराचा पुनर्विचार करण्याचे भारताने सुतोवाच करताच पाकने आदळआपट सुरू केली आणि थेट आण्विक युध्दाची भाषा सुरू केली. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी अतिशय हुशारीने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणून पाकिस्तानवर चहुबाजूने दबाव येईल याची व्यवस्थाही केली होती.
पाणी पाजले
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानला ठणकावले आणि पाकला पाठीशी घालणाऱ्या चीनलाही इशारा दिला. अर्थात चीनला पाकिस्तानबद्दल प्रेम आहे, ते प्रस्तावित चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे. व्यापार उदिमासाठी चीनला हा मार्ग अत्यंत सोयीचा आणि करोडोंची बचत करून देणारा आहे. या पट्ट्यात सहा पदरी रस्ते आणि दळणवळणाची साधने उभारण्यावर चीनने एवढा खर्च केला आहे, की आंतराराष्ट्रीय पातळीवर गंमतीने पाकिस्तानचा ‘चीनचे पंचविसावे राज्य’ असा उल्लेख केला जातो. हे कारिडॉर पूर्ण होण्यासाठी पाकिस्तान तसेच चीनला जोडणारा मार्ग काराकोरम येथून जातो, हा परिसर पाकव्याप्त काश्मीरात येतो. त्यामुळे भारत-पाक संघर्ष सुरू राहण्यात आणि काश्मीरचा प्रश्न सतत चिघळत राहण्यात चीनला स्वारस्य आहे. त्यासाठी चीन पाकला मोठी आर्थिक तसेच लष्करी मदत उघड आणि छुप्या मार्गाने करत असतो. पाकिस्तानबाबत अमेरिकेनेही आजवर सतत दुट्प्पी भूमिका घेतलेली आहे. भारत आणि पाक यांना आपण समान वागणूक देतो असे भासवून प्रत्यक्षात पाकला लष्करी मदत देण्यात अमेरिका कायम पुढे राहिली आहे. परंतु गेल्या काही वर्षात दहशतवादाचा अमेरिकेलाही मोठा फटका बसला, तर वर्षभराच्या काळात युरोपातही इस्लामी दशहतवादाने थैमान घातले. हा दहशतवाद पाकिस्तानच्या भूमितच बहराला येतो, तिथेच त्याला रसद पुरवली जाते हे जगाने वारंवार अनुभवले. त्यामुळे युरोप व अमेरिकेन नागरिकांकडूनही तेथील सरकारांवर दबाव येऊ लागला आहे. परिणामी अलीकडेच अमेरिकेत काही लोकप्रतिनिधींनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषीत करण्याची मागणी करणारा खासगी ठरावही मांडण्याचा प्रयत्न केला होता. सिंधु कराराचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी रक्त आणि पाणी एकत्र जाऊ शकत नाही, असे अलीकडेच म्हटले होते. दहशतवाद्यांनी पाकच्या पाठिंब्याने भारतीय लष्कराचे रक्त सांडले होते आणि आता भारतीय लष्कराने पाकला त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेशात जाऊन पाणी पाजले आहे. आपल्या बहादुर लष्कराचे याबद्दल अभिनंदन केले पाहिजे.
पाकिस्तानची कोंडी
आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशाशी संवाद साधताना अथवा सीमेवरील घुसखोरी निपटून काढताना जे संकेत पाळायचे असतात ते सर्व संकेत भारत कटाक्षाने पाळत आलेला आहे. परंतु उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्याविषयी भारतात जनमताचा प्रचंड रेटा आहे. असे असूनही भारताने संयम सोडला नाही, मात्र पाकिस्तान आपल्या कुरापतखोर वृत्तीला मुरड घालायला तयार नाही असे दिसते. शत्रुपक्ष सीमेपलीकडे हल्ल्याची तयारी करत असल्याची खबर मिळाली, तर तो हल्ला प्रत्यक्षात येण्याआधीच शत्रुला गाठून त्याचा बंदोबस्त करण्याला लष्करी भाषेत सर्वसामान्यपणे सर्जिकल स्ट्राइक म्हटले जाते. निश्चित असा आकडा जाहीर झालेला नसला, तरी भारताने केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले, पाकिस्तानचे सैनिकही मारले गेले आणि मुख्य म्हणजे शत्रुचे सात तळ उध्वस्त झाले, असे सांगितले गेले आहे. युध्द सुरू नसताना सीमा ओलांडून करण्यात आलेली भारतीय लष्कराची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. भारतीय सैनिक हेलिकॉप्टरद्वारा पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले आणि जवळपास २ किलोमीटर आत जाऊन त्यांनी ही कारवाई केली. चार तासांहून अधिक काळ चालेली ही कारवाई करण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसह माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही विश्वासात घेतले आणि देशावरील संकटाच्या वेळी सर्वपक्षीय एकीही अधोरिखित केली. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच कोंडी केली आहे. भारताने सार्क परिषदेवर बहिष्कार घातल्यावर, पाठोपाठ बांगलादेश आणि अफगाणिस्तानही भारताच्या बाजूने उभे राहिल्याने पाकची अब्रू गेली आहे. सर्वोच्च प्राधान्य देशाच्या यादीतून भारताने पाकिस्तानला वगळले, तर भारताचे थोडेफार आर्थिक नुकसान होईल, परंतु पाकला मोठा आर्थिक फटका बसेल, त्यामुळे भारताने या पर्यायावरही विचार सुरू केला आहे. सिंधू कराराचा पुनर्विचार करण्याचे भारताने सुतोवाच करताच पाकने आदळआपट सुरू केली आणि थेट आण्विक युध्दाची भाषा सुरू केली. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी अतिशय हुशारीने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणून पाकिस्तानवर चहुबाजूने दबाव येईल याची व्यवस्थाही केली होती.
पाणी पाजले
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानला ठणकावले आणि पाकला पाठीशी घालणाऱ्या चीनलाही इशारा दिला. अर्थात चीनला पाकिस्तानबद्दल प्रेम आहे, ते प्रस्तावित चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे. व्यापार उदिमासाठी चीनला हा मार्ग अत्यंत सोयीचा आणि करोडोंची बचत करून देणारा आहे. या पट्ट्यात सहा पदरी रस्ते आणि दळणवळणाची साधने उभारण्यावर चीनने एवढा खर्च केला आहे, की आंतराराष्ट्रीय पातळीवर गंमतीने पाकिस्तानचा ‘चीनचे पंचविसावे राज्य’ असा उल्लेख केला जातो. हे कारिडॉर पूर्ण होण्यासाठी पाकिस्तान तसेच चीनला जोडणारा मार्ग काराकोरम येथून जातो, हा परिसर पाकव्याप्त काश्मीरात येतो. त्यामुळे भारत-पाक संघर्ष सुरू राहण्यात आणि काश्मीरचा प्रश्न सतत चिघळत राहण्यात चीनला स्वारस्य आहे. त्यासाठी चीन पाकला मोठी आर्थिक तसेच लष्करी मदत उघड आणि छुप्या मार्गाने करत असतो. पाकिस्तानबाबत अमेरिकेनेही आजवर सतत दुट्प्पी भूमिका घेतलेली आहे. भारत आणि पाक यांना आपण समान वागणूक देतो असे भासवून प्रत्यक्षात पाकला लष्करी मदत देण्यात अमेरिका कायम पुढे राहिली आहे. परंतु गेल्या काही वर्षात दहशतवादाचा अमेरिकेलाही मोठा फटका बसला, तर वर्षभराच्या काळात युरोपातही इस्लामी दशहतवादाने थैमान घातले. हा दहशतवाद पाकिस्तानच्या भूमितच बहराला येतो, तिथेच त्याला रसद पुरवली जाते हे जगाने वारंवार अनुभवले. त्यामुळे युरोप व अमेरिकेन नागरिकांकडूनही तेथील सरकारांवर दबाव येऊ लागला आहे. परिणामी अलीकडेच अमेरिकेत काही लोकप्रतिनिधींनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषीत करण्याची मागणी करणारा खासगी ठरावही मांडण्याचा प्रयत्न केला होता. सिंधु कराराचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी रक्त आणि पाणी एकत्र जाऊ शकत नाही, असे अलीकडेच म्हटले होते. दहशतवाद्यांनी पाकच्या पाठिंब्याने भारतीय लष्कराचे रक्त सांडले होते आणि आता भारतीय लष्कराने पाकला त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेशात जाऊन पाणी पाजले आहे. आपल्या बहादुर लष्कराचे याबद्दल अभिनंदन केले पाहिजे.