पंजाबमधील फगवाडा येथे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या '१०६व्या इंडियन सायन्स काँग्रेस'चा आढावा घेताना, देशातील वैज्ञानिक वातावरणाची चिंताजनक सद्य:स्थिती पुन्हा समोर आली आहे. विज्ञानाच्या नावाने छद्मविज्ञानाचा अजेंडा पुढे रेटण्याचा निंद्य प्रयत्न सुरूच असून त्यासाठी वारंवार वापरले जाणारे पुराणातील दाखले आताही वापरले गेले. यंदा पूर्वीपेक्षा अधिक प्रगती झाली म्हणायला हवी. कारण, रामायण, महाभारतातील काव्यात्म तपशील विज्ञान म्हणून मांडताना विज्ञानाचा पाया रचणारे आणि कळस ठरलेले सर आयझॅक न्यूटन आणि आल्बर्ट आईन्स्टाईन यांना चुकीचे ठरवण्यापर्यंत देशातील वैज्ञानिक पुढे गेले. असे जागतिक विज्ञान समुदायातील दिग्गज वैज्ञानिकांच्या उपस्थितीत जगापुढे देशाची मान शरमेने खाली घालणे कधीपर्यंत सुरू राहील, असा गंभीर प्रश्न पडला आहे.
गांधारीच्या शंभर पुत्रांचा जन्म टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाने झाला, रावणाकडे पुष्पक हे एकच नव्हे तर एकंदर चोवीस विमाने होती, श्रीलंकेत तेव्हा अनेक विमानतळ होते, सुदर्शन चक्र हे 'गायडेड मिझाईल' होते, विष्णूचे दहा अवतार म्हणजे चार्ल्स डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत आहे हे दावे यंदाही भारताच्या वतीने विविध अभ्यासकांनी मांडले. गेली अनेक वर्षे 'पॉप्युलर कल्चर'मध्ये प्रचलित असलेली ही गोष्ट आहे. नाक्या पारावर गप्पा मारताना वापरल्या जाणाऱ्या कविकल्पना वैज्ञानिक म्हणून मांडणे विविध मार्गाने आधीही सुरूच होते. मात्र त्याला अधिकृतपणा आणि सायन्स काँग्रेस सारखे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम हे सध्याचे भाजपप्रणित सरकार सत्तेवर आल्यापासून झाले. कौरवांच्या जन्मामागचे आधुनिक तंत्रज्ञान तीन हजार वर्षांपूर्वी होते, याची मांडणी करणारे आणि रावणाकडे चोवीस विमाने होती हे सांगणारे आंध्र प्रदेशातील विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तसेच, न्यूटन, आईन्स्टाईन यांचे सिद्धांत चुकीचे ठरवणारे तामिळनाडू येथील एक वरिष्ठ विज्ञान संशोधक कानन कृष्णन हे आहेत. त्यांनी दावा केला की त्यांचा सिद्धांत सिद्ध झाल्यास भौतिकशास्त्राबद्दल आता असलेली समज बदलून जाईल. सर आयझॅक न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या प्रतिकूल बलाची कोणतीही समज नव्हती, त्यामुळे त्यांना गुरुत्वाकर्षणाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत, असेही ते म्हणाले.
इतकेच नाही तर आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपला सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडून जगाची दिशाभूल केली, असाही दावा त्यांनी केला. हे लोक वैज्ञानिक नसून चमचेगिरी करून आपली पोळी भाजणारे आहेत, असेच यावरून वाटते. कारण, त्यांनी पुढे असे सांगितले की एकदा का त्यांचा सिद्धांत स्वीकारला गेला तर गुरुत्व लहरींना 'मोदी लहरी' म्हणून ओळखल्या जाईल आणि गुरुत्व भिंग परिणाम 'हर्षवर्धन परिणाम' म्हणून नावाजेल. हे खुशमस्करे अशी विधाने करू धजतात ते कशामुळे? सध्याच्या सरकारच्या मागे असलेल्या परिवारांना या कथा जनमानसात पसरायला हव्या आहेत. भारत महान होता आणि सर्वांत पुढे होता आणि आहे, ही भावना निर्माण करण्यासाठी पुराणातील कथांना विज्ञानाचे पॅकिंग करणारी मंडळी हवीच आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रेरणेनेच या लोकांना व्यासपीठ मिळत असल्याने ते अडाणीपणाने बडबडणारच आहेत. मात्र वैज्ञानिक आणि सुज्ञ नागरिकांनी त्याबद्दल बोलले पाहिजे. वैज्ञानिकांनी उघडपणे याबाबतीत भूमिका घेणे आवश्यक आहे. ते गप्प बसले तर अशा विदूषकी लोकांचे फावते. सध्याच्या सत्तेचा कैफ असा आहे की आपण काहीही केले तरी आपल्याला कोण विचारणार? प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात, समुदायांत अशी एक वेळ येते की त्यांना बाजूला उभे राहून जे होत आहे ते मुकाटपणे पाहात राहण्याचा पर्याय परवडत नाही. त्यांना भूमिका घ्यावी लागते. ती वेळ आज वैज्ञानिकांच्या पुढे आलेली आहे. त्यांना प्रयोगशाळेतून बाहेर यावे लागेल आणि सुक्ष्मदर्शकात घातलेला डोळा बाजूला करून छद्मवैज्ञानिकांना जरब बसवावी लागेल. सुज्ञ नागरिकांचीही जबाबदारी कमी होत नाही. घटनेत सांगण्यात आलेल्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचेही कर्तव्य अंतर्भूत आहे. दुर्दैवाने सुशिक्षित वर्गच अशा प्रकारच्या कपोलकल्पित कथांना खतपाणी घालत त्याचा समाजमाध्यमांतून सर्वाधिक प्रसार करताना दिसतो. इलियटने म्हटले होते, की 'शहाणपण कुठे गेले, तर ते ज्ञानात हरवले; आणि ज्ञान कुठे गेले तर ते माहितीत हरवले.' त्या धर्तीवर आता सुज्ञ नागरिकांची मती कुठे गेली तर ती व्हॉट्सअपमध्ये हरवली, असेच खेदाने म्हणावे लागते. विज्ञान हीच खरी दृष्टी आहे, हे विसरणे परवडणारे नाही.
गांधारीच्या शंभर पुत्रांचा जन्म टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाने झाला, रावणाकडे पुष्पक हे एकच नव्हे तर एकंदर चोवीस विमाने होती, श्रीलंकेत तेव्हा अनेक विमानतळ होते, सुदर्शन चक्र हे 'गायडेड मिझाईल' होते, विष्णूचे दहा अवतार म्हणजे चार्ल्स डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत आहे हे दावे यंदाही भारताच्या वतीने विविध अभ्यासकांनी मांडले. गेली अनेक वर्षे 'पॉप्युलर कल्चर'मध्ये प्रचलित असलेली ही गोष्ट आहे. नाक्या पारावर गप्पा मारताना वापरल्या जाणाऱ्या कविकल्पना वैज्ञानिक म्हणून मांडणे विविध मार्गाने आधीही सुरूच होते. मात्र त्याला अधिकृतपणा आणि सायन्स काँग्रेस सारखे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम हे सध्याचे भाजपप्रणित सरकार सत्तेवर आल्यापासून झाले. कौरवांच्या जन्मामागचे आधुनिक तंत्रज्ञान तीन हजार वर्षांपूर्वी होते, याची मांडणी करणारे आणि रावणाकडे चोवीस विमाने होती हे सांगणारे आंध्र प्रदेशातील विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तसेच, न्यूटन, आईन्स्टाईन यांचे सिद्धांत चुकीचे ठरवणारे तामिळनाडू येथील एक वरिष्ठ विज्ञान संशोधक कानन कृष्णन हे आहेत. त्यांनी दावा केला की त्यांचा सिद्धांत सिद्ध झाल्यास भौतिकशास्त्राबद्दल आता असलेली समज बदलून जाईल. सर आयझॅक न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या प्रतिकूल बलाची कोणतीही समज नव्हती, त्यामुळे त्यांना गुरुत्वाकर्षणाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत, असेही ते म्हणाले.
इतकेच नाही तर आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपला सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडून जगाची दिशाभूल केली, असाही दावा त्यांनी केला. हे लोक वैज्ञानिक नसून चमचेगिरी करून आपली पोळी भाजणारे आहेत, असेच यावरून वाटते. कारण, त्यांनी पुढे असे सांगितले की एकदा का त्यांचा सिद्धांत स्वीकारला गेला तर गुरुत्व लहरींना 'मोदी लहरी' म्हणून ओळखल्या जाईल आणि गुरुत्व भिंग परिणाम 'हर्षवर्धन परिणाम' म्हणून नावाजेल. हे खुशमस्करे अशी विधाने करू धजतात ते कशामुळे? सध्याच्या सरकारच्या मागे असलेल्या परिवारांना या कथा जनमानसात पसरायला हव्या आहेत. भारत महान होता आणि सर्वांत पुढे होता आणि आहे, ही भावना निर्माण करण्यासाठी पुराणातील कथांना विज्ञानाचे पॅकिंग करणारी मंडळी हवीच आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रेरणेनेच या लोकांना व्यासपीठ मिळत असल्याने ते अडाणीपणाने बडबडणारच आहेत. मात्र वैज्ञानिक आणि सुज्ञ नागरिकांनी त्याबद्दल बोलले पाहिजे. वैज्ञानिकांनी उघडपणे याबाबतीत भूमिका घेणे आवश्यक आहे. ते गप्प बसले तर अशा विदूषकी लोकांचे फावते. सध्याच्या सत्तेचा कैफ असा आहे की आपण काहीही केले तरी आपल्याला कोण विचारणार? प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात, समुदायांत अशी एक वेळ येते की त्यांना बाजूला उभे राहून जे होत आहे ते मुकाटपणे पाहात राहण्याचा पर्याय परवडत नाही. त्यांना भूमिका घ्यावी लागते. ती वेळ आज वैज्ञानिकांच्या पुढे आलेली आहे. त्यांना प्रयोगशाळेतून बाहेर यावे लागेल आणि सुक्ष्मदर्शकात घातलेला डोळा बाजूला करून छद्मवैज्ञानिकांना जरब बसवावी लागेल. सुज्ञ नागरिकांचीही जबाबदारी कमी होत नाही. घटनेत सांगण्यात आलेल्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचेही कर्तव्य अंतर्भूत आहे. दुर्दैवाने सुशिक्षित वर्गच अशा प्रकारच्या कपोलकल्पित कथांना खतपाणी घालत त्याचा समाजमाध्यमांतून सर्वाधिक प्रसार करताना दिसतो. इलियटने म्हटले होते, की 'शहाणपण कुठे गेले, तर ते ज्ञानात हरवले; आणि ज्ञान कुठे गेले तर ते माहितीत हरवले.' त्या धर्तीवर आता सुज्ञ नागरिकांची मती कुठे गेली तर ती व्हॉट्सअपमध्ये हरवली, असेच खेदाने म्हणावे लागते. विज्ञान हीच खरी दृष्टी आहे, हे विसरणे परवडणारे नाही.