वैभव वझे
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात विविध स्वभावाची माणसं येतात. कधी आपण त्यांच्या संपर्कात येतो, तर कधी ती आपल्याशी संपर्क साधतात. अशा माणसांमुळे आपलं भावविश्व विस्तारतं. यातलीच काही माणसं आपली अत्यंत जवळची होतात. काहींना आपण विसरण्याचा प्रयत्न करतो, तर काही कायमची लक्षात राहतात. अशा लक्षात राहिलेल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रं आपल्याला ‘ऋणानुबंध’ या पुस्तकात वाचण्यास मिळतात.
रमेश उदारे यांनी, त्यांना भेटलेल्या, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पाडलेल्या आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तींचा समावेश या पुस्तकात केला आहे. पुस्तकाची सुरुवात उदारे यांच्या मातोश्री इंदिरा उदारे यांच्या व्यक्तिचित्राने होते. त्यानंतर आशा दीक्षित, सुखदा कोर्डे, उमा आवटेपुजारी, ज्योती निसळ, भारती मोरे अशा एकूण २१ महिलांची व्यक्तिचित्रं रमेश उदारे यांनी रंगवली आहेत. या सर्व व्यक्ती खऱ्या आहेत. कदाचित यातली एकही व्यक्ती आपल्या परिचयाची नसली तरीही ओघवत्या भाषेत ही व्यक्तिचित्रं आल्याने ती वाचनीय झाली आहेत. प्रत्येक व्यक्तीचे फोटो मात्र तितकेसे स्पष्ट छापले गेलेले नाहीत. हे फोटो स्पष्ट छापले गेले असते तर प्रत्येक व्यक्ती अधिक स्पष्ट झाली असती.
उदारे यांनी मांडलेल्या सर्व व्यक्तिरेखा महिलांच्या आहेत. यामागची कल्पना त्यांना एका रिक्षाच्या मागे लिहिलेल्या मजकुरावरून सुचल्याचं ते सांगतात. ‘तुम्हाला आई पाहिजे जन्म देण्यासाठी, बहीण पाहिजे राखी बांधण्यासाठी, मैत्रीण पाहिजे फिरवण्यासाठी, पत्नी पाहिजे लग्न करण्यासाठी... मग तुम्हाला मुलगी का नको?’ असा तो मजकूर पाहून उदारे यांना त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पाडणाऱ्या महिलांचा मागोवा घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला आहे.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात विविध स्वभावाची माणसं येतात. कधी आपण त्यांच्या संपर्कात येतो, तर कधी ती आपल्याशी संपर्क साधतात. अशा माणसांमुळे आपलं भावविश्व विस्तारतं. यातलीच काही माणसं आपली अत्यंत जवळची होतात. काहींना आपण विसरण्याचा प्रयत्न करतो, तर काही कायमची लक्षात राहतात. अशा लक्षात राहिलेल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रं आपल्याला ‘ऋणानुबंध’ या पुस्तकात वाचण्यास मिळतात.
रमेश उदारे यांनी, त्यांना भेटलेल्या, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पाडलेल्या आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तींचा समावेश या पुस्तकात केला आहे. पुस्तकाची सुरुवात उदारे यांच्या मातोश्री इंदिरा उदारे यांच्या व्यक्तिचित्राने होते. त्यानंतर आशा दीक्षित, सुखदा कोर्डे, उमा आवटेपुजारी, ज्योती निसळ, भारती मोरे अशा एकूण २१ महिलांची व्यक्तिचित्रं रमेश उदारे यांनी रंगवली आहेत. या सर्व व्यक्ती खऱ्या आहेत. कदाचित यातली एकही व्यक्ती आपल्या परिचयाची नसली तरीही ओघवत्या भाषेत ही व्यक्तिचित्रं आल्याने ती वाचनीय झाली आहेत. प्रत्येक व्यक्तीचे फोटो मात्र तितकेसे स्पष्ट छापले गेलेले नाहीत. हे फोटो स्पष्ट छापले गेले असते तर प्रत्येक व्यक्ती अधिक स्पष्ट झाली असती.
उदारे यांनी मांडलेल्या सर्व व्यक्तिरेखा महिलांच्या आहेत. यामागची कल्पना त्यांना एका रिक्षाच्या मागे लिहिलेल्या मजकुरावरून सुचल्याचं ते सांगतात. ‘तुम्हाला आई पाहिजे जन्म देण्यासाठी, बहीण पाहिजे राखी बांधण्यासाठी, मैत्रीण पाहिजे फिरवण्यासाठी, पत्नी पाहिजे लग्न करण्यासाठी... मग तुम्हाला मुलगी का नको?’ असा तो मजकूर पाहून उदारे यांना त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पाडणाऱ्या महिलांचा मागोवा घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला आहे.