महा अनुभव
इतर दिवाळी अंकांत आपले वेगळेपण राखण्याचा 'महा अनुभव'चा नेहमी प्रयत्न असतो; तसा त्यांनी तो यंदाही केला आहे. कथा, लेख, माणसे आणि अनुभव असे चार विभाग यंदाच्या दिवाळी अंकात असून प्रत्येक विभागात लेखनवैविध्याचा पुरेपूर अनुभव येतो. पहिल्याच 'लेख' विभागात राजेश्वरी देशपांडे, अनिल परांजपे, डॉ. शंतनु अभ्यंकर, गौरी कानेटकर आणि मुकेश माचकर यांचे सद्य स्थितीचे वेगवेगळे पैलू अधोरेखित करणारे लेख आहेत. तर 'माणसं' विभागात सुहास कुलकर्णी, नितीन दादरावाला आणि निरंजन घाटे यांनी अनुक्रमे अनिल अवचट, बार्बरा डेव्हिडसन, आयझॅक असिमोव्ह यांच्यावर लिहिले आहे. ही तीनही व्यक्तिचित्रे त्यांच्या व्यक्तिमत्त्वासकट लेखांत उतरली आहेत. 'अनुभव' हा विभागही वाचनीय आहे. या विभागात ना. धों. महानोर, अनिल खेरे आणि रवींद्र कुलकर्णी यांनी मांडलेले अनुभव खरोखरच स्तिमित करणारे आहेत. महानोरांनी सांगितलेला म्हादेवाचा अनुभव अंगावर येणारा आहे. याशिवाय प्रदीप चंपानेरकर, प्रवीण दशरथ बांदेकर आणि मेघश्री दळवी यांच्या कथाही या अंकात आहेत आणि या तीनही कथा जीवनाचा व्यामिश्र अनुभव देणाऱ्या आहेत.
संपादक : सुहास कुलकर्णी
पाने : १७८
किंमत : १८० रु.
वसा
दर्जेदार मजकुरामुळे 'वसा' दिवाळी अंक अल्पावधीतच जाणत्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाला. 'वसा'चा यंदाचा अंकही विषय वैविध्य आणि उत्तम मजकुरामुळे वाचकांच्या अपेक्षेला उतरणारा आहे. सूरज कोल्हापुरे यांची पहिली दीर्घकथा पकड घेते. त्यानंतरच्या कथा विभागात जयंत पवार, मीनाक्षी पाटील, विवेक कुडू, विजय तांबे यांच्या स्वतंत्र आणि शैलेश जोशी यांची अनुवादित कथा आहे. या सगळ्याच कथा लक्षणीय ठरतील अशा आहेत. विशेषतः जयंत पवार यांनी मृत्यूच्या भोवती गुंफलेल्या छोट्या-छोट्या कथा मृत्यूचं वेगळंच भान देणाऱ्या आहेत. 'राजकारणापल्याडचा चीन' असा वेगळा विभागही या अंकात आहे. या विभागात टेकचंद सोनावणे, हृषिकेश पाळंदे आणि भावेश ब्राह्मणकर यांनी चीनच्या आगळ्यावेगळ्या पैलूंचं दर्शन घडवलं आहे. तर प्रसाद कुमठेकर आणि सई पवार यांनी करोनाच्या निमित्ताने वेगळ्या प्रश्नांकडे वाचकांचं लक्ष वेधलं आहे. सई पवार यांनी 'भटक्या वाटांवरचा करोना लॉकडाउन' या लेखात धनगर या भटक्या समूहावर लॉकडाउन काळात काय परिणाम झाला, त्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. तर प्रसाद कुमठेकर यांनी मध्यमवर्गीय 'मी'च्या नजरेतून लॉकडाउन काळातील आत्मचिंतन केलं आहे. डॉ. भारत पाटणकर यांनी आपली पत्नी गेल ऑम्वेटचं चितारलेलं 'माझी सखी' हे शब्दचित्रं खास उतरलं आहे. याशिवाय सुरेश सावंत, श्यामल गरुड, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. रूपाली शिवलकर, उदय कुलकर्णी आणि राजन गवस यांचे लेखही विविध सामाजिक-सांस्कृतिक घटनांचा मागोवा घेणारे आहेत.
संपादक : संध्या नरे-पवार
पाने : २००
किंमत : ३०० रु.
इतर दिवाळी अंकांत आपले वेगळेपण राखण्याचा 'महा अनुभव'चा नेहमी प्रयत्न असतो; तसा त्यांनी तो यंदाही केला आहे. कथा, लेख, माणसे आणि अनुभव असे चार विभाग यंदाच्या दिवाळी अंकात असून प्रत्येक विभागात लेखनवैविध्याचा पुरेपूर अनुभव येतो. पहिल्याच 'लेख' विभागात राजेश्वरी देशपांडे, अनिल परांजपे, डॉ. शंतनु अभ्यंकर, गौरी कानेटकर आणि मुकेश माचकर यांचे सद्य स्थितीचे वेगवेगळे पैलू अधोरेखित करणारे लेख आहेत. तर 'माणसं' विभागात सुहास कुलकर्णी, नितीन दादरावाला आणि निरंजन घाटे यांनी अनुक्रमे अनिल अवचट, बार्बरा डेव्हिडसन, आयझॅक असिमोव्ह यांच्यावर लिहिले आहे. ही तीनही व्यक्तिचित्रे त्यांच्या व्यक्तिमत्त्वासकट लेखांत उतरली आहेत. 'अनुभव' हा विभागही वाचनीय आहे. या विभागात ना. धों. महानोर, अनिल खेरे आणि रवींद्र कुलकर्णी यांनी मांडलेले अनुभव खरोखरच स्तिमित करणारे आहेत. महानोरांनी सांगितलेला म्हादेवाचा अनुभव अंगावर येणारा आहे. याशिवाय प्रदीप चंपानेरकर, प्रवीण दशरथ बांदेकर आणि मेघश्री दळवी यांच्या कथाही या अंकात आहेत आणि या तीनही कथा जीवनाचा व्यामिश्र अनुभव देणाऱ्या आहेत.
संपादक : सुहास कुलकर्णी
पाने : १७८
किंमत : १८० रु.
वसा
दर्जेदार मजकुरामुळे 'वसा' दिवाळी अंक अल्पावधीतच जाणत्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाला. 'वसा'चा यंदाचा अंकही विषय वैविध्य आणि उत्तम मजकुरामुळे वाचकांच्या अपेक्षेला उतरणारा आहे. सूरज कोल्हापुरे यांची पहिली दीर्घकथा पकड घेते. त्यानंतरच्या कथा विभागात जयंत पवार, मीनाक्षी पाटील, विवेक कुडू, विजय तांबे यांच्या स्वतंत्र आणि शैलेश जोशी यांची अनुवादित कथा आहे. या सगळ्याच कथा लक्षणीय ठरतील अशा आहेत. विशेषतः जयंत पवार यांनी मृत्यूच्या भोवती गुंफलेल्या छोट्या-छोट्या कथा मृत्यूचं वेगळंच भान देणाऱ्या आहेत. 'राजकारणापल्याडचा चीन' असा वेगळा विभागही या अंकात आहे. या विभागात टेकचंद सोनावणे, हृषिकेश पाळंदे आणि भावेश ब्राह्मणकर यांनी चीनच्या आगळ्यावेगळ्या पैलूंचं दर्शन घडवलं आहे. तर प्रसाद कुमठेकर आणि सई पवार यांनी करोनाच्या निमित्ताने वेगळ्या प्रश्नांकडे वाचकांचं लक्ष वेधलं आहे. सई पवार यांनी 'भटक्या वाटांवरचा करोना लॉकडाउन' या लेखात धनगर या भटक्या समूहावर लॉकडाउन काळात काय परिणाम झाला, त्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. तर प्रसाद कुमठेकर यांनी मध्यमवर्गीय 'मी'च्या नजरेतून लॉकडाउन काळातील आत्मचिंतन केलं आहे. डॉ. भारत पाटणकर यांनी आपली पत्नी गेल ऑम्वेटचं चितारलेलं 'माझी सखी' हे शब्दचित्रं खास उतरलं आहे. याशिवाय सुरेश सावंत, श्यामल गरुड, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. रूपाली शिवलकर, उदय कुलकर्णी आणि राजन गवस यांचे लेखही विविध सामाजिक-सांस्कृतिक घटनांचा मागोवा घेणारे आहेत.
संपादक : संध्या नरे-पवार
पाने : २००
किंमत : ३०० रु.