पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना राजकारणाचे आकर्षण नवे नाही. वर्दीला प्रतिष्ठा असली तरीही शेवटी राजकीय नेत्यांचेच आदेश पाळावे लागत असल्याचा अनुभव घेतल्यामुळेच कदाचित महत्त्वाकांक्षी अधिकारी राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश करीत असावेत. राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातही अशी अनेक उदाहरणे आहेत आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त अरूप पटनायक हे त्याच पंगतीत जाऊन बसले आहेत.
१९७९ साली नाशिक येथून पोलिस कारकीर्दीचा प्रारंभ करणाऱ्या पटनायक यांनी लातूर, जळगाव, नागपूर अशा अनेक ठिकाणी सेवा बजावली. मुंबई पोलिस दलात उपायुक्तांपासून ते आयुक्तपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम पाहिले. मुंबईच्या जनजीवनावर परिणाम करणारी अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळली. त्यात मुंबईतील १९९३च्या साखळी बॉबस्फोटांबरोबरच दंगलींचाही समावेश आहे. २०११ मध्ये आझाद मैदानावर झालेल्या हिंसाचारावेळी पटनायक मुंबईचे पोलिस आयुक्त होते. त्यावेळी पोलिसांवर हल्ले झाले. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवरही त्यांचा परिणाम झाला. त्या प्रकरणी पटनायक यांना बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. तिथून त्यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकपदी हलवण्यात आले. त्यांच्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी आलेल्या सत्यपाल सिंग यांनी राजीनामा देऊन राजकारणात उडी घेतली आणि ते केंद्रात मंत्रीही बनले. त्याअर्थाने पटनायक यांनी राजकारण प्रवेशाला उशीर केला असे म्हणावे लागेल.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला असून आता ते ओडिशामधून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसतात. पटनायक यांचे मूळ गाव पुरी लोकसभा मतदार संघात आहे. त्यामुळे ते पुरी किंवा भुवनेश्वरमधून बिजू जनता दलाचे उमेदवार बनू शकतात. यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरत असताना महाराष्ट्र आणि मुंबईत सेवा बजावलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या लढतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे ओडिशाकडेही लक्ष असणे साहजिक आहे.
१९७९ साली नाशिक येथून पोलिस कारकीर्दीचा प्रारंभ करणाऱ्या पटनायक यांनी लातूर, जळगाव, नागपूर अशा अनेक ठिकाणी सेवा बजावली. मुंबई पोलिस दलात उपायुक्तांपासून ते आयुक्तपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम पाहिले. मुंबईच्या जनजीवनावर परिणाम करणारी अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळली. त्यात मुंबईतील १९९३च्या साखळी बॉबस्फोटांबरोबरच दंगलींचाही समावेश आहे. २०११ मध्ये आझाद मैदानावर झालेल्या हिंसाचारावेळी पटनायक मुंबईचे पोलिस आयुक्त होते. त्यावेळी पोलिसांवर हल्ले झाले. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवरही त्यांचा परिणाम झाला. त्या प्रकरणी पटनायक यांना बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. तिथून त्यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकपदी हलवण्यात आले. त्यांच्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी आलेल्या सत्यपाल सिंग यांनी राजीनामा देऊन राजकारणात उडी घेतली आणि ते केंद्रात मंत्रीही बनले. त्याअर्थाने पटनायक यांनी राजकारण प्रवेशाला उशीर केला असे म्हणावे लागेल.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला असून आता ते ओडिशामधून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसतात. पटनायक यांचे मूळ गाव पुरी लोकसभा मतदार संघात आहे. त्यामुळे ते पुरी किंवा भुवनेश्वरमधून बिजू जनता दलाचे उमेदवार बनू शकतात. यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरत असताना महाराष्ट्र आणि मुंबईत सेवा बजावलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या लढतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे ओडिशाकडेही लक्ष असणे साहजिक आहे.