हिमा दास हे नाव आता भारतीय क्रीडारसिकांना परिचयाचे झाले आहे. गेल्या महिन्यात फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपद पटकावले. हीच लय कायम ठेवत तिने जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. अॅथलेटिक्समध्ये मिल्खा सिंग, पी. टी उषा अशी मोजकीच नावे वगळता इतर धावपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पी. टी. उषाची खरी वारसदार होण्याची आपल्यात क्षमता असल्याचे हिमाने दाखवून दिले आहे. आसामच्या नागाव जिल्ह्यातील धींग या लहानशा गावातील एका शेतकरी कुटुंबात हिमाचा जन्म झाला. हिमाला फुटबॉलपटू व्हायचे होते. परंतु, भारतात महिला फुटबॉलची स्थिती चांलगी नसल्याचे लक्षात आल्यानंतर ती अॅथलेटिक्सकडे वळली. छोट्या व मध्यम पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांपासून तिने कारकिर्दीला सुरुवात केली. प्रशिक्षक निपॉन दास यांच्या मार्गदर्शनाखाली तिने धावण्याच्या सरावाला सुरुवात केली. वडिलांची दोन एकर शेती व पाच भावंडे, अशा विपरीत परिस्थितीमुळे स्पाइक्सचे जोडे घेण्याचीही हिमाची ऐपत नव्हती. पहिल्याच आंतरजिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. हिमाची ही कामगिरी तिचे प्रशिक्षक निपॉन दास यांच्यासाठीसुद्धा अनपेक्षित होती. मात्र, या कामगिरीने दास यांचाही उत्साह वाढवला. पुढील प्रशिक्षणासाठी हिमाने गुवाहाटी येथे गेले पाहिजे, असा सल्ला दास यांनीच तिला दिला. हिमाच्या कुटुंबीयांचा तिला गुवाहाटीला पाठविण्याला विरोध होता. मात्र, या विरोधाला न जुमानता तिने गुवाहाटी येथील सारुसजाई स्पोर्टस् कॉम्पलेक्स राज्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला. हाच निर्णय तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. फिनलंडमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची दौड सुरू झाली त्यावेळी हिमा माघारली होती. मात्र, ज्या गतीने तिने इतर खेळाडूंना मागे टाकेल ते पाहून अनेक तज्ज्ञांना धक्का बसला. दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी जगभरातील खेळाडू तयारीला लागले असताना आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्सच्या क्षितिजावरील हिमाचा उदय भारतासाठी शुभसंकेत आहे.
हिमा दास
हिमा दास हे नाव आता भारतीय क्रीडारसिकांना परिचयाचे झाले आहे. गेल्या महिन्यात फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपद पटकावले. हीच लय कायम ठेवत तिने जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. अॅथलेटिक्समध्ये मिल्खा सिंग, पी. टी उषा अशी मोजकीच नावे वगळता इतर धावपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Aug 2018, 12:58 am