भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह दुखापतींमुळे इंग्लंड दौऱ्यात खेळू शकत नसताना भारताच्या अपेक्षा प्रामुख्याने होत्या त्या उमेश यादवकडून. इशांत शर्मासारखा अनुभवी खेळाडू सोबत असला तरी तो प्रभावी ठरेल की नाही, याची होती; ती त्याला बचावात्मक गोलंदाज समजत असल्यामुळे. मात्र इशांतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गोलंदाजीची छाप पाडली. एकीकडे आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून सात विकेटस मिळविल्या, पण त्याच खेळपट्टीवर इशांतने आपली कामगिरीही उंचावत दोन्ही डावात मिळून सहा विकेटस घेतल्या. विशेषतः इंग्लंडच्या दुसऱ्या डावात त्याने अर्धा संघ गारद करून यजमानांना १८० धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २००५मध्ये इंग्लंडच्या अॅन्ड्र्यू फ्लिन्टॉफने केलेल्या गोलंदाजीशी इशांतच्या या कामगिरीची तुलना केली गेली. पहिल्या डावात ओव्हर द विकेट गोलंदाजी करणाऱ्या इशांतने इंग्लंडच्या डावखुऱ्या फलंदाजांची अधिक संख्या लक्षात घेऊन दुसऱ्या डावात राऊंड द विकेट गोलंदाजी केली आणि त्याच्या स्विंगना अपेक्षित यश मिळाले. एवढेच नव्हे तर त्याने घेतलेल्या ५१ धावांतील ५ बळींमुळे भारताला विजयाची चाहूल लागली. अर्थात, नंतर भारताला निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही. सामना गमवावा लागला. तरीही इशांतला मिळालेला आत्मविश्वास मोठा आहे. इंग्लंडविरुद्धच्या पुढील उर्वरित चार कसोटी सामन्यांत भारताला इशांतचा हा आत्मविश्वास लाभदायक ठरेल. यंदा हा इंग्लंड दौरा लक्षात घेऊन भारताचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यास गेले. त्यात इशांतही होता. ‘ससेक्स’कडून खेळल्याचा खूप फायदा झाल्याचे तो सांगतो. त्यात तथ्य आहे. इशांतवर नेहमीच एक बचावात्मक गोलंदाज म्हणून शिक्का मारला गेला आहे. पण या सामन्यातून त्याने आपण आक्रमक गोलंदाजही आहोत, हे दाखवून दिले!
आक्रमक इशांत शर्मा
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह दुखापतींमुळे इंग्लंड दौऱ्यात खेळू शकत नसताना भारताच्या अपेक्षा प्रामुख्याने होत्या त्या उमेश यादवकडून. इशांत शर्मासारखा अनुभवी खेळाडू सोबत असला तरी तो प्रभावी ठरेल की नाही, याची होती; ती त्याला बचावात्मक गोलंदाज समजत असल्यामुळे. मात्र इशांतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गोलंदाजीची छाप पाडली. एकीकडे आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून सात विकेटस मिळविल्या, पण त्याच खेळपट्टीवर इशांतने आपली कामगिरीही उंचावत दोन्ही डावात मिळून सहा विकेटस घेतल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2018, 11:32 am
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह दुखापतींमुळे इंग्लंड दौऱ्यात खेळू शकत नसताना भारताच्या अपेक्षा प्रामुख्याने होत्या त्या उमेश यादवकडून. इशांत शर्मासारखा अनुभवी खेळाडू सोबत असला तरी तो प्रभावी ठरेल की नाही, याची होती; ती त्याला बचावात्मक गोलंदाज समजत असल्यामुळे. मात्र इशांतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गोलंदाजीची छाप पाडली. एकीकडे आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून सात विकेटस मिळविल्या, पण त्याच खेळपट्टीवर इशांतने आपली कामगिरीही उंचावत दोन्ही डावात मिळून सहा विकेटस घेतल्या. विशेषतः इंग्लंडच्या दुसऱ्या डावात त्याने अर्धा संघ गारद करून यजमानांना १८० धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २००५मध्ये इंग्लंडच्या अॅन्ड्र्यू फ्लिन्टॉफने केलेल्या गोलंदाजीशी इशांतच्या या कामगिरीची तुलना केली गेली. पहिल्या डावात ओव्हर द विकेट गोलंदाजी करणाऱ्या इशांतने इंग्लंडच्या डावखुऱ्या फलंदाजांची अधिक संख्या लक्षात घेऊन दुसऱ्या डावात राऊंड द विकेट गोलंदाजी केली आणि त्याच्या स्विंगना अपेक्षित यश मिळाले. एवढेच नव्हे तर त्याने घेतलेल्या ५१ धावांतील ५ बळींमुळे भारताला विजयाची चाहूल लागली. अर्थात, नंतर भारताला निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही. सामना गमवावा लागला. तरीही इशांतला मिळालेला आत्मविश्वास मोठा आहे. इंग्लंडविरुद्धच्या पुढील उर्वरित चार कसोटी सामन्यांत भारताला इशांतचा हा आत्मविश्वास लाभदायक ठरेल. यंदा हा इंग्लंड दौरा लक्षात घेऊन भारताचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यास गेले. त्यात इशांतही होता. ‘ससेक्स’कडून खेळल्याचा खूप फायदा झाल्याचे तो सांगतो. त्यात तथ्य आहे. इशांतवर नेहमीच एक बचावात्मक गोलंदाज म्हणून शिक्का मारला गेला आहे. पण या सामन्यातून त्याने आपण आक्रमक गोलंदाजही आहोत, हे दाखवून दिले!