मेलबर्नमध्ये ऐतिहासिक विजय मिळालेल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचे पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात तीन फलंदाज तंबूत धाडून इतिहास घडवला. स्वाभाविकच तो ‘सामनावीर’ही ठरला. कांगारूंच्या फलंदाजीला ‘गुमराह’ करणाऱ्या बुमराहची ‘बोलंदाजी’पेक्षा गोलंदाजी अधिक बोलकी आहे. साबरमती नदीकाठच्या अहमदाबादेत जन्मलेला जसप्रीत जसबीरसिंह बुमराह अबोल आहे. बालपणापासूनच त्याचे आयुष्य चढ-उतारांचे राहिले. नकळत्या वयात वडिलांचे छत्र हरपले. तेव्हा तो फक्त सात वर्षांचा होता.
आई प्राथमिक शिक्षिका. आईच्याच मार्गदर्शनाखाली जसप्रीतची जडणघडण झाली. जसप्रीत घराच्याच भिंतीवर गोलंदाजीचा सराव करायचा. भिंतीवर सतत आदळणाऱ्या चेंडूमुळे आई एकदा संतापली. म्हणाली, “आवाज कमी कर, नाहीतर तुझा खेळ बंद कर.” याच बुमराहच्या पराक्रमी चेंडूने कांगारूंच्या भक्कम फलंदाजीला तडे दिले. आता जसप्रीतच्या नावाचा जयकार होत आहे. त्याने आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्याने कांगारूंच्या मेलबर्नभूमीवर कमालच केली नाही, तर एकामागोमाग विक्रमांच्या राशी घडवल्या.
जसप्रीतच्या गोलंदाजीच्या अनोख्या शैलीतूनच त्याचे वेगळेपण दिसते. त्याने कसोटी कारकिर्दीतील आपल्या पहिल्याच वर्षात सर्वाधिक गडी टिपण्याचा विश्वविक्रम केला. त्याने एका वर्षात ४८ गडी टिपले. या कामगिरीने टेरी एल्डरमन (१९८१) आणि कर्टली एंब्रोज (१९८८) यांचा ४२ गडी बाद करण्याचा विक्रम मागे पडला. एकाच वर्षातील तीन परदेशदौऱ्यांत एका डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम करणाराही जसप्रीत एकमेव आशियाई खेळाडू आहे. विक्रमांच्या राशी इथेच संपत नाहीत, तर भारताचा तो सर्वश्रेष्ठ गोलंदाजही ठरला. त्याने अजित आगरकर (४१/६), आणि माजी कर्णधार कपिल देव (१०६/८) यांच्याही कामगिरीला मागे टाकले. या कामगिरीने साबरमती नदीवरही आनंदतरंग उठले नसतील तरच नवल.
आई प्राथमिक शिक्षिका. आईच्याच मार्गदर्शनाखाली जसप्रीतची जडणघडण झाली. जसप्रीत घराच्याच भिंतीवर गोलंदाजीचा सराव करायचा. भिंतीवर सतत आदळणाऱ्या चेंडूमुळे आई एकदा संतापली. म्हणाली, “आवाज कमी कर, नाहीतर तुझा खेळ बंद कर.” याच बुमराहच्या पराक्रमी चेंडूने कांगारूंच्या भक्कम फलंदाजीला तडे दिले. आता जसप्रीतच्या नावाचा जयकार होत आहे. त्याने आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्याने कांगारूंच्या मेलबर्नभूमीवर कमालच केली नाही, तर एकामागोमाग विक्रमांच्या राशी घडवल्या.
जसप्रीतच्या गोलंदाजीच्या अनोख्या शैलीतूनच त्याचे वेगळेपण दिसते. त्याने कसोटी कारकिर्दीतील आपल्या पहिल्याच वर्षात सर्वाधिक गडी टिपण्याचा विश्वविक्रम केला. त्याने एका वर्षात ४८ गडी टिपले. या कामगिरीने टेरी एल्डरमन (१९८१) आणि कर्टली एंब्रोज (१९८८) यांचा ४२ गडी बाद करण्याचा विक्रम मागे पडला. एकाच वर्षातील तीन परदेशदौऱ्यांत एका डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम करणाराही जसप्रीत एकमेव आशियाई खेळाडू आहे. विक्रमांच्या राशी इथेच संपत नाहीत, तर भारताचा तो सर्वश्रेष्ठ गोलंदाजही ठरला. त्याने अजित आगरकर (४१/६), आणि माजी कर्णधार कपिल देव (१०६/८) यांच्याही कामगिरीला मागे टाकले. या कामगिरीने साबरमती नदीवरही आनंदतरंग उठले नसतील तरच नवल.