धाडसी व्यक्तींना यशही विस्मयकारक असते. लोक मात्र अशांना नशीबवान ठरवून मोकळे होतात. अभिनेत्री जयाप्रदा यांच्यात सौंदर्य आणि जिगर यांचा मिलाफ आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील राजमुंद्री गावातला. शाळेतील नृत्य बघून चित्रपटाचा प्रस्ताव आला. ‘सिरी सिरी मुव्वा’ या तेलुगू चित्रपटाने वलय दिले. त्याचे हिंदी रूपांतर म्हणजे ‘सरगम.’ तो तुफान चालला. जयाप्रदांना तेव्हा हिंदी येत नसे. पुढे त्यांनी फिल्मफेअर पटकाविले. तातडीने बदल स्वीकारणे ही त्यांची खासियत. सहकलावंत एन. टी. रामाराव यांनी खरेतर त्यांना तेलुगू देसममध्ये आणले. पण जयाप्रदा यांनी रामाराव यांची साथ सोडली. चंद्राबाबूंनचा पक्ष आपलासा केला. पुढे राज्यसभेवर प्रतिनिधित्व मिळविले.
तेथे मतभेदांनी टोक गाठण्यापूर्वी समाजवादी पक्षाशी जुळवून घेतले. तोवर हिंदीच्या न्यूनगंडावर त्यांनी मात केली.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळविताना त्यांना फायदाही झाला. रामपूरमधून त्या दोनदा खासदार झाल्या. तीन मुले असलेले विवाहित श्रीकांत नाहटा यांच्यासोबतचा त्यांचा विवाह गाजला. अमरसिंह यांच्याशी त्यांचे विश्वासाचे नाते आहे. अमरसिंह यांना कारावास झाला, तेव्हा अनेकांनी त्यांना टाटा केला. जयाप्रदा यांनी मात्र खंबीर साथ दिली. समाजवादी पक्षाशी काडीमोड झाल्यानंतर त्या काही काळ अमरसिंह यांच्या राष्ट्रीय लोकमंचात होत्या. राष्ट्रीय लोकदलाचाही प्रवास त्यांनी केला. तिथे बिजनौर निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आझम खान यांनी समाजवादी पक्षात असनाना त्रास दिला, हा जयाप्रदांचा आरोप आहे. त्यातूनच नैराश्याच्या गर्तेत गेल्याचा दावाही त्या करतात. पण या हिकमती अभिनेत्रीने नव्याने राजकारणाला उद्देशून ‘तुझं संग प्रीत लगाई’ असे गीत गायलेले दिसते. भाजपने त्यांना रामपूरमधून उमेदवारी दिली आहे. परंपरागत शत्रू आझमखान यांच्या विरोधातच त्यांची तेथे लढत होईल.
तेथे मतभेदांनी टोक गाठण्यापूर्वी समाजवादी पक्षाशी जुळवून घेतले. तोवर हिंदीच्या न्यूनगंडावर त्यांनी मात केली.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळविताना त्यांना फायदाही झाला. रामपूरमधून त्या दोनदा खासदार झाल्या. तीन मुले असलेले विवाहित श्रीकांत नाहटा यांच्यासोबतचा त्यांचा विवाह गाजला. अमरसिंह यांच्याशी त्यांचे विश्वासाचे नाते आहे. अमरसिंह यांना कारावास झाला, तेव्हा अनेकांनी त्यांना टाटा केला. जयाप्रदा यांनी मात्र खंबीर साथ दिली. समाजवादी पक्षाशी काडीमोड झाल्यानंतर त्या काही काळ अमरसिंह यांच्या राष्ट्रीय लोकमंचात होत्या. राष्ट्रीय लोकदलाचाही प्रवास त्यांनी केला. तिथे बिजनौर निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आझम खान यांनी समाजवादी पक्षात असनाना त्रास दिला, हा जयाप्रदांचा आरोप आहे. त्यातूनच नैराश्याच्या गर्तेत गेल्याचा दावाही त्या करतात. पण या हिकमती अभिनेत्रीने नव्याने राजकारणाला उद्देशून ‘तुझं संग प्रीत लगाई’ असे गीत गायलेले दिसते. भाजपने त्यांना रामपूरमधून उमेदवारी दिली आहे. परंपरागत शत्रू आझमखान यांच्या विरोधातच त्यांची तेथे लढत होईल.