मॅरेथॉन स्पर्धा म्हटली की परभणीच्या ज्योतीचा सहभाग महत्त्वाचा आणि बक्षीसही नक्की. मुंबईची मॅरेथॉन शर्यत ती लागोपाठ दुसऱ्यांदा जिंकली आहे. ज्योतीची आजपर्यंतची वाटचाल संघर्षमय आहे. घरची परिस्थतिी जेमतेम नव्हे बिकटच. वडील बँकेमध्ये कर्मचारी. ज्योतीला तिच्या परिस्थतिीची जाणीव आहे. धावण्याच्या शर्यतील क्रमांक पटकवायचा हा तिचा निर्धार. घरच्या परिस्थतिीवर मात करण्याचा तिने चंग बांधला. आजपर्यंत तिला काही लाख रुपये पारितोषिक म्हणून मिळाले आहेत. हे पैसे तिने घरच्यांसाठीच ठेवले आहेत. परभणीत तिचे छोटे घर आहे. या घरातून बाहेर पडून मॅरेथॉन स्पर्धा जिंकणे सोपे नव्हते. २०१०मध्ये मुंबईची मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्याआधी तिचे प्रशिक्षक रवी रासकटला यांनी भाकीत केले की ज्योती ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकणार. ते खरे ठरले. खरेतर ती त्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर होती. परंतु पहिल्या दोन स्पर्धकांनी जवळच्या मार्गाने अंतर पार केल्याने त्यांना बाद ठरविण्यात आले.
२००९मध्ये याच स्पर्धेत ज्योतीने अनवाणी धावून सर्वांचे लक्ष वेधले होते. अनवाणी पळून तिने दुसरा क्रमांक मिळविला. मॅरेथॉनसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा तिला मिळत नाही तरीही मोठ्या जिद्दीने ज्योती मेहनत करून नावारूपाला आली आहे. भारताची मॅरेथॉनमधील संभाव्य विजेती खेळाडू म्हणून तिच्याकडे बघितले जाते. घरची ऐपत नसतानाही जिद्दीच्या जोरावर मॅरेथॉनमध्ये ज्योतीने नाव कमावले. तिला रवी रासकटला यांनी धीर देऊन प्रशिक्षण दिले. ज्योतीमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. त्यामुळे यश तिच्याकडे येतेच. परभणीत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ती रोज सराव करते. अॅथलॅटिक्समध्ये ज्योतीने मोठ्या अंतराच्या शर्यती गाजविल्या आणि २००७, २०१०मध्ये चार किलोमीटर शर्यतीत विजेतेपद मिळवले. २००९, २०१० मध्ये दीड हजार आणि तीन हजार मीटर शर्यतीत तिने अव्वल स्थान पटकाविले.
२०१०पासून ती मॅरेथॉनमध्ये धावू लागली. मुंबई, बेंगळुरू आणि सुरतच्या राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये तिने ठसा उमटविला. २०१५मध्ये हैदराबादच्या मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकाविला. अलाहाबदची मॅरेथॉन तिने सलग चारवेळा जिंकली. ४२ किलोमीटरच्या धावण्यात ती चॅम्पियन ठरली. २०१४मध्ये मॅरेथॉन शर्यतील तिने तिसरा क्रमांक मिळवलिा. २०१६ आणि १७मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळविले. याशिवाय, औरंगाबादच्या एबीबी आणि गेट गोईंगच्या शर्यतीतही तिने अव्वल स्थान पटकाविले. तिने मिळविलेले यश देदीप्यमान आहेच. आता ती ऑलम्पिकची तयारी करीत आहे. ऑलम्पिकमध्ये पदक पटकाविण्याचे तिचे स्वप्न आहे. ज्योतीला शुभेच्छा!
२००९मध्ये याच स्पर्धेत ज्योतीने अनवाणी धावून सर्वांचे लक्ष वेधले होते. अनवाणी पळून तिने दुसरा क्रमांक मिळविला. मॅरेथॉनसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा तिला मिळत नाही तरीही मोठ्या जिद्दीने ज्योती मेहनत करून नावारूपाला आली आहे. भारताची मॅरेथॉनमधील संभाव्य विजेती खेळाडू म्हणून तिच्याकडे बघितले जाते. घरची ऐपत नसतानाही जिद्दीच्या जोरावर मॅरेथॉनमध्ये ज्योतीने नाव कमावले. तिला रवी रासकटला यांनी धीर देऊन प्रशिक्षण दिले. ज्योतीमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. त्यामुळे यश तिच्याकडे येतेच. परभणीत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ती रोज सराव करते. अॅथलॅटिक्समध्ये ज्योतीने मोठ्या अंतराच्या शर्यती गाजविल्या आणि २००७, २०१०मध्ये चार किलोमीटर शर्यतीत विजेतेपद मिळवले. २००९, २०१० मध्ये दीड हजार आणि तीन हजार मीटर शर्यतीत तिने अव्वल स्थान पटकाविले.
२०१०पासून ती मॅरेथॉनमध्ये धावू लागली. मुंबई, बेंगळुरू आणि सुरतच्या राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये तिने ठसा उमटविला. २०१५मध्ये हैदराबादच्या मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकाविला. अलाहाबदची मॅरेथॉन तिने सलग चारवेळा जिंकली. ४२ किलोमीटरच्या धावण्यात ती चॅम्पियन ठरली. २०१४मध्ये मॅरेथॉन शर्यतील तिने तिसरा क्रमांक मिळवलिा. २०१६ आणि १७मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळविले. याशिवाय, औरंगाबादच्या एबीबी आणि गेट गोईंगच्या शर्यतीतही तिने अव्वल स्थान पटकाविले. तिने मिळविलेले यश देदीप्यमान आहेच. आता ती ऑलम्पिकची तयारी करीत आहे. ऑलम्पिकमध्ये पदक पटकाविण्याचे तिचे स्वप्न आहे. ज्योतीला शुभेच्छा!