माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताला जगाच्या व्यासपीठावर मोठे स्थान मिळवून देणाऱ्यांची यादी नंदन नीलेकणी या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यामुळे चर्चेत असलेल्या ‘इन्फोसिस’च्या अध्यक्षपदावर ते परतणार अशी कुणकुण लागताच त्या कंपनीच्या शेअर घसरण थांबली. हा नीलेकणी या नावाचा महिमाच म्हणावा लागेल. इन्फोसिसचे ते एक सहसंस्थापक. नारायणमूर्ती यांच्या बरोबर १९८१मध्ये त्यांनी सुरू केलेल्या ‘इन्फोसिस’ची उलाढाल तीस हजार रुपयांपासून तीन अब्ज रुपयांपर्यंत नेण्यामध्ये नीलेकणी यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्तीही शिक्षण आणि धाडस यांच्या जोरावर अब्जाधीश होऊ शकते हे नीलेकणींनी दाखवून दिले. सरस्वतीच्या भांडवलावर लक्ष्मीची आराधना यशस्वीपणे करता येते याचा आदर्श त्यांनी घालून दिला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशालाही जगात एक महत्त्वाचे स्थान त्यांनी मिळवून दिले. योग्य वेळेस व्यवसायातून बाजूला करून घेत पुढील काही वर्षे ही राष्ट्रीय कर्तव्यासाठी पार पाडली आणि कोट्यवधी भारतीयांना आधार देऊ शकणाऱ्या आधार कार्डाच्या प्रकल्प यशस्वीपणे सादर केला. पुरेसे पैसे मिळविल्यानंतरही क्वचितच कोणी तरी देशासाठी काही तरी करायला तयार होतो.
नीलेकणी मात्र अपवाद ठरले. इतकेच नव्हे तर फक्त काठावर बसून सल्ले देण्यापेक्षा थेट राजकारणात उतरून त्यांनी बेंगळूरूमधून लोकसभेची निवडणूकही लढविली. त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरीही त्यांचा प्रयत्न कौतुकास्पदच होता. आधार या देशातील प्रत्येक नागरिकाला ओळख मिळवून देण्याच्या प्रकल्पाची जबाबदारी नीलेकणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निमंत्रणावरून स्वीकारली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, नीलेकणींनी त्यांना भेटून या प्रकल्पाची माहिती दिली आणि मोदींनी हाच प्रकल्प पुढे नेला. आता थेट सर्वोच्च्य न्यायालयामध्ये त्याची लढाई सुरू असली, तरी वादातून नीलेकणी पूर्णपणे अलिप्त आहेत. ‘इन्फोसिस’चे सीईओ विशाल सिक्का यांच्या कार्यपद्धतीवर संस्थापक नारायण मूर्ती यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि इन्फोसिसचे तारू हेलकावू लागले. त्यामुळे पुन्हा एकदा नीलेकणी यांनी या कंपनीच्या अकार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. नवीन सीईओची निवड, कंपनीचा व्यवसाय सांभाळणे ही जबाबदारी दरम्यानच्या काळात ते सांभाळणार आहेत. ती कामगिरीही ते चोखपणे पार पाडतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा देशाच्या हितासाठी एखादी नवीन जबाबदारी स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.
नीलेकणी मात्र अपवाद ठरले. इतकेच नव्हे तर फक्त काठावर बसून सल्ले देण्यापेक्षा थेट राजकारणात उतरून त्यांनी बेंगळूरूमधून लोकसभेची निवडणूकही लढविली. त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरीही त्यांचा प्रयत्न कौतुकास्पदच होता. आधार या देशातील प्रत्येक नागरिकाला ओळख मिळवून देण्याच्या प्रकल्पाची जबाबदारी नीलेकणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निमंत्रणावरून स्वीकारली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, नीलेकणींनी त्यांना भेटून या प्रकल्पाची माहिती दिली आणि मोदींनी हाच प्रकल्प पुढे नेला. आता थेट सर्वोच्च्य न्यायालयामध्ये त्याची लढाई सुरू असली, तरी वादातून नीलेकणी पूर्णपणे अलिप्त आहेत. ‘इन्फोसिस’चे सीईओ विशाल सिक्का यांच्या कार्यपद्धतीवर संस्थापक नारायण मूर्ती यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि इन्फोसिसचे तारू हेलकावू लागले. त्यामुळे पुन्हा एकदा नीलेकणी यांनी या कंपनीच्या अकार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. नवीन सीईओची निवड, कंपनीचा व्यवसाय सांभाळणे ही जबाबदारी दरम्यानच्या काळात ते सांभाळणार आहेत. ती कामगिरीही ते चोखपणे पार पाडतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा देशाच्या हितासाठी एखादी नवीन जबाबदारी स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.