प्रियांका चतुर्वेदी
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बंडखोर प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या आहेत. तशा काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून त्या देशभर परिचित होत्याच. अनेक राजकीय पक्षांचे प्रवक्ते त्रागा आणि आरडाओरडा करून समोरच्या व्यक्तीचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी आटापिटा करतात किंवा मोठमोठ्याने बोलून आपले खोटे, खरे भासवण्याचा प्रयत्न करतात. अशा काळात प्रियांका चतुर्वेदी मुद्देसूदपणे आणि ठामपणे काँग्रेसची बाजू मांडत. पक्षाच्या वाईट काळात बाजू मांडणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ दृष्टिपथात असताना पक्षत्याग करतात, हे अनाकलनीय वाटले तरी ते राजकीय वास्तव आहे. उत्तर भारतीय कुटुंबात जन्मलेल्या प्रियांका यांचे शिक्षण तसेच राजकीय, सामाजिक जीवनाचा प्रारंभ मुंबईतूनच झाला. मथुरा येथे काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली असता त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही महिन्यांपूर्वी निलंबित केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले, त्याचा निषेध आधी त्यांनी ट्विटरवर केला. दोन दिवसांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि लगेच शिवसेनेत प्रवेश केला. प्रियांका यांना मथुरा किंवा वायव्य मुंबईत लोकसभेची उमेदवारी हवी होती. ती न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण काही असले तरी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासारख्या व्यक्तीशीही काँग्रेस नेतृत्व नीट संवाद ठेवू शकत नाही, असा संदेश यातून जातो आणि आधीच ‘नामदार’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या काँग्रेस नेतृत्वासाठी ते योग्य नाही. अर्थात, शीतल म्हात्रे, शुभा राऊळ यांच्याशी चर्चा केल्यास शिवसेनेत महिलांचा किती सन्मान राखला जातो, हेही प्रियांका चतुर्वेदी यांना भविष्यात समजून येईल..
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बंडखोर प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या आहेत. तशा काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून त्या देशभर परिचित होत्याच. अनेक राजकीय पक्षांचे प्रवक्ते त्रागा आणि आरडाओरडा करून समोरच्या व्यक्तीचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी आटापिटा करतात किंवा मोठमोठ्याने बोलून आपले खोटे, खरे भासवण्याचा प्रयत्न करतात. अशा काळात प्रियांका चतुर्वेदी मुद्देसूदपणे आणि ठामपणे काँग्रेसची बाजू मांडत. पक्षाच्या वाईट काळात बाजू मांडणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ दृष्टिपथात असताना पक्षत्याग करतात, हे अनाकलनीय वाटले तरी ते राजकीय वास्तव आहे. उत्तर भारतीय कुटुंबात जन्मलेल्या प्रियांका यांचे शिक्षण तसेच राजकीय, सामाजिक जीवनाचा प्रारंभ मुंबईतूनच झाला. मथुरा येथे काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली असता त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही महिन्यांपूर्वी निलंबित केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले, त्याचा निषेध आधी त्यांनी ट्विटरवर केला. दोन दिवसांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि लगेच शिवसेनेत प्रवेश केला. प्रियांका यांना मथुरा किंवा वायव्य मुंबईत लोकसभेची उमेदवारी हवी होती. ती न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण काही असले तरी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासारख्या व्यक्तीशीही काँग्रेस नेतृत्व नीट संवाद ठेवू शकत नाही, असा संदेश यातून जातो आणि आधीच ‘नामदार’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या काँग्रेस नेतृत्वासाठी ते योग्य नाही. अर्थात, शीतल म्हात्रे, शुभा राऊळ यांच्याशी चर्चा केल्यास शिवसेनेत महिलांचा किती सन्मान राखला जातो, हेही प्रियांका चतुर्वेदी यांना भविष्यात समजून येईल..