शक्तिकांत दास
उर्जित पटेल यांच्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदी माजी सनदी अधिकारी शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीद्वारे मोदी सरकारने सर्व संबंधित घटकांत सकारात्मक संदेश पाठविला आहे. ‘आरबीआय’ आणि केंद्र सरकार यांच्यातील वाढलेला तणाव आणि त्यातून पटेल यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर गव्हर्नर होत असलेल्या दास यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयात विविध पदांवर केलेल्या कामाचा अनुभव पणाला लावून दास यांना हे आव्हान पेलावयाचे आहे. ६१ वर्षी दास हे तमिळनाडू केडरचे निवृत्त ‘आयएएस’ अधिकारी असून, नोटाबंदीच्या काळात ते प्रकाशात आले होते. त्यावेळी दररोज निघणाऱ्या नवनवीन आदेशांची माहिती ते सरकारच्या वतीने देत होते. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी तीच ती माणसे परत येऊ नये म्हणून त्यांच्या बोटांवर शाई लावण्याची घोषणा दास यांनीच केली होती. तीव्र प्रतिक्रियांनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. अर्थ मंत्रालयात दीर्घकाळ केलेले काम, वित्त आयोगावरील काम आणि अर्थविषयक प्रश्न हाताळण्याचा असलेला मोठा अनुभव त्यांना मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखपदाची जबाबदारी पेलण्यासाठी निश्चितच उपयुक्त पडेल. मार्च २०१७पर्यंत त्यांनी सरकारमध्ये काम केलेले असल्याने रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यातील ताण कमी करण्यातही ते मोलाची भूमिका बजावू शकतात. नोटाबंदीचा आणि ‘जीएसटी’चा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, सार्वजनिक बँकांवरील थकीत कर्जांचे ओझे, रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजना, उद्योगांना चालना देण्यात सरकारला भासत असलेली चणचण या सर्वांची योग्य माहिती असल्याने दास आपली जबाबदारी व्यवस्थित निभावतील, अशी आशा आहे. यात यश मिळवितानाच मध्यवर्ती बँकेला दास आणखी मजबूत करू शकले, तर संकटविमोचक म्हणून ते कायमचे लक्षात राहतील.
उर्जित पटेल यांच्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदी माजी सनदी अधिकारी शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीद्वारे मोदी सरकारने सर्व संबंधित घटकांत सकारात्मक संदेश पाठविला आहे. ‘आरबीआय’ आणि केंद्र सरकार यांच्यातील वाढलेला तणाव आणि त्यातून पटेल यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर गव्हर्नर होत असलेल्या दास यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयात विविध पदांवर केलेल्या कामाचा अनुभव पणाला लावून दास यांना हे आव्हान पेलावयाचे आहे. ६१ वर्षी दास हे तमिळनाडू केडरचे निवृत्त ‘आयएएस’ अधिकारी असून, नोटाबंदीच्या काळात ते प्रकाशात आले होते. त्यावेळी दररोज निघणाऱ्या नवनवीन आदेशांची माहिती ते सरकारच्या वतीने देत होते. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी तीच ती माणसे परत येऊ नये म्हणून त्यांच्या बोटांवर शाई लावण्याची घोषणा दास यांनीच केली होती. तीव्र प्रतिक्रियांनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. अर्थ मंत्रालयात दीर्घकाळ केलेले काम, वित्त आयोगावरील काम आणि अर्थविषयक प्रश्न हाताळण्याचा असलेला मोठा अनुभव त्यांना मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखपदाची जबाबदारी पेलण्यासाठी निश्चितच उपयुक्त पडेल. मार्च २०१७पर्यंत त्यांनी सरकारमध्ये काम केलेले असल्याने रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यातील ताण कमी करण्यातही ते मोलाची भूमिका बजावू शकतात. नोटाबंदीचा आणि ‘जीएसटी’चा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, सार्वजनिक बँकांवरील थकीत कर्जांचे ओझे, रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजना, उद्योगांना चालना देण्यात सरकारला भासत असलेली चणचण या सर्वांची योग्य माहिती असल्याने दास आपली जबाबदारी व्यवस्थित निभावतील, अशी आशा आहे. यात यश मिळवितानाच मध्यवर्ती बँकेला दास आणखी मजबूत करू शकले, तर संकटविमोचक म्हणून ते कायमचे लक्षात राहतील.